शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

चौराकुंडचे हाल बघावेत मुख्यमंत्र्यांनी!

By admin | Updated: November 24, 2014 22:50 IST

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मेळघाटच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यासाठी चौराकुंड हे गाव निवडण्यात आले आहे. या गावाची अवस्था पाहण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने भेट दिली असता तेथे

श्यामकांत पाण्डेय - धारणीराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मेळघाटच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यासाठी चौराकुंड हे गाव निवडण्यात आले आहे. या गावाची अवस्था पाहण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने भेट दिली असता तेथे अत्यंत विदारक परिस्थिती पहावयास मिळाली. हे गाव हरिसाल व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव परिक्षेत्रात येते. या गावाची अवस्था सध्या पाणी व विजेअभावी अत्यंत वाईट झाली आहे. पाण्यासाठी येथील ग्रामस्थांना विशेषत: महिलांना एक किलोमीटरची पायपीट करावी लागते. डोक्यावर तीन ते चार भांड्यांचा थर ठेवून त्यांना पाणी भरावे लागते. सकाळी व सायंकाळी या परिसरात हीच स्थिती पाहायला मिळत आहे. गावात पाणीपुरवठ्याचे मोठे टाके आहे. परंतु तीन वर्षांतून फक्त ३० दिवस या नळाला पाणी येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. परिसरातील नळ योजना नेहमी वीज व नियोजनाअभावी सतत बंद राहते. ग्रामसेवक गावाला अमावस्या-पौर्णिमेलाच दर्शन देतात. ते हरिसाल येथे बसूनच या गावाचा कारभार चालवितात. गावातील लोकांना ग्रामसेवक, तलाठी व वायरमॅनचे नावही माहीत नाही. ते गावात कधी येतात व कधी जातात याचा सुुगावाही लोकांना लागत नाही. गावात स्वस्त धान्य दुकानातून अनियमित धान्य पुरवठा होते. मालाचे परमीट दिले आहे. पण द्वारपोच योजनेमार्फत धान्य न आल्याचे उत्तर गावकऱ्यांना दिले जाते. गावात प्रवेश करताच पूर्वेकडे वनविभागाचे विश्रामगृह व चौराकुंड व्याघ्र परिक्षेत्राचे कार्यालय आहे. या कार्यालयाशी चौराकुंडवासीयांना काहीही देणे-घेणे नाही. कारण, चौराकुंड हे गाव हरिसाल व्याघ्र प्रकल्पाच्या परिक्षेत्रात येते. हरिसाल येथे आरएफओ नसल्याने सध्या आरओ येथील कार्यभार सांभाळत आहे. ते सध्या नवीन आहेत. गावातील तलाठी निलंबित झाला आहे. तलाठ्याचे मुख्यालय हरिसाल असल्याने लोकांनी त्याला कधीही गावात पाहिले नाही. त्याचे नावही लोकांना माहीत नाही. गावात पशुचिकित्सालय आहे. मात्र, डॉक्टरांना कोणीही ओळखत नाही. हे महाशय आठवड्यातून एक दिवस गावात येतात. उर्वरित दिवस ते हरिसालमध्ये बसून नोकरीचे सोपस्कार पार पाडतात. मुख्यमंत्र्यांचा दौरा लागल्याने पशु चिकित्सालयात उगवलेला काडीकचरा वेचण्यासाठी एका व्यक्तिची नियुक्ती केली आहे. तो कुटुंबासह सफाई करीत आहे. नकळत या कामात बालमजुराचा वापर सुरू आहे. गावात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत जि.प. माध्यमिक शाळा आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाचे कार्यालय नादुरूस्त झाले आहे. ते कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रसाधनगृहांचीही तीच अवस्था आहे. येथील पाण्याच्या टाकीत एक थेंबही पाणी नाही. गावातच पाण्याचे दुर्भीक्ष्य असताना शाळेत पाणी येणार कोठून, असा सवाल उपस्थित होत आहे. शिक्षकांसाठी निवासाची व्यवस्था नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक हरिसालहून ये-जा करतात. चौराकुंड हे पूर्णपणे समस्यांचे माहेरघर बनले आहे. याची दशा व दिशा बदलण्याचे आव्हान मुख्यमंत्र्यांना पेलावे लागणार आहे. मात्र, येथील अधिकारी येथे सर्वच ‘आॅलवेल’ असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थेट गावकऱ्यांसोबतच संपर्क साधायला हवा.