शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

पेपर 'नीट' तपासा... दहावीत 93 % मिळवणाऱ्या विद्यार्थीनीला NEET परीक्षेत भोपळा

By महेश गलांडे | Updated: October 22, 2020 10:07 IST

देशात 13 सप्टेंबर व 14 ऑक्टोबर रोजी NEET ची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल घोषित झाला. त्यावेळी अमरावतीच्या वसुंधरा भोजने हिला 720 गुणांपैकी शून्य गुण मिळाल्याचे दिसून आले.

अमरावती - वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल 16 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला. त्यामध्ये, ओडिशाचा शोएब अफताब आणि दिल्लीच्या आकांक्षा सिह यांनी 720 गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक मिळवा. मात्र, या परीक्षेत अमरावती येथील विद्यार्थीनी वसुंधरा भोजने हिला शून्य गुण मिळाले आहेत. आपल्या निकाल पाहून तिने आश्चर्य व्यक्त केले असून सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी न्या. ए. एस. चांदुरकर व न्या. एन. बी. सूर्यवंशी यांनी नीट परीक्षा आयोजक एनटीएला नोटीस जारी केली असून यासंदर्भात 26 ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

देशात 13 सप्टेंबर व 14 ऑक्टोबर रोजी NEET ची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल घोषित झाला. त्यावेळी अमरावतीच्या वसुंधरा भोजने हिला 720 गुणांपैकी शून्य गुण मिळाल्याचे दिसून आले. वसुंधरासाठी हा निकाल धक्कादायक होता, कारण तिने गेल्या वर्षभरापासून नीट परीक्षेची तयारी केली होती. तसेच, कुशाग्र बुद्धमत्ता असलेल्या वसुंधरा हिचा हा निकाल पाहून आई-वडिलांसह शिक्षकांनाही विश्वास बसेना. त्यामुळे, याप्रकरणी वसुंधराने एनटीएकडे रितसर निवेदन देत संपूर्ण वस्तुस्थिती कथन केली. पण, अद्याप कोणतेही उत्तर अथवा पत्रव्यवहार या एजन्सीमार्फत करण्यात आलेला नाही. 

वसुंधरा भोजने ही हुशार विद्यार्थीनी असून तिला दहावीच्या परीक्षेत 93 टक्के तर बारावीत 81.85 टक्के गुण मिळाले आहेत. त्यामुळे त्यांचा डॉक्टर होण्याचा मानस असल्याने नीट परीक्षा दिली व या परीक्षेत त्यांना 600 गुण मिळण्याची अपेक्षा होती. निकालामध्ये काही तांत्रिक घोळ निर्माण झाल्याने कदाचित शून्य गुणांची नोंद झाली असावी. या परीक्षेत पुर्नमुल्यांकन आणि पुन्हा पेपर तपासणीची तरतुद नसल्याने ओएमआर शीटच्या आधारे दिलासा मिळणे शक्य होते व त्यासंदर्भात एटीएला निवेदन दिले आहे. पण, त्यावर अजूनही उत्तर न आल्याने त्यांनी उच्च न्यायालयाकडे धाव घेतली. न्यायालयाने व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी करीत एनटीएला नोटीस जारी केली असून 26 ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. 

महाराष्ट्राचे 4 जण टॉप 50 मध्ये

नीट परीक्षेत मालवणचा सुपुत्र आशिष अविनाश झांट्ये याने 710 गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. तर, तेजोमय नरेंद्र वैद्य, पार्थ संजय कदम व अभय अशोक चिल्लरगे या तिघांनी 705 गुण मिळवून राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला. देशातील सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या 50 विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील या चार जणांचा समावेश आहे. 13 सप्टेंबर व 14 ऑक्टोबर रोजी ही परीक्षा घेण्यात आली. देशभरातून सुमारे 15 लाख 97 हजार 435 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. अखेर उशिराने हा निकाल जाहीर झाला. नीट परीक्षा निकालात ओडिशाचा शोएब आफताब व दिल्लीच्या आकांक्षा सिंग यांनी 720 गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक मिळविला. तर मालवणच्या आशिष झांट्ये याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालamravati-acअमरावतीAmravatiअमरावतीnagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालयexamपरीक्षा