शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

१२ हजार टीव्ही आजपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2017 00:26 IST

जिल्हा ग्रामीणमधील केबल जोडणीधारकांना २० जानेवारी २०१७ च्या अधिसूचनेन्वये ३१ मार्चपर्यंत सेटटॉप बॉक्स बसविणे अनिवार्य केले होते.

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : ३१ मार्चला संपली मुदतअमरावती : जिल्हा ग्रामीणमधील केबल जोडणीधारकांना २० जानेवारी २०१७ च्या अधिसूचनेन्वये ३१ मार्चपर्यंत सेटटॉप बॉक्स बसविणे अनिवार्य केले होते. मात्र विहित मुदतीत १२ हजारांवर केबल जोडणीधारकांनी सेटटॉप बॉक्स न बसविल्यामुळे १ एप्रिलपासून त्यांचा टीव्ही बंद राहणार आहे. केबल टीव्ही डिजिटायझेशनचे नियमन केंद्र सरकारने ट्रायकडे दिले आहे. केबल व्यवसायात पारदर्शकता आणणे व सेवेत सुधारणा करणे हा यामागचा उद्देश आहे. फेज-चार अंतर्गत ३१ मार्चपूर्वी सेट टॉप बॉक्स बसविण्याचे निर्देश सूचना मंत्रालय नवी दिल्लीद्वारा देण्यात आल्या होत्या. जे बहुविध यंत्रणा परिचालक व केबल आॅपरेटर्स हे सेटटॉप बॉक्सशिवाय केबल सेवेचे प्रसारण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. डिजिटल सेटटॉप बॉक्सेस खरेदी करणे व तो ग्राहकांना पुरविणे ही जबाबदारी त्यांचीच आहे. बीआयएस स्टँडर्ड व्यतिरिक्त जोडणीखर्च अभिप्रेत आहे. मात्र याव्यतिरिक्त ग्राहकांजवळून अधिक रक्कम वसुली केल्यास कारवाई केली जाणार आहे. १ एप्रिलनंतर सेटटॉप बॉक्सअभावी केबल प्रसारण बंद पडल्यास किंवा सेट टॉप बॉक्सचा पुरवठा कमी पडल्यामुळे जनतेचा रोष निर्माण झाल्यास याविषयी केबल टेलीव्हिजन नेटवर्क अ‍ॅक्ट १९९५ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)अशी आहे जिल्ह्याची स्थितीफेज-३ मध्ये १५ गावांचा समावेश आहे. यामध्ये ४६ हजार ९३२ केबल जोडणी आहेत. यामध्ये ४५ हजार ६४७ सेट टॉप बॉक्स बसविण्यात आलेत. अद्याप १२८५ बसविणे शिल्लक आहे. ही ९५.२६ टक्केवारी आहे. फेज ४ मध्ये १२७३ गावे आहेत व ३० हजार ३०१ जोडणी संख्या आहे. आतापर्यंत १०,०५२ सेट टॉप बॉक्स लावण्यात आले आहे. अद्याप १२०१३ बसविण्यात यायचे आहे. यापूर्वी अधिसुचनेन्वये सेट टॉप बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या केबल जोडणीधारकांनी सेट टॉप बॉक्स बसविला नाही त्यांचे प्रसारण १ एप्रिलपासून बंद होणार आहे. मनोरंजन व ज्ञान मिळविण्यासाठी सेट टॉप बॉक्स बसवून घ्यावे.- खुशालसिंग परदेशी, अप्पर जिल्हाधिकारी