शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

गारपीटने संत्र्यावर बुरशीजन्य रोगाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 06:00 IST

गारपीटमुळे झाडांच्या फांद्यांवरील आणि खोडांवरील सालीला जखमा होतात व यापासून नुकसान संभवते. यात निरनिराळ्या बुरशींचे संक्रमण होते. यामध्ये फायटोप्थेरा, कोलेटोत्रीकम, डिप्लोडीया, आॅल्टरनारिया यासारख्या बुरशी खरचटलेल्या जखमांतून शिरकाव करतात व रोगांचा प्रसार वाढतो. त्याबरोबर झाडाच्या पानांना मार बसल्यामुळे काही पाने फाटतात व काही गळतात.

ठळक मुद्देसंडे अँकर । कृषी शास्त्रज्ञांची माहिती : मृग, आंबिया बहराचे व्यवस्थापन महत्त्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून कमीअधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. त्याचसोबत गारपीट होऊन संत्रा, लिंबू व मोसंबी बागांचे नुकसान झाले. या झाडांना बुरशीजन्य रोग होण्याची शक्यता आहे. सोबतच आगामी मृग व येणाऱ्या आंबिया बहराचे व्यवस्थापन करणेदेखील महत्त्वाचे आहे.गारपीटमुळे झाडांच्या फांद्यांवरील आणि खोडांवरील सालीला जखमा होतात व यापासून नुकसान संभवते. यात निरनिराळ्या बुरशींचे संक्रमण होते. यामध्ये फायटोप्थेरा, कोलेटोत्रीकम, डिप्लोडीया, आॅल्टरनारिया यासारख्या बुरशी खरचटलेल्या जखमांतून शिरकाव करतात व रोगांचा प्रसार वाढतो. त्याबरोबर झाडाच्या पानांना मार बसल्यामुळे काही पाने फाटतात व काही गळतात. त्यामुळे झाडांची सूर्यप्रकाशात अन्नद्रव तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. यामुळे झाडावरील मृगबहराच्या फळांची मोठ्या प्रमाणात गळ होते. आंबिया बहराची फुले निघाल्यास गारपिटीने गळतात किंवा आंबिया बहर फुटण्यास उशीर होतो. पाहिजे तसा ताण बसत नाही. त्या जखमा भरून निघणे व झाडांना संतुलित अन्नपुरवठा होणे करिता खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात. गारपीटमुळे मोडलेल्या फांद्या आरीच्या सह्याने कापाव्यात व कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट (१:१:१०) लावावी. गारपीटग्रस्त झाडांच्या बुंध्यास १ मीटर उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी.झाडाची साल फाटली असल्यास १ टक्के पोटाशियम परमग्नेट द्रावणाने (१०० ग्रॅम १० लिटर पाणी) स्वच्छ पुसून घ्यावी व जखमेवर बोर्डो पेस्ट (१:१:१०) लावावी. झाडे उन्मळून पडली असल्यास वाफ्यात सायमोक्स्रील + मंकोजेब (मिश्र घटक) किंवा मेटरअक्सिल + मंकोजेब या बुरशीनाशकांची २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणीचे द्रावण (८ ते १० लिटर प्रति झाड) या प्रमाणात टाकावे. झाडावर कार्बेन्डाझीम (१ ग्रॅम लिटर पाणी) किंवा कॉपर ओक्सिक्लोराईड (३ ग्रॅम/लिटर पाणी) किंवा बोर्डो मिश्रण (६०० ग्रॅम चुना + ६०० ग्रॅम मोरचूद + १०० लिटर पाणी) या बुरशीनाशकाची फवारणी करावी. गारपीटग्रस्त झाडांना खते देऊन अन्नद्रव्ये यांचा पुरवठा करावा.सद्यस्थितीत आंबिया, मृगबहार नियोजनसद्याच्या परिस्थितीत दिवसा व रात्री तापमानात होणारी घट ही आंबिया बहारातील संत्रा, मोसंबी व लिंबू झाडांना ताण बसण्याकरिता योग्य असली तरी सतत असणारे ढगाळ वातावरण अधून-मधून झालेला पाऊस व गारपीट ही चिंतेची बाब आहे. या परिस्थितीमुळे संत्रा, मोसंबी व लिंबू झाडाचा ताण सुटून कमी तापमानामुळे फुलोर ऐवजी नवती येण्याचीच जास्त शक्यता असते. याकरिता झाडे कायम ताणावर राहणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत आंबिया बहाराला पोषक हवामान परिस्थिती नाही. यासाठी सायकोसील (क्लोरामिक्व्ट क्लोराईड) या संजीवकाची २ मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून त्वरित फवारणी करावी.असे करा झाडाचे व्यवस्थापनगारपीटग्रस्त झाडाला एक किलो अमोनियम सल्फेट प्रतिझाड याप्रमाणे द्यावे. त्याचबरोबर शक्य असल्यास चीलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रवाची (झिंक + कॅलशियम + फेरस सल्फेट मिश्र घटक) ०.२ टक्के प्रमाणात फवारणी करावी. गारपीटग्रस्त झाडांवर कॅल्सियम नायट्रेट १ टक्का (१ किलो) + जिब्रेलिक अ‍ॅसिड २ ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास पानांची संख्यावाढ होईल, असे कृषी विद्यापीठाच्या अ. भा. संशोधन प्रकल्पाचे दिनेश पैठनकर व योगेश इंगळे यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेती