शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांवर पुन्हा सिबिल सक्ती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 14:21 IST

Amravati : ६५० पर्यंत स्कोअर नसल्यास अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पीक कर्जासाठी पुन्हा राष्ट्रीयीकृत बँकांद्वारा सिबील स्कोअर पाहल्या जात आहे. प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गतवर्षीच्या हंगामात बँकांना फटकारले होते. यंदा पुन्हा बँकांनी हा प्रकार सुरू केला असल्याने शेतकऱ्यांना सावकारांचे उंबरठे झिजवावे लागतील, अशी स्थिती ओढावण्याची शक्यता आहे.

गतवर्षीच्या हंगामापूर्वीच राज्यस्तरीय बैंकर्स समितीचा (एसएलबीसी) निर्णय झाल्यानंतर सर्व बँकांना तसे कळविण्यात आले होते. शिवाय जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील ९ मे २०२३ च्या जिल्हा बैठकीत बँकांना निर्देश दिले होते. त्यामुळे या प्रकाराला काही प्रमाणात पायबंद घातल्या गेला. त्यानंतर यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकरी पीक कर्जाची मागणी करीत आहे.

यावेळी बँकांद्वारा शेतकऱ्यांचे सिबील स्कोअर तपासणी करीत आहे. यामध्ये ६५० पेक्षा कमी असल्यास बँका कर्ज नाकारत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. अडचणीच्या काळात एखाद्या शेतकऱ्याने खासगी फायनान्सचे कर्ज घेतल्यानंतर कर्जाची किस्त भरण्यास उशीर झाला असल्यास त्याचा परिणाम त्यांच्या सिबील स्कोअरवर होतो ब बँकांद्वारा पडताळणी केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कर्ज नाकारले जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

मल्टिफायनान्स नको म्हणून स्कोअरची तपासणीशेतकऱ्यांनी अन्य वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले आहे का, शेतकरी त्या संस्थांचे थकबाकीदार आहे का, याची खातरजमा करण्यासाठी संबंधित बँकांकडून शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर पाहिला जात असल्याची माहिती अग्रणी बँकेच्या जिल्हा व्यवस्थापकांनी दिली. १.६० लाखांपर्यंत मॉर्गेज करण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.

पीक कर्ज देताना सिबिल स्कोअरची पडताळणी केली जाते. एकापेक्षा अधिक संस्थांकडून कर्ज घेतले आहे का, याची पडताळणी केल्या जाते. नियमित शेतकऱ्यांना लगेच कर्ज उपलब्ध होते.- श्याम शर्मा, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बँक

बँका पीक कर्जासाठी प्रत्येक वेळा नवनव्या अटी लादतात. दोन वर्षांपासून सिबील स्कोअर पाहिल्या जात असल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. शासनाने या जाचक अटी रद्द करायला पाहिजे.- अशोक वानखडे, शेतकरी 

टॅग्स :farmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र