शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

पाणी प्रश्नावर नागरिक आक्रमक, घागर फोडो आंदोलनाचा इशारा

By उज्वल भालेकर | Updated: April 3, 2024 18:41 IST

अनेकवेळा तक्रारी करूनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने याची दखल घेतलेली नाही.

अमरावती: शहरातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई असून, अस्वच्छ पाणीपुरवठा होत आहे. यासंदर्भात अनेकवेळा तक्रारी करूनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने याची दखल घेतलेली नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाच्या नेतृत्वात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर नागरिकांनी बुधवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी निवेदनातून मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठा न झाल्यास अधिकाऱ्यांच्या दालनातच घागर फोडो आंदोलनाचा इशाराही यावेळी दिला.

शहरातील रवीनगर, वल्लभनगर, पुरुषोत्तमनगर, अंबा विहार, पार्वतीनगर या परिसरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या परिसराला स्वस्तिकनगर तसेच पार्वतीनगर येथील पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा होतो. मात्र मागील सहा महिन्यांपासून अस्वच्छ तसेच अळ्यायुक्त पाणी येत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने निवेदनातून केला आहे. यासंदर्भात अनेकवेळा अधिकाऱ्यांना लेखी व तोंडी स्वरुपात तक्रार करुन देखील याची दखल घेण्यात आलेली नाही. तसेच मजीप्रा कार्यालयाने पाणी सोडण्याचे वेळापत्रक देखील बदलविले आहे. 

या सर्व अनागोंदी कारभाराला या परिसरातील महिला प्रचंड त्रस्त झालेल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत बादलीभर देखील पाणी मिळत नाही. त्यातही एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची गरज लक्षात घेता पाणीटंचाई संदर्भात तत्काळ उपाययोजना करावी, अन्यथा युवा सेना व शिवसेना महिला आघाडी मजीप्रा अधिकाऱ्यांच्या कक्षात घागर फोडो आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रीती बंड, शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख राहुल माटोडे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने स्थानिक महिला व नागरिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडकले होते.

टॅग्स :Amravatiअमरावती