शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

पाणी प्रश्नावर नागरिक आक्रमक, घागर फोडो आंदोलनाचा इशारा

By उज्वल भालेकर | Updated: April 3, 2024 18:41 IST

अनेकवेळा तक्रारी करूनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने याची दखल घेतलेली नाही.

अमरावती: शहरातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई असून, अस्वच्छ पाणीपुरवठा होत आहे. यासंदर्भात अनेकवेळा तक्रारी करूनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने याची दखल घेतलेली नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाच्या नेतृत्वात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर नागरिकांनी बुधवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी निवेदनातून मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठा न झाल्यास अधिकाऱ्यांच्या दालनातच घागर फोडो आंदोलनाचा इशाराही यावेळी दिला.

शहरातील रवीनगर, वल्लभनगर, पुरुषोत्तमनगर, अंबा विहार, पार्वतीनगर या परिसरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या परिसराला स्वस्तिकनगर तसेच पार्वतीनगर येथील पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा होतो. मात्र मागील सहा महिन्यांपासून अस्वच्छ तसेच अळ्यायुक्त पाणी येत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने निवेदनातून केला आहे. यासंदर्भात अनेकवेळा अधिकाऱ्यांना लेखी व तोंडी स्वरुपात तक्रार करुन देखील याची दखल घेण्यात आलेली नाही. तसेच मजीप्रा कार्यालयाने पाणी सोडण्याचे वेळापत्रक देखील बदलविले आहे. 

या सर्व अनागोंदी कारभाराला या परिसरातील महिला प्रचंड त्रस्त झालेल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत बादलीभर देखील पाणी मिळत नाही. त्यातही एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची गरज लक्षात घेता पाणीटंचाई संदर्भात तत्काळ उपाययोजना करावी, अन्यथा युवा सेना व शिवसेना महिला आघाडी मजीप्रा अधिकाऱ्यांच्या कक्षात घागर फोडो आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रीती बंड, शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख राहुल माटोडे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने स्थानिक महिला व नागरिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडकले होते.

टॅग्स :Amravatiअमरावती