शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

शहरातील फलकबाज अंगावर !

By admin | Updated: July 11, 2017 00:04 IST

मध्यवर्ती चौकांसह शहरातील गल्लीबोळात फलकबाजांनी अक्षरश: थैमान घातले आहे.

महापालिका ‘धृतराष्ट्र ’ : फलकांचे बेकायदेशीर अतिक्रमणलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मध्यवर्ती चौकांसह शहरातील गल्लीबोळात फलकबाजांनी अक्षरश: थैमान घातले आहे. राजकमल चौक व अन्य मध्यवर्ती चौकातील ही फलकबाजी अमरावतीकरांच्या अंगावर आली असताना महापालिकेचा बाजार व परवाना विभाग धृतराष्ट्र बनल्याने नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.फलकबाजांचे वाढते अतिक्रमण वाहतुकीला अडचणीचे ठरले असताना त्यांचेविरूद्ध कारवाई करण्याची बिशाद नसल्याने याफलकबाजांचे फावले आहे. महापालिकेला एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा तर नाही ना, अशी शंका घेण्याइतपत मध्यवर्ती चौकातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. राजकमल चौकातील उड्डाणपूल, जयस्तंभ चौकस्थित महात्मा गांधी पुतळा परिसर, चित्रा चौक स्थित महात्मा फुले पुतळा परिसर आणि नागपुरी गेट चौकातील सौंदर्यीकरण परिसरात कुठल्याही प्रकारचे फलक वा बॅनर लावण्यास बंदी आहे. मनपाने तसे सूचना फलक लावले आहेत. मात्र, मनपाची ही सूचना अव्हेरून शहरातील फलकबाजांनी नेमके याच परिसराला लक्ष्य केले आहे. राजकमल चौकाकडून बडनेराकडे जाणाऱ्या मार्गावर व सीतारामबाबा संकुलाच्या कॉर्नरवर हटकून दररोज वेगवेगळे बॅनर व पोस्टर्स लावले जातात. याठिकाणी पोस्टर लावण्याची अहमहमिका चालते. एकाच्या वाढदिवसाचे पोस्टर उतरले की दुसऱ्या दिवशी दुसऱ्याचे अधिक मोठे अन् आकर्षक पोस्टर येथे लावले जाते. राजकमल चौकात वृत्तपत्र व्यावसायिक बसतात. त्याबाजूने नव्याने सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. तेथेही महापालिकेच्या नाकावर टिच्चून मोठमोठे बॅनर आणि होर्डिंग्ज लावले जात असून त्यासाठी मनपाची कोणतीच परवानगी घेतली जात नाही. हे बॅनर्स, पोस्टर्स सत्ताधिशांसह महापालिका आणि अन्य संस्थांमध्ये कार्यरत अधिकारी, राजकीय मंडळींचे असल्याने बाजार परवाना विभागही ते काढण्याचे धाडस करीत नाही. एकट्या राजकमल चौकापुरती ही परिस्थिती नाही. उड्डाणपूल, तर या जाहिरात फलकांनी अक्षरश: व्यापला आहे. शहरातील जयस्तंभ चौक, नमुना, मालविय चौक, चित्रा चौक, सरोज चौक, राजापेठ, बडनेरा मार्ग, बापट चौक, नागपुरी गेट, शेगाव नाका चौक, कठोरा नाका चौकासह शहरातील अनेक चौकांना फलकांनी वेढा घातला आहे. शहरातील उड्डाणपूल असो वा रस्ते दुभाजक. फलकबाजांनी कोणतेच स्थान सोडलेले नाही. यावर महापालिकेचा अंकुश राहिला नसल्याने ही फलकबाजी अमरावतीकरांच्या अंगावर आली आहे‘ते’ फलक अपघातप्रवण राजकमल चौकस्थित संकुलाच्या कोपऱ्यावर दररोज मोठमोठी राजकीय फलके राजरोसपणे आणि बेकायदेशिररित्या लावण्यात येतात. सिग्नलवर वाहने थांबली असताना वाहनचालकांचे लक्षही विचलित होते. याशिवाय रस्त्याच्या बाहेर ही फलके डोकावत असल्याने अपघाताची शक्यता संभवते. मात्र, ही जीवघेणी फलके काढून संबंधितांवर कारवाईचा आसूड ओढवला जात नसल्याने राजकीय कार्यकर्त्यांसह आदी फलक लावणारे निरंकुश झाले आहेत.सौंदर्यीकरणाचे विद्रुपीकरणसौंदर्यीकरणाचे विद्रुपीकरण केल्यास संबंधितांविरूद्ध फौजदारी कारवाई केली जाते. कोचिंग क्लासधारकांविरूद्ध चार दिवसांपूर्वीच ही कारवाई करण्यात आली. मात्र, राजकमल चौकातील दोन्ही कॉर्नरवर अपघाताला निमंत्रण देणारे फ्लेक्स, बॅनर्स दररोज लावले जात असताना बाजार परवाना विभागाने घेतलेले झोपेचे सोंग संताप आणणारे आहे. उड्डाणपूलासह शहरातील अनेक चौकांमध्ये केलेल्या सौंदर्यीकरणावरही पोस्टर्स चिटकविल्याने तो भाग विद्रुप झाला आहे.