शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात अनागोंदी; ‘जनारोग्य’ धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 21:57 IST

शहरासह तालुक्यातील १३३ गावांना रुग्णसेवा पुरविणारे येथील उपजिल्हा रुग्णालय समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. ना पुरेसे मनुष्यबळ, ना साधनसामग्री; अशा अडचणीमुळे रुग्णसेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. या रुग्णालयालाच उत्तम आरोग्यसेवेचा बूस्टर डोस देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नानाविध यंत्रसामग्री बंद अवस्थेत असताना रुग्णांना आवश्यक रक्तसाठाच उपलब्ध नसल्याचे वास्तव उघड झाले आहे.

ठळक मुद्देना साधनसामग्री, ना मनुष्यबळ : डॉक्टरांची वानवा, कॅबिनेट मशीन बंद , रक्ताचा पुरवठा नाही, रुग्ण वाऱ्यावर

किरण होले।लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : शहरासह तालुक्यातील १३३ गावांना रुग्णसेवा पुरविणारे येथील उपजिल्हा रुग्णालय समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. ना पुरेसे मनुष्यबळ, ना साधनसामग्री; अशा अडचणीमुळे रुग्णसेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. या रुग्णालयालाच उत्तम आरोग्यसेवेचा बूस्टर डोस देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नानाविध यंत्रसामग्री बंद अवस्थेत असताना रुग्णांना आवश्यक रक्तसाठाच उपलब्ध नसल्याचे वास्तव उघड झाले आहे.तालुक्याचा भार सोसणाºया उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार ढेपाळल्याने ‘जनारोग्य’ धोक्यात आले आहे. सुविधांची वानवा असल्याने नागरिकांना नाइलाजास्तव खासगी दवाखान्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.हृदयरुग्णांकरिता आवश्यक ईसीजी यंत्रणा सहा महिन्यांपासून नादुरुस्त आहे. यामुळे रुग्णांना खासगी सेवा घ्यावा लागतात. बाळंतपणासाठी आवश्यक असलेल्या सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी स्त्रीरोग (गायनिक) तज्ज्ञ उपलब्ध नाही. याशिवाय उपलब्ध तज्ज्ञ आठवड्यातून दोन दिवस सेवा देत असल्याने अन्य दिवशी दाखल होणाºया प्रसूतांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक स्त्री रुग्णांना खासगी रुग्णालयांत जाण्याशिवाय पर्याय नाही.सहा महिन्यांत अनेक महिलांना अन्य दवाखान्यात सिझेरियन करावे लागल्याची वस्तुस्थिती आहे. रुग्णांना लागणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने बाहेरून औषधी आणण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, महिलांची सिझर पद्धतीने प्रसूती झाल्यानंतर रक्ताची अत्यंत निकड असते. तथापि, उपजिल्हा रुग्णालयात दोन महिन्यांपासून कोणत्याही गटाचे रक्त उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे.वर्षा लोधी (रा. आराळा ) यांची १३ नोव्हेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती झाली. तिने गोंडस बाळाला जन्म दिला. तो आनंद साजरा होत असताना त्या प्रसूतेच्या अंगात रक्त कमी असल्याने तिला रक्ताची तातडीने आवश्यकता होती. मात्र, तिला जुळणारा रक्तगट उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्याने त्यांना अमरावतीत हलविण्यात आले. विशेष म्हणजे, बहुतांश साधारण आर्थिक स्थितीतील प्रसूता येथे दाखल होत असतात. या प्रकरणातदेखील परिस्थितीमुळे वर्षा ही अमरावतीला जाऊ इच्छित नव्हत्या. अशा घटनांमध्ये रक्तसाठा उपलब्ध नसल्याने भविष्यात प्राणहानी झाल्यास त्यास जबाबदार कोण राहणार, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.दिवाळीच्या सुट्यांमुळे जिल्ह्यात कुठेही रक्तदान शिबिर घेण्यात आले नाही. त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवला. रुग्णालयातील कॅबिनेट मशीन बंद पडल्यामुळे येथे रक्त उपलब्ध झाले नाही. दोन दिवसांत मशीन दुरूस्त करून रक्ताची व्यवस्था करण्यात येईल.- सुनील राठोडवैद्यकीय अधिकारीउपजिल्हा रुग्णालय, दर्यापूर