शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

सर्व शाळांमध्ये राबविली जाणार ‘बाल स्वच्छता मोहीम’

By admin | Updated: November 15, 2014 01:08 IST

स्वच्छता व आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी अगदी गावपासून ते राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे.

गजानन मोहोड अमरावतीस्वच्छता व आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी अगदी गावपासून ते राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे. ‘स्वच्छ भारत हे मिशन साध्य करण्यासाठी बालकांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. यासाठी १४ नोव्हेंबर या बालदिनापासून ‘बाल स्वच्छता मोहीम’ सर्व शाळांमध्ये राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. १९ नोव्हेंबरपर्यंत हे अभियान सुरु राहील. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी शिक्षकांवर सोपविली आहे. याच मोहिमेसोबत प्रत्येक शाळेमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र वापरण्यायोग्य स्वच्छतागृह उपलब्ध करुन देण्याबाबत शासकीय यंत्रणेस निर्देश दिले आहे. तसेच इतर घटकांना या कामी योगदान देण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.शाळा या शिक्षणाचे केंद्रबिंदू आहेत. पालक, समाज यांना बालकांच्या माध्यमातून स्वच्छता, आरोग्य व निटनेटकेपना याबाबतचा संदेश पोहचवता येईल, अशी आशा शिक्षण विभागाला आहे. याकामी बालकांच्या माध्यमातून त्यांच्या घरांमध्ये भावंडे, त्यांचे सवंगडी यांच्यामध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती होऊ शकते यासाठी विद्यार्थ्यांचे विविध गट, यामध्येही शाळा आरोग्य गट यांच्यामार्फत आरोग्य व स्वच्छतेविषयक विविध उप्रमांची अंमलबजावणी त्या अनुशंगाने बालकांना वैयक्तिक स्वच्छता, त्यांचे घर, शाळा व सभोवतालचा परिसर स्वच्छ व निटनेटका ठेवण्याचे पटवून देण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेमध्ये मलामूलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, हात धूण्याची जाग, पिण्याच्या पाण्याची सुविधा, नियमित स्वच्छता व आरोग्यविषयक निगा व देखभाल याबाबी असणे आवश्यक आहे.स्वच्छ पाणी, परिसर स्वच्छता व त्याद्वारे शाळांमध्ये आरोग्यदायी व प्रफुल्ल वातावरण तयार होऊ शकेल त्यामुळे बालक व त्यांचे कुटुंब यांच्या मध्येही आरोग्यविषयक चांगल्या सवयी रुजन्यास मदत होईल. आजाराचे प्रमाण कमी होऊन बालकांच्या उपस्थितीमध्ये वाढ होईल त्याची संपादणूक पातळी वाढेल आणि खऱ्या अर्थाने बालकांचे शैक्षणिक समानतेचे समावेश होईल आणि याचा राष्ट्र विकासामध्ये व आर्थिक वृध्दी होण्यासाठी हातभार लागणार आहे.