शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

बंद पॅसेंजर गाड्या गुरुवारपासून धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:56 IST

भुसावळ-नागपूर मार्गावर गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेल्या १० पॅसेंजर फेऱ्या गुरुवार, १८ जुलैपासून पुन्हा सुरू होणार आहे. खासदार नवनीत रवि राणा यांच्या सततच्या पाठपुराव्याने रेल्वे मंत्रालयाने गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देअडीच महिन्यानंतर जाग : नवनीत राणांच्या पाठपुराव्याला यश, रेल्वे बोर्डाने पत्र काढले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भुसावळ-नागपूर मार्गावर गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेल्या १० पॅसेंजर फेऱ्या गुरुवार, १८ जुलैपासून पुन्हा सुरू होणार आहे. खासदार नवनीत रवि राणा यांच्या सततच्या पाठपुराव्याने रेल्वे मंत्रालयाने गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.नागपूर-भुसावळ मार्गाचे काम करण्याच्या नावाखाली १० फेºया पॅसेंजरच्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे दैनदिन रेल्वे गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांनी खासदार राणा यांची भेट भेटली. पॅसेंजर गाड्या बंद असल्याने गरीब, सामान्य प्रवाशांचे होत असलेले हाल आणि आपबीती कथन केली. त्यानुसार खासदार नवनीत राणा यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वे बंद केलेल्या सर्व पॅसेंजर सुरू करण्याची मागणी केली. रेल्वे बोर्डाने मंगळवारी अधिकृत पत्र जारी करून बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. १८ जुलैपासून पुन्हा पॅसेंजर धावणार आहे. नागपूर-भुसावळ (५१२८५) ही जुलै रोजी सुरू होईल. नागपूर-वर्धा (५१२६०) ही पॅसेजर १८ जुलै रोजी धावणार आहे.तर भुसावळ - नागपूर (५१२८५) ही पॅसेंजर १९ जुलै रोजी सुटेल. भुसावळ-वर्धा (५११९७), वर्धा- भुसावळ (५११९८) ही १८ जुलै रोजी धावणार आहे. पॅसेंजर सुरू होत असल्याने सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.या पॅसेंजर सुरू होतीलनागपूर-भुसावळ (५१२८६), भुसावळ-नागपूर (५१२८५), नागपूर-वर्धा (५१२६०), वर्धा- नागपूर (५१२५९), वर्धा-अमरावती (५१२६१), अमरावती-वर्धा (५१२६२), अजनी-काजीपेठ (५७१३५), काजीपेठ-अजनी (५७१३६), भुसावळ-वर्धा (५११९७), वर्धा-भुसावळ (५११९८)प्रवासी संख्येत घट; उत्पन्न कायमअडिच महिन्यापासून पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे दरमहा १० ते १२ हजार प्रवासी घटले आहेत. मात्र, रेल्वेच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम झाला नाही, अशी माहिती एका वाणिज्य विभागातील अधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पॅसेंजर गाड्या बंद असल्या तरी एक्स्प्रेस व अन्य रेल्वे गाड्यांनी नागरिक प्रवास करतात. यंदा जून महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत प्रवासी संख्या १४ हजारांनी रोडावल्याचा अहवाल बडनेरा रेल्वे स्थानकाच्या वाणिज्य विभागाने वरिष्ठांकडे पाठविला होता.रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना पॅसेंजर सुरू करण्याबाबत निवेदन सादर केले होते. पॅसेंजर बंद असल्यामुळे गरीब, सामान्य प्रवाशांचे होणारे हाल आणि आर्थिक नुकसानाची माहिती दिली होती. मंगळवारी रेल्वे बोर्डाने पॅसेंजर सुरू करुन गरीब प्रवाशांना न्याय दिला आहे.- नवनीत रवि राणाखासदार, अमरावती.पॅसेंजर गाड्यांमुळे लहान, मोठ्या रेल्वे स्थानकावर कमी पैशात ये-जा करणे सुकर होते. मात्र अडिच महिन्यापासून पॅसेंजर गाड्या बंद होत्या. त्या पूर्ववत झाल्याने दिलासा मिळाला.- रोशन चव्हाण, रेल्वे प्रवासी, बडनेरा.