शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

१२ हजार टीव्ही आजपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2017 00:26 IST

जिल्हा ग्रामीणमधील केबल जोडणीधारकांना २० जानेवारी २०१७ च्या अधिसूचनेन्वये ३१ मार्चपर्यंत सेटटॉप बॉक्स बसविणे अनिवार्य केले होते.

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : ३१ मार्चला संपली मुदतअमरावती : जिल्हा ग्रामीणमधील केबल जोडणीधारकांना २० जानेवारी २०१७ च्या अधिसूचनेन्वये ३१ मार्चपर्यंत सेटटॉप बॉक्स बसविणे अनिवार्य केले होते. मात्र विहित मुदतीत १२ हजारांवर केबल जोडणीधारकांनी सेटटॉप बॉक्स न बसविल्यामुळे १ एप्रिलपासून त्यांचा टीव्ही बंद राहणार आहे. केबल टीव्ही डिजिटायझेशनचे नियमन केंद्र सरकारने ट्रायकडे दिले आहे. केबल व्यवसायात पारदर्शकता आणणे व सेवेत सुधारणा करणे हा यामागचा उद्देश आहे. फेज-चार अंतर्गत ३१ मार्चपूर्वी सेट टॉप बॉक्स बसविण्याचे निर्देश सूचना मंत्रालय नवी दिल्लीद्वारा देण्यात आल्या होत्या. जे बहुविध यंत्रणा परिचालक व केबल आॅपरेटर्स हे सेटटॉप बॉक्सशिवाय केबल सेवेचे प्रसारण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. डिजिटल सेटटॉप बॉक्सेस खरेदी करणे व तो ग्राहकांना पुरविणे ही जबाबदारी त्यांचीच आहे. बीआयएस स्टँडर्ड व्यतिरिक्त जोडणीखर्च अभिप्रेत आहे. मात्र याव्यतिरिक्त ग्राहकांजवळून अधिक रक्कम वसुली केल्यास कारवाई केली जाणार आहे. १ एप्रिलनंतर सेटटॉप बॉक्सअभावी केबल प्रसारण बंद पडल्यास किंवा सेट टॉप बॉक्सचा पुरवठा कमी पडल्यामुळे जनतेचा रोष निर्माण झाल्यास याविषयी केबल टेलीव्हिजन नेटवर्क अ‍ॅक्ट १९९५ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)अशी आहे जिल्ह्याची स्थितीफेज-३ मध्ये १५ गावांचा समावेश आहे. यामध्ये ४६ हजार ९३२ केबल जोडणी आहेत. यामध्ये ४५ हजार ६४७ सेट टॉप बॉक्स बसविण्यात आलेत. अद्याप १२८५ बसविणे शिल्लक आहे. ही ९५.२६ टक्केवारी आहे. फेज ४ मध्ये १२७३ गावे आहेत व ३० हजार ३०१ जोडणी संख्या आहे. आतापर्यंत १०,०५२ सेट टॉप बॉक्स लावण्यात आले आहे. अद्याप १२०१३ बसविण्यात यायचे आहे. यापूर्वी अधिसुचनेन्वये सेट टॉप बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या केबल जोडणीधारकांनी सेट टॉप बॉक्स बसविला नाही त्यांचे प्रसारण १ एप्रिलपासून बंद होणार आहे. मनोरंजन व ज्ञान मिळविण्यासाठी सेट टॉप बॉक्स बसवून घ्यावे.- खुशालसिंग परदेशी, अप्पर जिल्हाधिकारी