शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

बंद पॅसेंजर गाड्या गुरुवारपासून धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:56 IST

भुसावळ-नागपूर मार्गावर गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेल्या १० पॅसेंजर फेऱ्या गुरुवार, १८ जुलैपासून पुन्हा सुरू होणार आहे. खासदार नवनीत रवि राणा यांच्या सततच्या पाठपुराव्याने रेल्वे मंत्रालयाने गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देअडीच महिन्यानंतर जाग : नवनीत राणांच्या पाठपुराव्याला यश, रेल्वे बोर्डाने पत्र काढले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भुसावळ-नागपूर मार्गावर गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेल्या १० पॅसेंजर फेऱ्या गुरुवार, १८ जुलैपासून पुन्हा सुरू होणार आहे. खासदार नवनीत रवि राणा यांच्या सततच्या पाठपुराव्याने रेल्वे मंत्रालयाने गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.नागपूर-भुसावळ मार्गाचे काम करण्याच्या नावाखाली १० फेºया पॅसेंजरच्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे दैनदिन रेल्वे गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांनी खासदार राणा यांची भेट भेटली. पॅसेंजर गाड्या बंद असल्याने गरीब, सामान्य प्रवाशांचे होत असलेले हाल आणि आपबीती कथन केली. त्यानुसार खासदार नवनीत राणा यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वे बंद केलेल्या सर्व पॅसेंजर सुरू करण्याची मागणी केली. रेल्वे बोर्डाने मंगळवारी अधिकृत पत्र जारी करून बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. १८ जुलैपासून पुन्हा पॅसेंजर धावणार आहे. नागपूर-भुसावळ (५१२८५) ही जुलै रोजी सुरू होईल. नागपूर-वर्धा (५१२६०) ही पॅसेजर १८ जुलै रोजी धावणार आहे.तर भुसावळ - नागपूर (५१२८५) ही पॅसेंजर १९ जुलै रोजी सुटेल. भुसावळ-वर्धा (५११९७), वर्धा- भुसावळ (५११९८) ही १८ जुलै रोजी धावणार आहे. पॅसेंजर सुरू होत असल्याने सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.या पॅसेंजर सुरू होतीलनागपूर-भुसावळ (५१२८६), भुसावळ-नागपूर (५१२८५), नागपूर-वर्धा (५१२६०), वर्धा- नागपूर (५१२५९), वर्धा-अमरावती (५१२६१), अमरावती-वर्धा (५१२६२), अजनी-काजीपेठ (५७१३५), काजीपेठ-अजनी (५७१३६), भुसावळ-वर्धा (५११९७), वर्धा-भुसावळ (५११९८)प्रवासी संख्येत घट; उत्पन्न कायमअडिच महिन्यापासून पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे दरमहा १० ते १२ हजार प्रवासी घटले आहेत. मात्र, रेल्वेच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम झाला नाही, अशी माहिती एका वाणिज्य विभागातील अधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पॅसेंजर गाड्या बंद असल्या तरी एक्स्प्रेस व अन्य रेल्वे गाड्यांनी नागरिक प्रवास करतात. यंदा जून महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत प्रवासी संख्या १४ हजारांनी रोडावल्याचा अहवाल बडनेरा रेल्वे स्थानकाच्या वाणिज्य विभागाने वरिष्ठांकडे पाठविला होता.रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना पॅसेंजर सुरू करण्याबाबत निवेदन सादर केले होते. पॅसेंजर बंद असल्यामुळे गरीब, सामान्य प्रवाशांचे होणारे हाल आणि आर्थिक नुकसानाची माहिती दिली होती. मंगळवारी रेल्वे बोर्डाने पॅसेंजर सुरू करुन गरीब प्रवाशांना न्याय दिला आहे.- नवनीत रवि राणाखासदार, अमरावती.पॅसेंजर गाड्यांमुळे लहान, मोठ्या रेल्वे स्थानकावर कमी पैशात ये-जा करणे सुकर होते. मात्र अडिच महिन्यापासून पॅसेंजर गाड्या बंद होत्या. त्या पूर्ववत झाल्याने दिलासा मिळाला.- रोशन चव्हाण, रेल्वे प्रवासी, बडनेरा.