शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगाव तालुक्यात पिकांवर ढगांचा महिरप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 05:00 IST

ढगाळ वातावरण असतानाच अंजनगाव व अचलपूर तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे कापूस ओला होऊन पिवळा पडत आहे. फुटण्याच्या अवस्थेत असलेली बोंड किडत आहेत. पावसाने तुरीची फुले गळत असून, अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी, अर्धेअधिक तुरीचे दाणे अळ्यांच्या घशात जात आहेत, शिवाय या दूषित वातावरणाने रबी हंगामातील हरभरा व कांदा या पिकांनासुद्धा हानी पोहचत आहे.

ठळक मुद्देअळ्यांचा प्रादुर्भाव वाढला

 लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : दहा-पंधरा दिवसांपासून अंजनगाव तालुक्यात पिकांवर ढगांचा महिरप सजला आहे. मात्र, तो महिरप पिकांवरील अळ्यांसाठी पोषक असल्याने शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे.  खरीप हंगामातील शिल्लक असलेला कापूस व तूर आणि रबी हंगामातील हरभरा व कांदा पिकाला या वातावरणाचा फटका बसत आहे.ढगाळ वातावरण असतानाच अंजनगाव व अचलपूर तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे कापूस ओला होऊन पिवळा पडत आहे. फुटण्याच्या अवस्थेत असलेली बोंड किडत आहेत. पावसाने तुरीची फुले गळत असून, अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी, अर्धेअधिक तुरीचे दाणे अळ्यांच्या घशात जात आहेत, शिवाय या दूषित वातावरणाने रबी हंगामातील हरभरा व कांदा या पिकांनासुद्धा हानी पोहचत आहे. कांद्याचे रोप तयार करण्याची प्रक्रिया वांदयात आली आहे. 

कांद्याला फटकाअतिशय संवेदनशील असलेल्या अंकुरलेल्या कांद्यावर ढगाळ वातावरणाचा दुष्परिणाम होऊन ते जळत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना फवारणीचा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. पूर्वी अतिपावसाने खरीप हंगामाचे वाटोळे केले. आता रबी हंगामालासुद्धा वातावरणाचा फटका बसणार आहे. तालुक्यात रबी हंगामाची पेरणी पूर्ण झाली. मात्र, तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणाचा पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. हरभऱ्यावर घाटेअळी व मर, तुरीवर शेंगा पोखरणारी अळी व माशा तसेच कांदा पिकावर करपा व फुलकिडे आहेत.