शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

वऱ्हाडी बोलीत बालसाहित्याची निर्मिती झाली पाहिजे: सतीश तराळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 9:49 PM

छत्रपती संभाजी महाराज पराक्रमीच नव्हे, तर बहुभाषिक प्रज्ञावंत साहित्यिक होते. पराक्रम आणि पांडित्य, प्रतिभा यांचा अनोखा मेळ छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात असल्याचे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष सतीश तराळ यांनी रविवारी केले.

अमरावती : छत्रपती संभाजी महाराज पराक्रमीच नव्हे, तर बहुभाषिक प्रज्ञावंत साहित्यिक होते. पराक्रम आणि पांडित्य, प्रतिभा यांचा अनोखा मेळ छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात असल्याचे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष सतीश तराळ यांनी रविवारी केले. येथील विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित पहिल्या वऱ्हाडी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. 

मराठीची आद्यकविता ‘महदंबेचे ढवळे’ व आद्य गद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ विदर्भात लिहिले गेले व त्यांच्या निर्मितीत वऱ्हाडी बोलीचा वाटा महत्त्वाचा आहे. वऱ्हाडी वाङ्मय म्हणजे केवळ वऱ्हाडी बोलीचे वाङ्मय नव्हे, तर येथील जाणिवेचे, जीवनाचे साहित्य होय.  वऱ्हाडी साहित्य समन्वयमहर्षी गुलाबराव महाराज यांनी प्रचंड ग्रथनिर्मितीच केली नाही, तर साहित्यशास्त्रीय विचार मांडून साहित्यशास्त्र निर्मितीतही योगदान दिले. वऱ्हाडी बोलीत बालसाहित्याची निर्मिती झाली पाहिजे. बालसाहित्यच राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी कार्य करीत असते. याशिवाय वऱ्हाडी वाङ्मय, कथा, कविता, कादंबरीच्या पुढे जाऊन त्यात चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, नाटके, ललितनिबंध यांची निर्मिती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले. 

याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जनसाहित्याचे प्रवर्तक सुभाष सावरकर, ज्येष्ठ कथाकार सुरेश आकोटकर उपस्थित होते. स्वागताध्यक्ष दिलीप निंभोरकर आदींनी यावेळी विचार मांडले. त्यापूर्वी बाबाराव मुसळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथनात, नरेंद्र माहुरतळे, विनय मिरासे, विनोद तिरमारे, अनघा सोनखासकर, संघमित्रा खंडारे, अ.भा. ठाकूर यांनी कथाकथन केले. मिर्झा रफी अहमद बेग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात अजय खडसे, राजेश महल्ले, कविता डवरे, ममता मस्के आदींनी कविता सादर केल्यात. यावेळी मिर्झा रफी अहमद बेग यांनीही रसिकांना मंत्रमुग्ध केले. विजया मारोतकर यांच्या अध्यक्षतेखाली नवोदितांचे कविसंमेलन झाले. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन वऱ्हाडी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष का.रा. चव्हाण यांनी केले. याप्रसंगी मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. सभागृहात शेकडो रसिकांनी हजेरी लावली होती.

टॅग्स :Amravatiअमरावती