शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांवर पुन्हा सिबिल सक्ती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 14:21 IST

Amravati : ६५० पर्यंत स्कोअर नसल्यास अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पीक कर्जासाठी पुन्हा राष्ट्रीयीकृत बँकांद्वारा सिबील स्कोअर पाहल्या जात आहे. प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गतवर्षीच्या हंगामात बँकांना फटकारले होते. यंदा पुन्हा बँकांनी हा प्रकार सुरू केला असल्याने शेतकऱ्यांना सावकारांचे उंबरठे झिजवावे लागतील, अशी स्थिती ओढावण्याची शक्यता आहे.

गतवर्षीच्या हंगामापूर्वीच राज्यस्तरीय बैंकर्स समितीचा (एसएलबीसी) निर्णय झाल्यानंतर सर्व बँकांना तसे कळविण्यात आले होते. शिवाय जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील ९ मे २०२३ च्या जिल्हा बैठकीत बँकांना निर्देश दिले होते. त्यामुळे या प्रकाराला काही प्रमाणात पायबंद घातल्या गेला. त्यानंतर यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकरी पीक कर्जाची मागणी करीत आहे.

यावेळी बँकांद्वारा शेतकऱ्यांचे सिबील स्कोअर तपासणी करीत आहे. यामध्ये ६५० पेक्षा कमी असल्यास बँका कर्ज नाकारत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. अडचणीच्या काळात एखाद्या शेतकऱ्याने खासगी फायनान्सचे कर्ज घेतल्यानंतर कर्जाची किस्त भरण्यास उशीर झाला असल्यास त्याचा परिणाम त्यांच्या सिबील स्कोअरवर होतो ब बँकांद्वारा पडताळणी केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कर्ज नाकारले जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

मल्टिफायनान्स नको म्हणून स्कोअरची तपासणीशेतकऱ्यांनी अन्य वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले आहे का, शेतकरी त्या संस्थांचे थकबाकीदार आहे का, याची खातरजमा करण्यासाठी संबंधित बँकांकडून शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर पाहिला जात असल्याची माहिती अग्रणी बँकेच्या जिल्हा व्यवस्थापकांनी दिली. १.६० लाखांपर्यंत मॉर्गेज करण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.

पीक कर्ज देताना सिबिल स्कोअरची पडताळणी केली जाते. एकापेक्षा अधिक संस्थांकडून कर्ज घेतले आहे का, याची पडताळणी केल्या जाते. नियमित शेतकऱ्यांना लगेच कर्ज उपलब्ध होते.- श्याम शर्मा, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बँक

बँका पीक कर्जासाठी प्रत्येक वेळा नवनव्या अटी लादतात. दोन वर्षांपासून सिबील स्कोअर पाहिल्या जात असल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. शासनाने या जाचक अटी रद्द करायला पाहिजे.- अशोक वानखडे, शेतकरी 

टॅग्स :farmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र