शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

पालिका, पंचायतींना ‘ओडीएफ प्लस’चे आव्हान; थ्री-स्टार मानांकनही हवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 19:28 IST

- प्रदीप भाकरे अमरावती : राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींना २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ‘ओडीएफ  प्लस’ (हागणदरी मुक्त शहर) ...

- प्रदीप भाकरे

अमरावती : राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींना २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ‘ओडीएफ  प्लस’ (हागणदरी मुक्त शहर) दर्जा मिळविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सोबतच कचरामुक्त शहरांच्या तारांकित मानांकनामध्ये किमान थ्री-स्टार मानांकन मिळविण्याचे आव्हान या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसमोर असेल.राज्याचा नागरी भाग १ ऑक्टोबर २०१७ रोजी ओपन डेफिकेशन फ्री अर्थात हागणदरीमुक्त घोषित करण्यात आला. शहरांच्या या दर्जात सातत्य राहावे, शहरातील कुटुंबांना शौचालयाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने आता या सर्व शहरांना ‘ओडीएफ  प्लस’ व ‘ओडीएफ डबल प्लस’ हा दर्जा प्राप्त करावयाचा आहे. त्याअनुषंगाने स्वच्छ भारत अभियानाचा कालावधी हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जन्मदिनापर्यंत अर्थात २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत असल्याने या कालावधीत सर्व नागरी स्थानिक संस्थांना केंद्र शासनाने नेमलेल्या त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात येणा-या तपासणीत किमान ओडीएफ प्लस दर्जा मिळविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.... तर सीआर बिघडणारओडीएफ प्लस हा दर्जा व थ्री स्टार मानांकन मिळविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्त व नगरपालिका, नगरपंचायतींच्या मुख्याधिका-यांवर देण्यात आली आहे. २ ऑक्टोबरपर्यंत ज्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था उद्दिष्ट पूर्ण करू शकणार नाहीत, त्यांच्या आयुक्त व मुख्याधिका-यांच्या वार्षिक गोपनीय अहवालात (एसीआर) प्रतिकूल शेरे नोंदविण्यात येणार आहेत. 

जिल्हाधिका-यांनी करावे मार्गदर्शनजिल्ह्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे पालक म्हणून जिल्हाधिका-यांनी वेळोवेळी आढावा घ्यावा, मार्गदर्शन करावे तथा जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका व नगरपंचायती ते उद्दिष्ट विहित कालमर्यादेत पूर्ण करतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत.

जानेवारी २०१९ मध्ये केंद्र शासनाने केलेल्या ओडीएफ प्लस व ओडीएफ डबल प्लसच्या तपासणीत राज्यातील ३८४ शहरांपैकी केवळ नऊ शहरांना ओडीएफ डबल प्लस व १४२ शहरांना ओडीएफ प्लस दर्जा मिळविता आला. त्या अनुषंगाने सर्व नागरी स्वराज्य स्थानिक संस्थांना २ ऑक्टोबरचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.- जयंत दांडेगावकर, मिशन संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र