शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
2
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
3
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
4
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
5
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
6
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
7
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
8
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
9
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
10
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
11
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
12
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
13
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
14
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
15
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
16
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
17
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
18
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
19
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

हवामान बदलतेय, पीक पद्धतीही बदला

By admin | Updated: July 6, 2015 00:18 IST

कोरडवाहू पीक पद्धतीमध्ये पावसाचा मुख्य ‘रोल’ आहे. किंबहुना मान्सून व पावसाच्या सुरुवातीच्या १०० दिवसांत खरिपाचे यशापयश अवलंबून असते.

खरीप २०१५ : कोरडवाहूमध्ये आंतरपीक घेणे गरजेचेगजानन मोहोड अमरावतीकोरडवाहू पीक पद्धतीमध्ये पावसाचा मुख्य ‘रोल’ आहे. किंबहुना मान्सून व पावसाच्या सुरुवातीच्या १०० दिवसांत खरिपाचे यशापयश अवलंबून असते. खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादकतेची शाश्वती व स्थिरता आणण्याच्या दृष्टिकोनातून व कोरडवाहू हंगाम फायदेशीर ठरण्याच्या दृष्टीने आंतरपीक घेणे महत्त्वाचे आहे.दरवर्षी हवामान व पावसाची अनिश्चितता आहे. हवामान बदलत असताना पीक पद्धतीही बदलने गरजेचे आहे. प्रामुख्याने आंतरपीक पद्धतीचा अवलंब महत्त्वाचा आहे. कमी पावसाच्या भागात व प्रामुख्याने हलक्या व मध्यम स्वरुपाच्या जमिनीमध्ये कमी कालावधीची पिके घेणे व वाणांची निवड करणे महत्त्वाचे आहे. मूग, उडीद तसेच अधिक पावसाच्या भागात जमिनीवर जलदपणे पसरुन वाढणारी कमी उंचीची पिके आंतरपीक म्हणून व जमिनीची धूप वाढविण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरतात. हलकी ते मध्यम जमिनीमध्ये नत्राचे स्थिरीकरण करणारी भूईमूग, मूग, उडीद, सोयाबीन अशा पिकांचा आंतरपीक म्हणून अवलंब करणे महत्त्वाचे आहे. यामुळे जमिनीची सुपिकता वाढून सूक्ष्मजिवांची संख्या यात वाढत होते. मुख्य पीक व आंतरपीक यांची मुळे जमिनीच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये वाढणारी असावीत. कपाशीची मुळे मातीच्या खालच्या थरातून अन्नद्रव्ये व पाणी शोसून घेतात. आंतरपीक म्हणून मूग, उडीद पिकांची मुळे जमिनीच्या वरच्या स्थरातून पाणी आणि अन्नद्रव्ये शोषून घेतात. मुख्य पिके व आणि आंतरपीक एकमेकांना पूरक अशी निवडणूक जास्त उत्पादन देणारी ठरतात. अधिक अन्नद्रव्याची गरज असणाऱ्या पिकांचा आंतरपीके म्हणून समावेश टाळणे महत्त्वाचे आहे. हवामानात होणारा बदल शेतीपिकांवर विपरित परिणाम करतो. पावसात खंड व दररोज वाढणारे तापमान बिजांकुरावर व रोपावर परिणाम करतो, यासाठी पावसाचे व्यवस्थापन व आंतरपीक पद्धतीचा वापर करणे महत्त्वाचे आहे. आंतरपीक पद्धतीचे व्यवस्थापनमध्यम तसेच भारी जमिनीत कापूस, तूर, खरीप, ज्वारी व सोयाबीन आदी पिके घ्यावीत. मध्यम जमिनीत सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन व खरीप ज्वारी घ्यावीत. हलक्या जमिनीत बाजरी, तीळ, एरंडी आदी पिके घ्यावीत. लवकर पक्वहोणाऱ्या वाणाची निवड करावी. दोन ओळीमध्ये योग्य अंतर ठेवून हेक्टरी रोपांची, झाडांची संख्या योग्य ठेवावी. पेरणीसाठी रुंद वरंबा, सरी पद्धतीचा अवलंब केल्यास पावसाच्या पाण्याचे संवर्धन होते. आंतरपीक पद्धतीचे फायदेसरासरीपेक्षा कमी किंवा जास्त पाऊस झाला तरी आंतरपीक पद्धतीमुळे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळण्याची हमी असते. पट्टा पेर पद्धतीमध्ये एक पीक तृणधान्य व एक कडधान्य घेतल्यास जमिनीची धूप कमी होण्यास मदत होतेकडधान्य वर्गातील मूग, उडीद, तूर किंवा सोयाबीन यासारखी पिके आंतरपीक म्हणून घेतल्यास या पिकांच्या मुळावरील गाठीमध्ये असणारे जिवाणू वातावरणातील नत्र जमिनीतून पिकांसाठी उपलब्ध करुन देतात. या पिकांची पानगळ व अवशेष यामुळेही जमिनीची सुपिकता न सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढते. असे असावे आंतरपीक ज्वारी अधिक तूरज्वारी अधिक तूर ही आंतरपीक पद्धती ३:३ किंवा ४:२ ओळीच्या प्रमाणात कृषी विद्यापीठाची शिफारस आहे. ज्वारीचे पीक ११० दिवसांत काढल्यानंतर ज्वारीच्या पाटातील ओलावा अन्नद्रव्य तुरीच्या पिकास उपलब्ध होते. मोकळी हवा व सूर्यप्रकाश यामुळे तुरीच्या सलग पिकापेक्षा आंतरपीक पद्धतीतील तुरीचे पीक अधिक चांगले येऊन अधिक उत्पादन मिळते. सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक महत्त्वाचेजिल्ह्यात सर्वाधिक पेरणी क्षेत्र सोयाबीनचे आहे. सोयाबीन हे सलग प्रमाणात घेण्यात येते व काढणीनंतर रबीचा गहू व हरभरा पिके घेता येतात. कोरडवाहू क्षेत्रात जिथे कमी पाऊस पडतो अशा क्षेत्रात सोयाबीनसोबत तुरीचे आंतरपीक घेणे महत्त्वाचे ठरते. सोयाबीनच्या दोन किंवा चार ओळीनंतर तुरीची ओळ पेरावी. यामध्ये तुरीची वाढ झाल्यानंतर शेंगा भरण्याच्या अवस्थेत कीटकनाशकांची फवारणी करणे सोईचे होते. ही पेरणी जुलैच्या १५ तारखेपर्यंत करता येते. सोयाबीनची काढणी सप्टेंबर किंवा आॅक्टोबरच्या मध्यापर्यंत करता येते. त्यानंतर तुरीची वाढ चांगली होऊन भरपूर बहर व शेंगा येतात. पावसाच्या खंडानंतर एक पीक वाया गेल्यास दुसऱ्या पिकाचा फायदा मिळतो. कापूस अधिक मूगकापूस पिकात मूग, उडीद यासारखी पिके आंतरपिके म्हणून घेता येतात. कापसाच्या बीटी वाणासाठी ९० बाय ६० से.मी. आणि ९० बाय ९० से.मी. अंतरावर शिफारस केली आहे. कापसाच्या दोन ओळीमध्ये टोकन करून उडदाचे किंवा मुगाचे आंतरपीक घेता येते. कापसात तुरीचे आंतरपीक नकोपारंपरिक पद्धतीत कापसात तुरीचे आंतरपीक घेतले जातात. कापसाच्या सहा ते आठ ओळीनंतर तुरीच्या दोन ओळी पेरण्यात येतात. वास्तविकत: कापूस व तूर ही दोन्ही उंच वाढणारी विस्तारणारी आणि दीर्घ (१६० ते १८० दिवस) कालावधीची पिके असल्याने व सूर्यप्रकाश, ओलावा, अन्नद्रव्याच्या गरजा एकसारख्या असल्याने ही पिके एकमेकास पूरक न ठरता स्पर्धक ठरतात. एवढेच नव्हे तर त्यावर पडणाऱ्या किडीदेखील सारख्याच आहेत. त्यामुळे आंतरपीक म्हणून घेणे फायद्याचे ठरते.