शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

पाणीटंचाईच्या तात्पुरत्या उपाययोजना आजपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 01:38 IST

यंदाच्या पावसाळ्यात ४५ दिवसांत ४२ टक्के पावसाची तूट आल्याने भर पावसाळ्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईच्या उपाययोजनांना शासनाने दिलेली मुदतवाढ १५ जुलै रोजी संपुष्टात येत आहे.

ठळक मुद्देमुदतवाढ संपली : पावसाच्या तुटीमुळे पाणीटंचाईची दाहकता वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या पावसाळ्यात ४५ दिवसांत ४२ टक्के पावसाची तूट आल्याने भर पावसाळ्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईच्या उपाययोजनांना शासनाने दिलेली मुदतवाढ १५ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. जुलै महिन्यात पाऊस सरासरीही गाठणार नाही, असे हवामान विभागाने स्पष्ट केल्याने जिल्ह्यात पावसाअभावी पाणी पेटणार असल्याचे वास्तव आहे.गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाने जिल्ह्याची भूजलपातळी झपाट्याने खालावली. त्यामुळे जलस्त्रोत उघडे पडलेत व प्रकल्पांना कोरड लागली. परिणामी जिल्ह्यातील ३०० वर गावे सध्याही तहानले आहेत. यंदाही पावसाचे १२० पैकी ४५ दिवस झाले असतानाही पावसात ४२ टक्क्यांची तूट आहे. त्यामुळे विहिरींची पाणी पातळी वाढलेली नाही. शासन निर्णयाप्रमाणे पाणीटंचाईच्या उपाययोजना ३० जुनला बंद केल्या जातात. यंदा जून अखेरपर्यंत पावसाचा पत्ता नसल्यामुळे शासनाने पाणीटंचाईच्या उपाययोजनांना १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. या कालावधीत पाच गावांचे प्रस्ताव पाठविण्यात आलेत. त्याचप्रमाणे तात्पुरत्या पूरक पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेत. त्याचप्रमाणे तहानलेल्या ३०० वर गावांसाठी ५४ टँकर व ३५४ अधिग्रहणातील खासगी विहिरींनादेखील मुदतवाढ मिळाली. मात्र, १५ जुलैची मुदतवाढ संपत असतानादेखील पाऊस सरासरीत माघारल्याने पाणीटंचाईची दाहकता वाढलेली आहे. त्यामुळे शासनाने पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे.सद्यस्थितीत १० तालुक्यातील ५३ गावांत जिल्हा प्रशासनाद्वारा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात बोडना, डिगरगव्हान व परसोडा, तिवसा तालुक्यात ठाणाठुणी, वरखेड, तारखेड, गुरुदेवनगर, माळेगाव, दिवानखेड, मोर्शी तालुक्यात वाघोली, लेहगाव, आखतवाडा, पिंपळखुटा, दहसूर, आसोना, गोराळा, सावरखेड, शिरखेड, अंबाडा, वरूड तालुक्यात शहापूर, चांदूर रेल्वे तालुक्यात सालोरा खूर्द, आमला विश्वेश्वर, जळका, कारला, निमला, सावंगी मग्रापूर, अमदोरी, अंजनवती, अचलपूर तालुक्यात पथ्रोट, जनुना, चांदूरबाजार तालुक्यात घाटलाडकी, चिखलदरा तालुक्यात मनभंग, आडनदी, भिलखेडा, कोयलारी, पाचडोंगरी, धरमडोह, बहाद्दरपूर, पिंपादरी, मलकापूरम कोरडा, तारूबांडा, खडीमल, कुलगंना, गौरखेडा, लवादा, पस्तलाई, आलाडोह, खोगदा, आकी, नागापूर, चौऱ्याकूंड व राणीगाव येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.तहानलेल्या गावांची मुदतवाढीची मागणीसद्यस्थितीत खासगी अधिग्रहणातील ३५४ विहिरींद्वारे २९१ गावांची तहान भागविली जात आहे. यामध्ये अमरावती तालुक्यातील ३३ गावांत ४५, नादंगाव खंडेश्वर तालुक्यात ३० गावांत ३२, भातकुली, तिवसा २० गावांत २५, मोर्शी ३८ गावांत ५९, वरूड ३० गावांत ३४, चांदूर रेल्वे ४४ गावांत ५४, धामणगाव रेल्वे ११ गावांत १२, अचलपूर २१ गावांत ३७, चांदूरबाजार ४ गावांत ८, अंजनगाव सुर्जी ५ गावांत ७, दर्यापूर निरंक, चिखलदरा ४० गावांत ३५ तर धारणी तालुक्यात १४ गावांची अधिग्रहणातील १५ खासगी विहिरीद्वारे तहान भागविली जात आहे. यासह ५४ टँकरलादेखील मुदतवाढ द्यावी, अशी तहानलेल्या गावांची मागणी आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूक