शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

चंद्रशेखर व्यंकट यांनी रोवला आधुनिक विज्ञानाचा पाया

By admin | Updated: February 28, 2016 00:33 IST

पारदर्शक माध्यमातून प्रकाश किरण जाताना त्यात आढळणाऱ्या वेगळ्या वर्णपटाला रामन स्प्रेट्रम तर, नव्या वर्षरेषांना रामन लाईन्स अशी नावे व या घटनेला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले.

राष्ट्रीय विज्ञान दिन : हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर अमरावती : पारदर्शक माध्यमातून प्रकाश किरण जाताना त्यात आढळणाऱ्या वेगळ्या वर्णपटाला रामन स्प्रेट्रम तर, नव्या वर्षरेषांना रामन लाईन्स अशी नावे व या घटनेला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. आज जगभर ही नावे रुढ झाली असून या संशोधनाचे प्रणेते चंद्रशेखर व्यंकट रामन यांनी भारतात आधुनिक विज्ञानाचा पाया रोवला, अशी माहिती रविवार २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली. चंद्रशेखर व्यकंट यांचा जन्म इ.स. १८८८ मध्ये तिरुचिरापल्ली येथे झाला. भौतिकशास्त्रात मद्रास येथून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यात काळात भारतात वैज्ञानिक संशोधनाला फारसा वाव नव्हता. त्यामुळे कलकत्याला अर्थखात्यात त्यांनी नोकरी मिळविली. परंतु रामन यांचा मूळचा पिंड विज्ञान क्षेत्रात संशोधन करण्याचा होता. नोकरीत असतानाही ते सर्व फुरसतीचा वेळ विज्ञान संशोधन व अभ्यासात घालवित असत. अखेर सरकारी नोकरीत मन रमणे शक्य नसल्याने त्यांनी १९१७ मध्ये नोकरी सोडली व कलकत्ता विद्यापीठात भौतिकशास्त्र विभागात (पलित प्राध्यापक) या पदावर तेथे अध्यापन व संशोधन कार्य सुरु केले. १६ वर्षे त्यांनी १९३३ पद भुशविले. १९२१ मध्ये ब्रिटिश साम्राज्यांतर्गत विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून रामन उपस्थित राहिले. या निमित्ताने त्यांना युरोप व इंग्लडच्या प्रवासाची संधी मिळाली. बोटीतून युरोपच्या वाटेवर असताना त्यांनी भूमध्य समुद्राचे स्वच्छ निळेशार पाणी पाहिले आणि सागर जलाच्या निळाईवर त्यांचे विचारचक्र सुरू झाले. त्यातूनच पुढे रामन परिणाम म्हणून जागतिक विज्ञान क्षेत्रात मान्यता पावलेल्या महत्त्वाच्या संशोधन कार्याचे बीज रुजून वाढीला लागले. त्यांनी संशोधन करिताना अनेक पारदर्शक वायू आणि घन पदार्थातून व द्रव पदार्थातून प्रकाश किरण आरपार जाऊ दिले. त्या किरणांच्या स्वभावधर्मात काय फरक पडतो यांचे संशोधन सुरु केले. त्यामध्ये पारदर्शक पदार्थातून प्रकाश किरण आरपार जातात. त्यांचे काही प्रमाणात इतर दिशांना इतरत्र विखरून बाहेर पडणाऱ्या पदार्थातून प्रकाश किरण आरपार जातात. त्यांचे काही प्रमाणात इतर दिशांना इतरत्र विखरून बाहेर पडणाऱ्या प्रकाश किरणांचा वर्णपट मूळच्या प्रकाश किरणांच्या वर्णपटापेक्षा वेगळा असतो. पारदर्शक माध्यमातून प्रकाश किरण जात असतांना प्रकाश कणांची टक्कर झाल्यामुळे हा विखुरणारा प्रकाश निर्माण होतो व माध्यमाचे रेणू व प्रकाश कण यांच्यातील प्रक्रियेने नव्या वर्णरेषा निर्माण होतात, असे या घटनेचे स्पष्टीकरण रामन यांनी दिले. या शोधाने जगभऱ्याच्या विज्ञान क्षेत्रात खळबळ उडाली होती. (प्रतिनिधी)