शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

१२ हजार टीव्ही आजपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2017 00:26 IST

जिल्हा ग्रामीणमधील केबल जोडणीधारकांना २० जानेवारी २०१७ च्या अधिसूचनेन्वये ३१ मार्चपर्यंत सेटटॉप बॉक्स बसविणे अनिवार्य केले होते.

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : ३१ मार्चला संपली मुदतअमरावती : जिल्हा ग्रामीणमधील केबल जोडणीधारकांना २० जानेवारी २०१७ च्या अधिसूचनेन्वये ३१ मार्चपर्यंत सेटटॉप बॉक्स बसविणे अनिवार्य केले होते. मात्र विहित मुदतीत १२ हजारांवर केबल जोडणीधारकांनी सेटटॉप बॉक्स न बसविल्यामुळे १ एप्रिलपासून त्यांचा टीव्ही बंद राहणार आहे. केबल टीव्ही डिजिटायझेशनचे नियमन केंद्र सरकारने ट्रायकडे दिले आहे. केबल व्यवसायात पारदर्शकता आणणे व सेवेत सुधारणा करणे हा यामागचा उद्देश आहे. फेज-चार अंतर्गत ३१ मार्चपूर्वी सेट टॉप बॉक्स बसविण्याचे निर्देश सूचना मंत्रालय नवी दिल्लीद्वारा देण्यात आल्या होत्या. जे बहुविध यंत्रणा परिचालक व केबल आॅपरेटर्स हे सेटटॉप बॉक्सशिवाय केबल सेवेचे प्रसारण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. डिजिटल सेटटॉप बॉक्सेस खरेदी करणे व तो ग्राहकांना पुरविणे ही जबाबदारी त्यांचीच आहे. बीआयएस स्टँडर्ड व्यतिरिक्त जोडणीखर्च अभिप्रेत आहे. मात्र याव्यतिरिक्त ग्राहकांजवळून अधिक रक्कम वसुली केल्यास कारवाई केली जाणार आहे. १ एप्रिलनंतर सेटटॉप बॉक्सअभावी केबल प्रसारण बंद पडल्यास किंवा सेट टॉप बॉक्सचा पुरवठा कमी पडल्यामुळे जनतेचा रोष निर्माण झाल्यास याविषयी केबल टेलीव्हिजन नेटवर्क अ‍ॅक्ट १९९५ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)अशी आहे जिल्ह्याची स्थितीफेज-३ मध्ये १५ गावांचा समावेश आहे. यामध्ये ४६ हजार ९३२ केबल जोडणी आहेत. यामध्ये ४५ हजार ६४७ सेट टॉप बॉक्स बसविण्यात आलेत. अद्याप १२८५ बसविणे शिल्लक आहे. ही ९५.२६ टक्केवारी आहे. फेज ४ मध्ये १२७३ गावे आहेत व ३० हजार ३०१ जोडणी संख्या आहे. आतापर्यंत १०,०५२ सेट टॉप बॉक्स लावण्यात आले आहे. अद्याप १२०१३ बसविण्यात यायचे आहे. यापूर्वी अधिसुचनेन्वये सेट टॉप बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या केबल जोडणीधारकांनी सेट टॉप बॉक्स बसविला नाही त्यांचे प्रसारण १ एप्रिलपासून बंद होणार आहे. मनोरंजन व ज्ञान मिळविण्यासाठी सेट टॉप बॉक्स बसवून घ्यावे.- खुशालसिंग परदेशी, अप्पर जिल्हाधिकारी