शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सर्व्हर डाऊन, तलाठी परीक्षा केंद्रावर गोंधळ; एक तास उशीरा सुरु झाली परीक्षा

By उज्वल भालेकर | Updated: August 21, 2023 12:44 IST

परीक्षार्थींना मनस्ताप, संतप्त प्रतिक्रिया

अमरावती : राज्यभरात तलाठी भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन परीक्षा सुरु आहे. परंतु अमरावतीमध्ये सोमवारी या परीक्षेच्या दरम्यान परीक्षार्थींची चांगलाच गोंधळ उडाला. सकाही ९ ते ११ या परीक्षेची वेळ असताना देखील सर्व्हर डाऊनमुळे वेळेत परीक्षा सुरु होऊ शकली नाही. शहरातील सिटीलँड तसेच तक्षशिला पॉलिटेक्निक कॉलेज या दोन केंद्रावर सर्व्हर डाऊनच्या तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा वेळेत सुरु होऊ शकला नाही. त्यामुळे परीक्षार्थींनी मनस्ताप व्यक्त केला.

राज्यातील ४ हजार ६४४ तलाठींच्या रीक्तपदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. या परीक्षेसाठी राज्यात तब्बल १० लाख ४१ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीमध्ये रोज तीन सत्रामध्ये ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे. अमरावती शहरात आठ केंद्रावर ही परीक्षा होत आहे. सोमवारी मात्र पहिल्याच सकाळच्या ९ ते ११ या परीक्षा सत्रामध्ये परीक्षार्थींचा चांगलाच गोंधळ उडाला.

शहरातील सीटीलँड आणि तक्षशीला पॉलिटेक्निक कॉलेज या दोन केंद्रावर परीक्षार्थी वेळेत परीक्षा केंद्रावर पेाहचल्यानंतरही सर्व्हर डाऊनमुळे वेळेत परीक्षाच सुरु झाली नाही. तर इतर केंद्रावर मात्र परीक्षा सुरु झाली. त्यामुळे परीक्षार्थींना परीक्षेची वेळ होऊन देखील परीक्षा केंद्राबाहेरच थांबवे लागले. तब्बल एक तासाने तांत्रिक बिघाड दुर झाल्यानंतर परीक्षा सुरळीत सुरु झाली. परंतु पहिल्याच सत्रात झालेल्या या गोंधळाच्या परिस्थितीमुळे इतर सत्रामधील परीक्षेचे नियोजनही बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परीक्षा घेणाऱ्या कंपनीविरुद्ध नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीAmravatiअमरावती