शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

मिरचीच्या तीन कोटींच्या खरेदी-विक्रीचा सेस गहाळ; बाजार समितीच्या सचिव, पर्यवेक्षकावर ठपका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 12:54 IST

चौकशी अहवाल सादर : अंजनगाव सुर्जी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रकरण

अंजनगाव सुर्जी (अमरावती) : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील मिरची बाजारात तीन कोटी रुपयांच्या खरेदी- विक्रीवरील सेस गहाळ झाल्याच्या प्रकरणात चौकशी अहवाल आला असून, त्यामध्ये बाजार समिती सचिव, पर्यवेक्षकांवर ठपका ठेवण्यात आल्याची माहिती आहे. त्यादृष्टीने जिल्हा उपनिबंधकांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे बाजार समिती सचिवांनी मात्र आपल्यावरील आरोपांचे खंडन केले.

अंजनगाव सुर्जी येथे बाजार समितीच्या आवारात, समितीमार्फत मिरची बाजार चालविला जातो. मिरची बाजारातील घोळाबाबत ‘लोकमत’च्या दणक्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली. समितीने व्यवहार तपासून घोळावर शिक्कामोर्तब केले. बाजार समितीला मिळू शकणाऱ्या लाखोंच्या सेसला चुना लावल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे बाजार समितीच्या झालेल्या नुकसानभरपाईच्या मिरचीचा ठसका कुणाकुणाला बसणार, हे जिल्हा उपनिबंधकांच्या कारवाईनंतरच पुढे येईल.

बाजार समितीवर गंभीर ताशेरे

कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरची बाजारात अनेक संदिग्ध घडामोडी घडत असताना बाजार समितीचे सचिव गजानन नवघरे व पर्यवेक्षक अमर साबळे यांनी बाजारात बेकायदा मंडळींना थातूरमातूर पत्र देऊन पाठराखण केली होती. ही पाठराखण त्यांच्यावर उलटली असल्याचे चौकशी अहवालात समोर आले आहे. चौकशी समितीने बाजार समितीच्या रेकॉर्डनुसार लायसन्सधारक मिरची व्यापारी नसणे, शेतकऱ्यांकडून माल येणे अपेक्षित असताना लायसन्सधारक व्यापाऱ्यांनी खरेदी करून सौदा चिठ्ठी देणे, हिशेब पट्टी नसणे, मिरची बाजार समितीच्या आवक रजिस्टरला थातूर-मातूर नोंद, बाजार समितीकडून अप्रमाणित बिलाचा वापर, वेगवेगळ्या खरेदीदारास एकाच क्रमांकाचे बिल देणे आदी गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत.

जिल्हा उपनिबंधकांकडे लक्ष

बिले वेळीच तपासून सेस वसूल केला नसल्याने मिरची खरेदी-विक्रीबाबत बाजार समितीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. हा सेस कुणाकडून वसूलपात्र आहे, हे जिल्हा उपनिबंधकांच्या चौकशी अहवालाबाबत भूमिकेवरून स्पष्ट होईल.

जिल्हा उपनिबंधकांना पाठविला अहवाल

जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभारे यांना याबाबत फोनवर संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तथापि, सहायक उपनिबंधक राजेश यादव यांनी सांगितले, चौकशी पूर्ण झाली असून, त्याचा अहवाल आम्ही जिल्हा उपनिबंधकांना पाठविला. त्याबाबत ते समितीला कोणते निर्देश देतात, हे लवकरच कळेल.

बिल बुके घेऊन व्यापाऱ्यांचे पलायन

बिल बुकातील घोळ लक्षात आल्यानंतर काही महिन्यांपूर्वी व्यापारी ती बिले बुके घेऊन पळून गेले होते. यानंतर ती एकाच अर्जावर गहाळ झाल्याचा अर्ज सचिव गजानन नवघरे यांच्याकडे आला. ती बिल बुके अद्याप मिळालेली नाहीत. त्यावर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही.

मिरची बाजारातील सेसमध्ये कुठलाही घोळ झालेला नाही. एकूण १७ हजार रुपये सेसपैकी १५ हजार ४१८ रुपये धनादेशाद्वारे व उर्वरित रक्कम रोख वसूल केली.

- गजानन नवघरे, सचिव, बाजार समिती

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रAmravatiअमरावती