शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

किसान आंदोलनाची धग आता गावपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:16 IST

(फोटो) अमरावती : ग्रामसभेपासून कुठल्याच पातळीवर चर्चा न करता केंद्र शासनाने शेतकरीविरोधी कायदे केले, त्याला आमचा विरोध आहे. यांसह ...

(फोटो)

अमरावती : ग्रामसभेपासून कुठल्याच पातळीवर चर्चा न करता केंद्र शासनाने शेतकरीविरोधी कायदे केले, त्याला आमचा विरोध आहे. यांसह अनेक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दिल्ली येथे महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे. याविषयी आता जिल्ह्यातील गावागावांत आंदोलन समितीद्वारे जागृती करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक साहेबराव विधळे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.

अन्य राज्यांमध्ये केंद्राच्या कृषिकायद्यांविरोधात ठराव घेण्यात आला. तसा ठराव महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत घेण्याविषयी शासनाला निवेदन देण्यात येत असल्याची माहिती महेंद्र मेटे यांनी दिली. केंद्र शासन शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी आता खोडसाड प्रचार करीत असल्याचा आरोप तुकाराम भस्मे यांनी केला. ३ जानेवारीला नागपूर येथून शेतकऱ्यांचा जत्था आंदोलनासाठी दिल्लीत जाणार आहे. यामध्ये किमान एक हजार शेतकरी सहभागी होतील. यापूर्वी नाशिक येथून एक जत्था दिल्लीला गेला असल्याचे भस्मे यांनी सांगितले.

२५ डिसेंबरला याविषयी बैठक घेण्यात आली. अनेक संघटना सहभागी झाल्यात. यामध्ये आंदोलनाची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यत पोहचविण्यासाठी समितीद्वारे प्रयत्न केला जाणार असल्याचे ठरल्याचे समितीचे समन्वयक बाबा भाकरे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला रोशन अर्डक, लक्ष्मण धाकडे, प्रफुल्ल गुडधे, प्रदीप पाटील, सुभाष पांडे, इमरान अशरफी आदी उपस्थित होते.