शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बंद पॅसेंजर गाड्या गुरुवारपासून धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:56 IST

भुसावळ-नागपूर मार्गावर गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेल्या १० पॅसेंजर फेऱ्या गुरुवार, १८ जुलैपासून पुन्हा सुरू होणार आहे. खासदार नवनीत रवि राणा यांच्या सततच्या पाठपुराव्याने रेल्वे मंत्रालयाने गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देअडीच महिन्यानंतर जाग : नवनीत राणांच्या पाठपुराव्याला यश, रेल्वे बोर्डाने पत्र काढले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भुसावळ-नागपूर मार्गावर गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेल्या १० पॅसेंजर फेऱ्या गुरुवार, १८ जुलैपासून पुन्हा सुरू होणार आहे. खासदार नवनीत रवि राणा यांच्या सततच्या पाठपुराव्याने रेल्वे मंत्रालयाने गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.नागपूर-भुसावळ मार्गाचे काम करण्याच्या नावाखाली १० फेºया पॅसेंजरच्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे दैनदिन रेल्वे गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांनी खासदार राणा यांची भेट भेटली. पॅसेंजर गाड्या बंद असल्याने गरीब, सामान्य प्रवाशांचे होत असलेले हाल आणि आपबीती कथन केली. त्यानुसार खासदार नवनीत राणा यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वे बंद केलेल्या सर्व पॅसेंजर सुरू करण्याची मागणी केली. रेल्वे बोर्डाने मंगळवारी अधिकृत पत्र जारी करून बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. १८ जुलैपासून पुन्हा पॅसेंजर धावणार आहे. नागपूर-भुसावळ (५१२८५) ही जुलै रोजी सुरू होईल. नागपूर-वर्धा (५१२६०) ही पॅसेजर १८ जुलै रोजी धावणार आहे.तर भुसावळ - नागपूर (५१२८५) ही पॅसेंजर १९ जुलै रोजी सुटेल. भुसावळ-वर्धा (५११९७), वर्धा- भुसावळ (५११९८) ही १८ जुलै रोजी धावणार आहे. पॅसेंजर सुरू होत असल्याने सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.या पॅसेंजर सुरू होतीलनागपूर-भुसावळ (५१२८६), भुसावळ-नागपूर (५१२८५), नागपूर-वर्धा (५१२६०), वर्धा- नागपूर (५१२५९), वर्धा-अमरावती (५१२६१), अमरावती-वर्धा (५१२६२), अजनी-काजीपेठ (५७१३५), काजीपेठ-अजनी (५७१३६), भुसावळ-वर्धा (५११९७), वर्धा-भुसावळ (५११९८)प्रवासी संख्येत घट; उत्पन्न कायमअडिच महिन्यापासून पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे दरमहा १० ते १२ हजार प्रवासी घटले आहेत. मात्र, रेल्वेच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम झाला नाही, अशी माहिती एका वाणिज्य विभागातील अधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पॅसेंजर गाड्या बंद असल्या तरी एक्स्प्रेस व अन्य रेल्वे गाड्यांनी नागरिक प्रवास करतात. यंदा जून महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत प्रवासी संख्या १४ हजारांनी रोडावल्याचा अहवाल बडनेरा रेल्वे स्थानकाच्या वाणिज्य विभागाने वरिष्ठांकडे पाठविला होता.रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना पॅसेंजर सुरू करण्याबाबत निवेदन सादर केले होते. पॅसेंजर बंद असल्यामुळे गरीब, सामान्य प्रवाशांचे होणारे हाल आणि आर्थिक नुकसानाची माहिती दिली होती. मंगळवारी रेल्वे बोर्डाने पॅसेंजर सुरू करुन गरीब प्रवाशांना न्याय दिला आहे.- नवनीत रवि राणाखासदार, अमरावती.पॅसेंजर गाड्यांमुळे लहान, मोठ्या रेल्वे स्थानकावर कमी पैशात ये-जा करणे सुकर होते. मात्र अडिच महिन्यापासून पॅसेंजर गाड्या बंद होत्या. त्या पूर्ववत झाल्याने दिलासा मिळाला.- रोशन चव्हाण, रेल्वे प्रवासी, बडनेरा.