शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
3
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
4
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
5
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
6
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
7
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
8
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
9
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
10
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
11
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
12
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
13
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
14
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
15
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
16
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
17
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
18
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
19
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
20
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...

अमरावती जिल्ह्यातल्या राजुरा बाजारच्या मिरचीला सुगीचे दिवस; परदेशात प्रसिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 10:41 IST

विदर्भाचा कॅलिफोर्निया वरूड तालुक्यात यंदा शेतकऱ्यांनी मिरचीची अधिक क्षेत्रात लागवड केली. सध्या या मिरचीला परदेशात मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहे.

ठळक मुद्देरोजगारात वाढ बाजारपेठेत अडीच हजार क्विंटलची आवक

संजय खासबागेअमरावती : विदर्भाचा कॅलिफोर्निया वरूड तालुक्यात संत्रा उत्पादकांवर चिंतेचे सावट आहे. त्याला पर्याय म्हणून यंदा शेतकऱ्यांनी मिरचीची अधिक क्षेत्रात लागवड केली. सध्या या मिरचीला परदेशात मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहे. परिणामी राजुराबाजार येथील प्रसिद्ध बाजारपेठेत हिरव्या मिरचीची आवक वाढली आहे.मागील दोन वर्षांत मिरचीचे उत्पादन कमी झाले. यंदा रोगराई नसल्याने लागवड कमी असताना मोठ्या प्रमाणात उत्पादन आहे. राजुराबाजार येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मिरची बाजारपेठेत दिवसागणिक दोन ते अडीच हजार क्विंटल मिरचीची आवक होत आहे. उत्पादकांना २५ ते २६ रुपये प्रतिकिलोप्रमाणे भाव मिळत आहे. या बाजारपेठेत परतवाडा, चांदूर बाजार, आर्वी, आष्टी, काटोल, नरखेड, जलालखेडा, मध्यप्रदेशातील मुलताई, पांढुर्णा या परिसरातून शेतकरी मिरची विकण्यासाठी येतात.वरूड कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार असलेल्या राजुरा बाजार मिरची बाजारात परवानाधारक १८९ व्यापारी, ५६ अडते, दोन मापारी, ९३ हमाल आणि एक वखारीवाला आहे. हजारो मजुरांच्या हाताला काम देणारी ही बाजारपेठ आहे. हंगामात दिवसागणिक २० ते २५ हजारांपर्यंत कृषी मालाचा सेस बाजार समितीला मिळत असते. तर वाहतूकदार व ट्रक चालकांनादेखील वेळेत माल पोहचता केल्यावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.एका रात्रीत कोट्यवधींचा व्यवसायविदर्भात रात्रीतून चालणारी एकमेव बाजारपेठ असून येथे सायंकाळी ७ वाजता सुरू होणारा बाजार मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत सुरू असते. एका रात्रीत या बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल होते. व्यापाऱ्यांकडून नगदी रक्कम दिली जात असल्याने शेतकऱ्यांना पैशासाठी ताटकळत बसावे लागत नाही.अरब राष्ट्रातही प्रसिद्धराजुरा बाजार येथील मिरची बाजारातून कोलकाता, मुंबई, दिल्ली या मोठ्या शहरांसह राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पंजाब, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालसह देशाच्या कानाकोपऱ्यात येथील शेतकऱ्यांचा माल पाठविण्यात येतो. यासोबतच पाकिस्तान, बांगलादेश, दुबई, सौदी अरेबियासह अरब राष्ट्रात येथील मिरची प्रसिद्ध असल्याने व्यापारी मिरचीची निर्यात करतात.यंदा मिरचीची प्रत व भाव चांगला आहे. मात्र ती वेळेत पोहचविणे जिकरीचे काम आहे. रेल्वेने प्राधान्यक्रम देऊन वाहतूक झाल्यास राजुरा बाजारच्या बाजारपेठेचा विकास होऊ शकतो, स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे.- अनिल चांडक,मिरची व्यापारी, राजुरा बाजार

टॅग्स :agricultureशेती