शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
4
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
5
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
6
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
7
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
8
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
9
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
10
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
11
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
12
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
13
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
14
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
15
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
16
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
17
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
18
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
19
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
20
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?

इयत्ता १२ वीची पुरवणी परीक्षा ९ जुलैपासून

By admin | Updated: May 26, 2016 01:17 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातंर्गत उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) ची परीक्षा ९ जुलैपासून घेतली जाणार आहे.

शिक्षण मंडळाचा निर्णय : संजय यादगिरे यांची माहितीअमरावती : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातंर्गत उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) ची परीक्षा ९ जुलैपासून घेतली जाणार आहे. त्यामुळे नापास झालेल्या विद्यार्थ्यांना ४३ दिवसांनंतर पुन्हा परीक्षेला सामोरे जावे तर लागणार आहेच; मात्र शैक्षणिक वर्षही वाया जाणार नाही. इयत्ता १० आणि १२ वीची परीक्षा सोबत सुरु होणार असल्याचे शिक्षण मंडळाचे सचिव संजय यादगिरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.यावर्षी इयत्ता १२ वीत अमरावती जिल्ह्यातील ३८१ कनिष्ठ महाविद्यालयांतून ३५२३१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ३५१७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून ३०२६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे ९ जुलैपासून सुरू होणाऱ्या १२ वीच्या पुरवणी परीक्षेकरिता ४९१४ एवढ्या विद्यार्थ्यांना तयारी करावी लागणार आहे. पुरवणी परीक्षेसाठी अर्ज जून महिन्यातच महाविद्यालयात सादर क रावा लागणार आहे. गतवर्षी इयत्ता १० वीचा निकाल लागल्यानंतर नापास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये, यासाठी लगेच परीक्षेचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार इयत्ता १० वीची परीक्षा घेऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक सत्रात पुढील वर्गात प्रवेश घेता आला. आता हाच प्रयोग इयत्ता १२ वीतील विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आला असून ९ जुलैपासून परीक्षा सुरू होणार आहे. जुलै महिन्यात परीक्षा आटोपून आॅगस्टमध्ये निकाल लावण्याची तयारी शिक्षण मंडळाने दर्शविली आहे. परीक्षेनंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेता येणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया न जाता निकाल लागताच प्रवेश मिळणार असल्याने हा निर्णय विद्यार्थ्यासाठी लाभदायक ठरणारा असल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)