शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

खरवाडी मार्गावर चक्काजाम

By admin | Updated: June 10, 2014 23:47 IST

तालुक्यात १६ तासांचे भारनियमन सुरू आहे. कडक उन्हात नागरिकांना भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. यात जीवाची काहिली होत असताना गावात कृत्रिम पाणी टंचाई व शेती पिकावरही याचा परिणाम होत आहे.

विद्युत विभागाविरूद्ध संताप : १६ तास भारनियमनाला नागरिक कंटाळलेचांदूरबाजार : तालुक्यात १६ तासांचे भारनियमन सुरू आहे. कडक उन्हात नागरिकांना भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. यात जीवाची काहिली होत असताना गावात कृत्रिम पाणी टंचाई व शेती पिकावरही याचा परिणाम होत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी जि. प. अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वात खरवाडी मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. स्थानिक वीज मंडळाच्या अख्त्यारीत येणाऱ्या कुरळपूर्णा, तळवेल, बेलोरा या फीडरवरील सिंगल फेजचा विद्युत पुरवठा असलेल्या गावामध्ये भारनियमनचे प्रमाण मर्यादेच्या पलिकडे गेले आहे. याबाबत सदर फिडरवरील गावातील नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत वारंवार लेखी तक्रारी केल्या. त्यांच्या या लेखी तक्रारीचा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यावर कोणताही परिणाम झाला नाही. या अनियमित भारनियमाविरोधात सदर गावातील नागरिकांचा विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात रोष खदखदत होता. सततचे भारनियमन बंद करून गावठाण फिडरची सुविधा सुरू करण्याबाबत सतत पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहाराला विद्युत वितरण कंपनीने नेहमीच केराची टोपली दाखविली. त्यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेऊन चक्काजाम आंदोलनाचा पवित्रा घेतला. नियमानुसार सिंगल फेज फिडरमध्ये गावातील विद्युत पुरवठा २४ तास सुरू असणे आवश्यक आहे. परंतु या सिंगल फेजच्या नावावर ग्रामीण भागात १६ तासाचे भारनियमन लादले जात आहे. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा ठाकरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडुपंत ठाकरे, प्रवीण भुजाडे, निखील ठाकरे, अनिस अहमद, दिलीप अंभोरे, दिलीप मेश्राम, संजय बावनथडे, बाळासाहेब विधळे, राजेश अढाव, रवींद्र काळे, निखिल बोंडे, प्रभाकर लेंडे, दिनेश बंड, गजानन देशमुख, राजेश वानखडे यांच्यासह ५०० ते ६०० कार्यकर्ते व गावातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. या चक्काजाम आंदोलनाचा भडका उडू नये याकरिता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी पोलीस निरीक्षक डि. बी. तळवी, सहायक पोलीस निरीक्षक लवंगे, पोलीस उपनिरीक्षक मयूर तेलंग, सैयद अजमत, मनोज गायकी, संतोष अढाऊ, राजू हिरुळकर यांच्यासह मोठा पोलीस ताफा उपस्थित होता.यावेळी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा अकस्मात अपघाती निधनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभिर्य ओळखून रस्त्यावर बसून शोकसभा घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली व चक्काजाम आंदोलनाची सांगता झाली.