शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

खरवाडी मार्गावर चक्काजाम

By admin | Updated: June 10, 2014 23:47 IST

तालुक्यात १६ तासांचे भारनियमन सुरू आहे. कडक उन्हात नागरिकांना भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. यात जीवाची काहिली होत असताना गावात कृत्रिम पाणी टंचाई व शेती पिकावरही याचा परिणाम होत आहे.

विद्युत विभागाविरूद्ध संताप : १६ तास भारनियमनाला नागरिक कंटाळलेचांदूरबाजार : तालुक्यात १६ तासांचे भारनियमन सुरू आहे. कडक उन्हात नागरिकांना भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. यात जीवाची काहिली होत असताना गावात कृत्रिम पाणी टंचाई व शेती पिकावरही याचा परिणाम होत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी जि. प. अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वात खरवाडी मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. स्थानिक वीज मंडळाच्या अख्त्यारीत येणाऱ्या कुरळपूर्णा, तळवेल, बेलोरा या फीडरवरील सिंगल फेजचा विद्युत पुरवठा असलेल्या गावामध्ये भारनियमनचे प्रमाण मर्यादेच्या पलिकडे गेले आहे. याबाबत सदर फिडरवरील गावातील नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत वारंवार लेखी तक्रारी केल्या. त्यांच्या या लेखी तक्रारीचा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यावर कोणताही परिणाम झाला नाही. या अनियमित भारनियमाविरोधात सदर गावातील नागरिकांचा विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात रोष खदखदत होता. सततचे भारनियमन बंद करून गावठाण फिडरची सुविधा सुरू करण्याबाबत सतत पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहाराला विद्युत वितरण कंपनीने नेहमीच केराची टोपली दाखविली. त्यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेऊन चक्काजाम आंदोलनाचा पवित्रा घेतला. नियमानुसार सिंगल फेज फिडरमध्ये गावातील विद्युत पुरवठा २४ तास सुरू असणे आवश्यक आहे. परंतु या सिंगल फेजच्या नावावर ग्रामीण भागात १६ तासाचे भारनियमन लादले जात आहे. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा ठाकरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडुपंत ठाकरे, प्रवीण भुजाडे, निखील ठाकरे, अनिस अहमद, दिलीप अंभोरे, दिलीप मेश्राम, संजय बावनथडे, बाळासाहेब विधळे, राजेश अढाव, रवींद्र काळे, निखिल बोंडे, प्रभाकर लेंडे, दिनेश बंड, गजानन देशमुख, राजेश वानखडे यांच्यासह ५०० ते ६०० कार्यकर्ते व गावातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. या चक्काजाम आंदोलनाचा भडका उडू नये याकरिता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी पोलीस निरीक्षक डि. बी. तळवी, सहायक पोलीस निरीक्षक लवंगे, पोलीस उपनिरीक्षक मयूर तेलंग, सैयद अजमत, मनोज गायकी, संतोष अढाऊ, राजू हिरुळकर यांच्यासह मोठा पोलीस ताफा उपस्थित होता.यावेळी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा अकस्मात अपघाती निधनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभिर्य ओळखून रस्त्यावर बसून शोकसभा घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली व चक्काजाम आंदोलनाची सांगता झाली.