शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

शीतलचा मोबाईल शोधण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:20 IST

शीतल पाटील हत्याकांडातील आरोपी सुनील गजभिये व रहमान खान यांनी एक्स्प्रेस हायवे स्थित जुन्या टोल नाक्याजवळील विहिरीत शीतलचा मोबाइल फेकून दिला.

ठळक मुद्देपोलिसांची दमछाक : ४० फूट उपसा, तरीही पाणी शिल्लक

आॅनलाईन लोकमतअमरावती : शीतल पाटील हत्याकांडातील आरोपी सुनील गजभिये व रहमान खान यांनी एक्स्प्रेस हायवे स्थित जुन्या टोल नाक्याजवळील विहिरीत शीतलचा मोबाइल फेकून दिला. विहिरीतील तो मोबाइल बाहेर काढण्यासाठी गाडगेनगर पोलीस दोन दिवसापासून पाण्याचा उपसा करीत आहेत. मात्र, अजूनही विहिरीत २० ते ३० फूट पाणी शिल्लक असल्यामुळे मोबाइल शोधण्याचे आव्हान कायमच आहे.शीतल पाटील हत्याकांडात गाडगेनगर पोलिसांनी मुख्य आरोपी सुनील गजभिये, त्याचा साथीदार रहमान खान, गुन्ह्यात सहकार्य करणारा गडचिरोलीतील शिवदास गोंडाणे व गजभियेची पत्नी राजेश्री यांना अटक केली. पोलीस कोठडीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आता ठोस पुरावे गोळा करण्याच्या कामी पोलीस लागले आहेत.शीतल पाटीलच्या हत्येनंतर तिचा मोबाइल विहिरीत फेकल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. त्यानुसार गाडगेनगर पोलीस विहिरीत फेकलेल्या मोबाइलचा शोध घेत आहेत. यासाठी विहिरीतील पाण्याचा उपसा करून मोबाइल हाती लागेल, या आशेवर पोलीस आहेत. बुधवारी सायंकाळपासून गाडगेनगर पोलीस विहिरीतील पाण्याचा उपसा करण्याच्या कामी लागले. दोन मशीनद्वारे पाणी उपसा करण्याचे काम सातत्याने सुरुच आहे. मात्र, सुमारे ५० फूट व्यास असणाऱ्या या विहिरीतील पाणी बाहेर काढण्यात पोलिसांची दमछाक उडाली आहे. दोन दिवसात २० फुटांवर पाण्याचा उपसा करण्यात आला असला तरी अद्याप पाण्याची बरीच पातळी शिल्लक आहे. त्यातच विहिरीतील झºयांमुळे पुन्हा विहिरीत पाणी जमा होत असल्याने उपसा करणेही कठीण झाले आहे. मात्र, शीतलचा मोबाइल बाहेर काढणे तपासासाठी आवश्यक ठरले आहे. पोलिसांच्या प्रयत्नांना यश मिळते किंवा नाही, ही बाब मोबाइल सापडल्यावर कळणार आहे. शनिवारी गजभिये व रहमानला पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल.निर्जन स्थळावरील विहिरीतून रहस्य उलगडणार का?एक्स्पे्रस हायवेवरील विहिरीजवळ देहविक्रीचा अड्डाच असल्याचे आढळून आले होते. त्या ठिकाणी सापडलेले आक्षेपार्ह साहित्य प्रेमीयुगुलांच्या अश्लील चाळ्यांचे कथन करणारे होते. अशा आक्षेपार्ह स्थळावरील विहिरीचा उपसा सुरु झाला असून, विहिरीचे तळ गाठल्यानंतर आणखी तथ्य पुढे येण्याची शक्यता आहे. एक्स्प्रेस हायवेवरून सातत्याने मोठ्या वाहनांचे आवागमन सुरु राहते. अनेकदा ट्रकचालकांचे वाद होतात. अशा वेळी गुन्हे लपविण्यासाठी विहिरीचा वापर होत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.विहिरीचा उपसा सातत्याने सुरू आहे. मात्र, अद्यापपर्यंत तळ गाठले नाही. पाणी अधिक असल्यामुळे तळ गाठण्यास वेळ लागत आहे. तळ गाठेपर्यंत पाण्याचा उपसा करूच.- मनीष ठाकरे,पोलीस निरीक्षक,