शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

रोहयो मजूरांच्या उपस्थितीत चिखलदरा तालुका राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:17 IST

नरेंद्र जावरे २४ हजार मजुरांच्या हाताला काम : स्थलांतर रोखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न चिखलदरा (अमरावती) : चिखलदरा म्हटले की, स्थलांतर ...

नरेंद्र जावरे

२४ हजार मजुरांच्या हाताला काम : स्थलांतर रोखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न

चिखलदरा (अमरावती) : चिखलदरा म्हटले की, स्थलांतर हा शिरस्ताच झाला आहे. दरवर्षी चिखलदरा तालुक्यातून हजारो मजूर पोटासाठी स्थलांतर करतात. रोजगाराच्या कमी संधी असल्याने तसेच व्याघ्र प्रकल्पाचा भाग असल्याने उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे येथील आदिवासींना रोहयोच्या कामावर अवलंबून राहावे लागते. रोहयोचे काम मिळाले नाही, तर त्यांचे स्थलांतर अटळ असते. नेहमीचा हा अनुभव लक्षात घेऊन प्रशासनाने सुरुवातीपासूनच नियोजन केले. ते नियोजन राज्यात अव्वल ठरले. चिखलदरा तालुका रोहयो मजुरांच्या उपस्थितीत अव्वल ठरला आहे.

पंचायत समिती, तहसील स्तरावर नवीन कामांचे अंदाजपत्रक बनवून प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या. कामे हवीत, असे मागणीपत्र असलेल्या नमुना ४ च्या दहा हजार प्रती ग्रामपंचायतला वितरित केल्या गेल्या. तांत्रिक अधिकारी, ग्रामसेवक आणि ग्रामरोजगार सेवकांच्या बैठका घेऊन नियोजन करण्यात आले. या प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि. प. चे सीईओ अमोल येडगे, धारणीच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी, तहसीलदार माया माने, बीडीओ प्रकाश पोळ यांनी योग्य नियोजन आखले.

बॉक्स

स्थलांतर रोखण्यात यश

१५ दिवसांपूर्वी दोन हजार मजूर उपस्थितीवरून २ डिसेंबर रोजी चिखलदरा तालुक्याने २४ हजार मजुरांपर्यंत मजल मारली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात १ लाख ७३ मजूर रोहयोच्या विविध कामांवर हजर आहेत. यातील ५० हजार ३५७ एकट्या अमरावती जिल्ह्यात आहेत. पैकी २४ हजार १४० मजूर चिखलदरा तालुक्यातील विविध कामांवर उपस्थित आहेत. मजुरांना मोठ्या प्रमाणात हाताला काम मिळाले आहे. वर्षभर अशीच कामे सुरू राहण्याची अपेक्षा मजुरांनी व्यक्त केली असून, स्थलांतर रोखण्यात प्रशासनाला बऱ्याच प्रमाणात यश आले असल्याचे बीडीओ प्रकाश पोळ यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

कोट

यावर्षी कमीत कमी स्थलांतर होईल, यासाठी पूर्ण नियोजन केले आहे. चिखलदरा आणि धारणी मिळून ३५ हजार मजुरांच्या हाताला काम दिले आहे.

मिताली सेठी, प्रकल्प अधिकारी

कोट

दरवर्षीप्रमाणे यावर्षी स्थलांतर होऊ नये म्हणून मागेल त्याला काम उपलब्ध करून देण्याच्या सूचना तालुका प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार व्यवस्थित काम चालू आहे.

अमोल येडगे, सीईओ, जिल्हा परिषद, अमरावती

कोट

चिखलदरा मजूर उपस्थितीमध्ये महाराष्ट्रात अव्वल ठरला. धारणीमध्येही चांगली उपस्थिती आहे. मेळघाटातील आदिवासींचे रोहयोच्या माध्यमातून सक्षमीकरण करण्याचा मानस आहे.

शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

-------------------------------------