शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

4 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात बदल, आयोगाचे निर्देश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 18:20 IST

राज्यात सध्या सुरू असलेल्या ३१२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ४,१०१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूक कार्यक्रमात राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी अंशत: बदल केला.

अमरावती : राज्यात सध्या सुरू असलेल्या ३१२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ४,१०१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूक कार्यक्रमात राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी अंशत: बदल केला. यामध्ये दोन्ही टप्प्यांतील निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज सादरीकरणाला दोन दिवसांची मुदतवाढ दिली. आता पहिल्या टप्प्यात २५ फेब्रुवारीला, तर दुस-या टप्प्यात २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. राज्यात १ ते ६ मार्च या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५ ते १० फेबु्रवारी दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. मात्र, यामध्ये संगणकीकृत पद्धतीने अर्ज व शपथपत्रे दाखल करण्यास उमेदवारांना अडचणी येत असल्याच्या तक्रारी अनेक जिल्ह्यांतून आयोगाला प्राप्त झाल्याने आता आयोगाने उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास १२ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे.

या सर्व ग्रामपंचायतींमध्ये मतदान २५ फेब्रुवारी व मतमोजणी २६ फेब्रुवारीला होणार आहे. राज्यात मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणा-या ३१२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व  ४,१०१ ग्रामपंचायतींच्या ६,८७१ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील अंशत: बदल करण्यात आला. यामध्ये  १२ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे, १४ ला छाननी, १६ ला उमेदवारी अर्जाची माघार व चिन्हवाटप, २७ फेब्रुवारीला मतदान व २८ ला मतमोजणी होणार आहे. कोकण विभागात ३९, नाशिक ७५, पुणे १३१, औरंगाबाद ३५, अमरावती १० व नागपूर विभागात २२ ग्रामपंचायतींमध्ये सध्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहेत.

४ हजार १०१ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक सध्या राज्यात ४,१०१ ग्रामपंचायतींच्या ६,८७१ रिक्त सदस्यपदांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये कोकण विभागात ६४६ ग्रामपंचायतींमध्ये १०८२, नाशिक विभागात ६६३ ग्रामपंचायतींमध्ये १०७२, पुणे विभागात ९६९ ग्रामपंचायतींमध्ये १८३४, औरंगाबाद विभागात ६९३ ग्रामपंचायतींमध्ये ९५९, अमरावती विभागात  ५९२ ग्रामपंचायतींमध्ये ९०७, तर नागपूर विभागात ५३८ ग्रामपंचायतींमध्ये १०१७ सदस्यपदे रिक्त असल्याने निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे.