पान २ ची बॉटम
बेदखल : ना सॅनिटायझर, ना कुठला अटकाव
मोर्शी : येथील तहसील कार्यालयात असलेल्या सेतु सुविधा केंद्रामध्ये दररोज हजारो नागरिक आपल्या विविध कामांकरिता येत असतात. मात्र, येथे कुणाच्याही चेहºयाला मास्क आढळत नाही. त्यामुळे गर्दीच्या या ठिकाणाहून कोरोना संसर्ग पसरण्याची दाट शक्यता आहे. मागील आठवड्यापर्यंत कोरोना रुग्णांचा आकडा सरासरी शंभराच्या आत असताना तीन दिवसांपासून तो ३५० च्या आसपास पोहोचला आहे. त्यात मोर्शी व तालुक्यातील रुग्णांचादेखील समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासनाने त्यांच्या अखत्यारीतील सेतु, तहसील व अन्य कार्यालय परिसरात कारवाईचा दंडुका उगारावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
येथील सेतु सुविधा केंद्रात दररोज अनेक लोक जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, निराधार योजना, घरकुल योजना, प्रतिज्ञापत्रे आदी कामांकरिता ये-जा करतात. परंतु, एकाही व्यक्तीच्या चेहºयाला मास्क लावलेले नसते. त्यामुळे या ठिकाणी कोरोना संसर्ग होण्याचा धोका अधिक वाढला आहे.
दर्शनी भागात जनजागृतीपर फलक
सेतु सुविधा केंद्राच्या दर्शनी भागात कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी मास्कशिवाय प्रवेश नसल्याचे फलक लावण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात ना लोक मास्क घालून सेतुत प्रवेश करतात, ना विनामास्क प्रवेश करणाºयाला कुणी अटकाव घातला जातो. हॅन्ड सॅनिटायझर,फिजिकल डिस्टन्सिंग तर केव्हाचेच बाद झाले आहे. सेतुत कुठेही हॅन्ड सॅनिटायझर ठेवलेले नाही. पारदर्शक पडदेदेखील कालबाह्य ठरले आहेत.
कोट
नागरिकांसाठी ‘नो मास्क, नो सर्व्हिस’ अनिवार्य करायला हवे. प्रभावी उपाययोजनांची जबाबदारी जशी प्रशासनाची आहे, तेवढीच ती नागरिकांची देखील आहे.
नितीन उमाळे, नगरसेवक, मोर्शी
------------