शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सिटिझन फीडबॅकवर मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 22:50 IST

नववर्षाच्या पहिल्या आठवड्यापासून संपूर्ण देशभरातील ४०४१ शहरात स्वच्छ सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ४००० गुणांच्या या परीक्षेची सर्वाधिक मदार नागरिकांच्या अभिप्रायावर अवलंबून आहे.

ठळक मुद्देसंकेतस्थळावर नोंदवा अभिप्राय : १९६९ टोल फ्री क्रमांक

आॅनलाईन लोकमतअमरावती : नववर्षाच्या पहिल्या आठवड्यापासून संपूर्ण देशभरातील ४०४१ शहरात स्वच्छ सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ४००० गुणांच्या या परीक्षेची सर्वाधिक मदार नागरिकांच्या अभिप्रायावर अवलंबून आहे. नागरिकांच्या अभिप्राय व सूचनांसाठी १४०० गुण असून यात अमरावतीकरांनी अधिकाधिक सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिका आयुक्त हेमंत पवार, महापौर संजय नरवणे आणि स्थायी सभापती तुषार भारतीय यांनी केले आहे. ‘मिस्ड कॉल सिटिझन फीडबॅकमध्ये शहर शून्य ’या वृत्तातून ‘लोकमत'ने त्यावर प्रकाशझोत टाकला. त्यापार्श्वभूमिवर प्रशासन व पदाधिकाºयांकडून पुन्हा एकदा लोकसहभागाचे जोरकस आवाहन करण्यात आले आहे.अमरावतीकर नागरिकांनी १९६९ या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा, त्यानंतर मिस्ड कॉल देणाºया नागरिकांना स्वच्छ भारत मिशनकडून येणाºया कॉलवर सहा प्रश्न विचारण्यात येतील, त्या प्रश्नांची सकारात्मक उत्तरे द्यावीत, जेणेकरून अमरावती शहर स्वच्छ सर्वेक्षणाच्या गुणांकनात अव्वल येऊ शकेल. मिसकॉल दिल्यावर अवघ्या पाच ते सात मिनिटात ९११२०६२००४०० या क्रमांकावरून मोबाईलधारकांशी संपर्क साधण्यात येतो. १९६९ या टोल फ्री क्रमांकावर प्रतिक्रिया नोंदविण्यावर १०० गुण अवलंबून आहेत. १९६९ या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल देऊन नागरिकांना त्यांच्या प्रतिक्रिया द्यावयाच्या आहेत.४ हजार गुणांच्या या परीक्षेत सेवास्तरावरील प्रगती व नागरिकांच्या प्रतिक्रियांसाठी प्रत्येकी १४०० व प्रत्यक्ष निरीक्षणाकरिता १२०० गुण आहेत. स्वच्छ सर्वेक्षणास सामोरे जात असताना शहराच्या गुणांकनाची मदार ‘सिटिझन फीडबॅकवर’ अवलंबून आहे. स्वच्छ सर्वेक्षणादरम्यान क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियाचे असेसर्स नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊन शहराचे गुणांकन ठरविणार आहेत.संकेतस्थळावर लिंक उपलब्धशहरातील एकंदरीत स्वच्छतेबाबत अमरावतीकर नागरिक स्वच्छ डॉट सिटी आणि स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या संकेतस्थळावरसुद्धा अभिप्राय नोंदवू शकतात. या दोन्ही संकेतस्थळावर नागरिकांच्या प्रतिक्रियेसाठी स्वतंत्र लिंक देण्यात आली आहे. त्यावरही अमरावतीकरांनी अभिप्रय नोंदवून स्वच्छ सर्वेक्षणात शहराला उत्तम गुणांकन मिळविण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आयुक्त हेमंत पवार व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.