शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

पाणीटंचाईच्या तात्पुरत्या उपाययोजना आजपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 01:38 IST

यंदाच्या पावसाळ्यात ४५ दिवसांत ४२ टक्के पावसाची तूट आल्याने भर पावसाळ्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईच्या उपाययोजनांना शासनाने दिलेली मुदतवाढ १५ जुलै रोजी संपुष्टात येत आहे.

ठळक मुद्देमुदतवाढ संपली : पावसाच्या तुटीमुळे पाणीटंचाईची दाहकता वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या पावसाळ्यात ४५ दिवसांत ४२ टक्के पावसाची तूट आल्याने भर पावसाळ्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईच्या उपाययोजनांना शासनाने दिलेली मुदतवाढ १५ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. जुलै महिन्यात पाऊस सरासरीही गाठणार नाही, असे हवामान विभागाने स्पष्ट केल्याने जिल्ह्यात पावसाअभावी पाणी पेटणार असल्याचे वास्तव आहे.गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाने जिल्ह्याची भूजलपातळी झपाट्याने खालावली. त्यामुळे जलस्त्रोत उघडे पडलेत व प्रकल्पांना कोरड लागली. परिणामी जिल्ह्यातील ३०० वर गावे सध्याही तहानले आहेत. यंदाही पावसाचे १२० पैकी ४५ दिवस झाले असतानाही पावसात ४२ टक्क्यांची तूट आहे. त्यामुळे विहिरींची पाणी पातळी वाढलेली नाही. शासन निर्णयाप्रमाणे पाणीटंचाईच्या उपाययोजना ३० जुनला बंद केल्या जातात. यंदा जून अखेरपर्यंत पावसाचा पत्ता नसल्यामुळे शासनाने पाणीटंचाईच्या उपाययोजनांना १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. या कालावधीत पाच गावांचे प्रस्ताव पाठविण्यात आलेत. त्याचप्रमाणे तात्पुरत्या पूरक पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेत. त्याचप्रमाणे तहानलेल्या ३०० वर गावांसाठी ५४ टँकर व ३५४ अधिग्रहणातील खासगी विहिरींनादेखील मुदतवाढ मिळाली. मात्र, १५ जुलैची मुदतवाढ संपत असतानादेखील पाऊस सरासरीत माघारल्याने पाणीटंचाईची दाहकता वाढलेली आहे. त्यामुळे शासनाने पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे.सद्यस्थितीत १० तालुक्यातील ५३ गावांत जिल्हा प्रशासनाद्वारा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात बोडना, डिगरगव्हान व परसोडा, तिवसा तालुक्यात ठाणाठुणी, वरखेड, तारखेड, गुरुदेवनगर, माळेगाव, दिवानखेड, मोर्शी तालुक्यात वाघोली, लेहगाव, आखतवाडा, पिंपळखुटा, दहसूर, आसोना, गोराळा, सावरखेड, शिरखेड, अंबाडा, वरूड तालुक्यात शहापूर, चांदूर रेल्वे तालुक्यात सालोरा खूर्द, आमला विश्वेश्वर, जळका, कारला, निमला, सावंगी मग्रापूर, अमदोरी, अंजनवती, अचलपूर तालुक्यात पथ्रोट, जनुना, चांदूरबाजार तालुक्यात घाटलाडकी, चिखलदरा तालुक्यात मनभंग, आडनदी, भिलखेडा, कोयलारी, पाचडोंगरी, धरमडोह, बहाद्दरपूर, पिंपादरी, मलकापूरम कोरडा, तारूबांडा, खडीमल, कुलगंना, गौरखेडा, लवादा, पस्तलाई, आलाडोह, खोगदा, आकी, नागापूर, चौऱ्याकूंड व राणीगाव येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.तहानलेल्या गावांची मुदतवाढीची मागणीसद्यस्थितीत खासगी अधिग्रहणातील ३५४ विहिरींद्वारे २९१ गावांची तहान भागविली जात आहे. यामध्ये अमरावती तालुक्यातील ३३ गावांत ४५, नादंगाव खंडेश्वर तालुक्यात ३० गावांत ३२, भातकुली, तिवसा २० गावांत २५, मोर्शी ३८ गावांत ५९, वरूड ३० गावांत ३४, चांदूर रेल्वे ४४ गावांत ५४, धामणगाव रेल्वे ११ गावांत १२, अचलपूर २१ गावांत ३७, चांदूरबाजार ४ गावांत ८, अंजनगाव सुर्जी ५ गावांत ७, दर्यापूर निरंक, चिखलदरा ४० गावांत ३५ तर धारणी तालुक्यात १४ गावांची अधिग्रहणातील १५ खासगी विहिरीद्वारे तहान भागविली जात आहे. यासह ५४ टँकरलादेखील मुदतवाढ द्यावी, अशी तहानलेल्या गावांची मागणी आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूक