शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

किसान आंदोलनाची धग आता गावपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:16 IST

(फोटो) अमरावती : ग्रामसभेपासून कुठल्याच पातळीवर चर्चा न करता केंद्र शासनाने शेतकरीविरोधी कायदे केले, त्याला आमचा विरोध आहे. यांसह ...

(फोटो)

अमरावती : ग्रामसभेपासून कुठल्याच पातळीवर चर्चा न करता केंद्र शासनाने शेतकरीविरोधी कायदे केले, त्याला आमचा विरोध आहे. यांसह अनेक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दिल्ली येथे महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे. याविषयी आता जिल्ह्यातील गावागावांत आंदोलन समितीद्वारे जागृती करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक साहेबराव विधळे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.

अन्य राज्यांमध्ये केंद्राच्या कृषिकायद्यांविरोधात ठराव घेण्यात आला. तसा ठराव महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत घेण्याविषयी शासनाला निवेदन देण्यात येत असल्याची माहिती महेंद्र मेटे यांनी दिली. केंद्र शासन शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी आता खोडसाड प्रचार करीत असल्याचा आरोप तुकाराम भस्मे यांनी केला. ३ जानेवारीला नागपूर येथून शेतकऱ्यांचा जत्था आंदोलनासाठी दिल्लीत जाणार आहे. यामध्ये किमान एक हजार शेतकरी सहभागी होतील. यापूर्वी नाशिक येथून एक जत्था दिल्लीला गेला असल्याचे भस्मे यांनी सांगितले.

२५ डिसेंबरला याविषयी बैठक घेण्यात आली. अनेक संघटना सहभागी झाल्यात. यामध्ये आंदोलनाची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यत पोहचविण्यासाठी समितीद्वारे प्रयत्न केला जाणार असल्याचे ठरल्याचे समितीचे समन्वयक बाबा भाकरे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला रोशन अर्डक, लक्ष्मण धाकडे, प्रफुल्ल गुडधे, प्रदीप पाटील, सुभाष पांडे, इमरान अशरफी आदी उपस्थित होते.