शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातल्या राजुरा बाजारच्या मिरचीला सुगीचे दिवस; परदेशात प्रसिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 10:41 IST

विदर्भाचा कॅलिफोर्निया वरूड तालुक्यात यंदा शेतकऱ्यांनी मिरचीची अधिक क्षेत्रात लागवड केली. सध्या या मिरचीला परदेशात मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहे.

ठळक मुद्देरोजगारात वाढ बाजारपेठेत अडीच हजार क्विंटलची आवक

संजय खासबागेअमरावती : विदर्भाचा कॅलिफोर्निया वरूड तालुक्यात संत्रा उत्पादकांवर चिंतेचे सावट आहे. त्याला पर्याय म्हणून यंदा शेतकऱ्यांनी मिरचीची अधिक क्षेत्रात लागवड केली. सध्या या मिरचीला परदेशात मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहे. परिणामी राजुराबाजार येथील प्रसिद्ध बाजारपेठेत हिरव्या मिरचीची आवक वाढली आहे.मागील दोन वर्षांत मिरचीचे उत्पादन कमी झाले. यंदा रोगराई नसल्याने लागवड कमी असताना मोठ्या प्रमाणात उत्पादन आहे. राजुराबाजार येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मिरची बाजारपेठेत दिवसागणिक दोन ते अडीच हजार क्विंटल मिरचीची आवक होत आहे. उत्पादकांना २५ ते २६ रुपये प्रतिकिलोप्रमाणे भाव मिळत आहे. या बाजारपेठेत परतवाडा, चांदूर बाजार, आर्वी, आष्टी, काटोल, नरखेड, जलालखेडा, मध्यप्रदेशातील मुलताई, पांढुर्णा या परिसरातून शेतकरी मिरची विकण्यासाठी येतात.वरूड कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार असलेल्या राजुरा बाजार मिरची बाजारात परवानाधारक १८९ व्यापारी, ५६ अडते, दोन मापारी, ९३ हमाल आणि एक वखारीवाला आहे. हजारो मजुरांच्या हाताला काम देणारी ही बाजारपेठ आहे. हंगामात दिवसागणिक २० ते २५ हजारांपर्यंत कृषी मालाचा सेस बाजार समितीला मिळत असते. तर वाहतूकदार व ट्रक चालकांनादेखील वेळेत माल पोहचता केल्यावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.एका रात्रीत कोट्यवधींचा व्यवसायविदर्भात रात्रीतून चालणारी एकमेव बाजारपेठ असून येथे सायंकाळी ७ वाजता सुरू होणारा बाजार मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत सुरू असते. एका रात्रीत या बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल होते. व्यापाऱ्यांकडून नगदी रक्कम दिली जात असल्याने शेतकऱ्यांना पैशासाठी ताटकळत बसावे लागत नाही.अरब राष्ट्रातही प्रसिद्धराजुरा बाजार येथील मिरची बाजारातून कोलकाता, मुंबई, दिल्ली या मोठ्या शहरांसह राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पंजाब, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालसह देशाच्या कानाकोपऱ्यात येथील शेतकऱ्यांचा माल पाठविण्यात येतो. यासोबतच पाकिस्तान, बांगलादेश, दुबई, सौदी अरेबियासह अरब राष्ट्रात येथील मिरची प्रसिद्ध असल्याने व्यापारी मिरचीची निर्यात करतात.यंदा मिरचीची प्रत व भाव चांगला आहे. मात्र ती वेळेत पोहचविणे जिकरीचे काम आहे. रेल्वेने प्राधान्यक्रम देऊन वाहतूक झाल्यास राजुरा बाजारच्या बाजारपेठेचा विकास होऊ शकतो, स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे.- अनिल चांडक,मिरची व्यापारी, राजुरा बाजार

टॅग्स :agricultureशेती