शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

मिरचीच्या तीन कोटींच्या खरेदी-विक्रीचा सेस गहाळ; बाजार समितीच्या सचिव, पर्यवेक्षकावर ठपका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 12:54 IST

चौकशी अहवाल सादर : अंजनगाव सुर्जी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रकरण

अंजनगाव सुर्जी (अमरावती) : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील मिरची बाजारात तीन कोटी रुपयांच्या खरेदी- विक्रीवरील सेस गहाळ झाल्याच्या प्रकरणात चौकशी अहवाल आला असून, त्यामध्ये बाजार समिती सचिव, पर्यवेक्षकांवर ठपका ठेवण्यात आल्याची माहिती आहे. त्यादृष्टीने जिल्हा उपनिबंधकांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे बाजार समिती सचिवांनी मात्र आपल्यावरील आरोपांचे खंडन केले.

अंजनगाव सुर्जी येथे बाजार समितीच्या आवारात, समितीमार्फत मिरची बाजार चालविला जातो. मिरची बाजारातील घोळाबाबत ‘लोकमत’च्या दणक्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली. समितीने व्यवहार तपासून घोळावर शिक्कामोर्तब केले. बाजार समितीला मिळू शकणाऱ्या लाखोंच्या सेसला चुना लावल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे बाजार समितीच्या झालेल्या नुकसानभरपाईच्या मिरचीचा ठसका कुणाकुणाला बसणार, हे जिल्हा उपनिबंधकांच्या कारवाईनंतरच पुढे येईल.

बाजार समितीवर गंभीर ताशेरे

कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरची बाजारात अनेक संदिग्ध घडामोडी घडत असताना बाजार समितीचे सचिव गजानन नवघरे व पर्यवेक्षक अमर साबळे यांनी बाजारात बेकायदा मंडळींना थातूरमातूर पत्र देऊन पाठराखण केली होती. ही पाठराखण त्यांच्यावर उलटली असल्याचे चौकशी अहवालात समोर आले आहे. चौकशी समितीने बाजार समितीच्या रेकॉर्डनुसार लायसन्सधारक मिरची व्यापारी नसणे, शेतकऱ्यांकडून माल येणे अपेक्षित असताना लायसन्सधारक व्यापाऱ्यांनी खरेदी करून सौदा चिठ्ठी देणे, हिशेब पट्टी नसणे, मिरची बाजार समितीच्या आवक रजिस्टरला थातूर-मातूर नोंद, बाजार समितीकडून अप्रमाणित बिलाचा वापर, वेगवेगळ्या खरेदीदारास एकाच क्रमांकाचे बिल देणे आदी गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत.

जिल्हा उपनिबंधकांकडे लक्ष

बिले वेळीच तपासून सेस वसूल केला नसल्याने मिरची खरेदी-विक्रीबाबत बाजार समितीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. हा सेस कुणाकडून वसूलपात्र आहे, हे जिल्हा उपनिबंधकांच्या चौकशी अहवालाबाबत भूमिकेवरून स्पष्ट होईल.

जिल्हा उपनिबंधकांना पाठविला अहवाल

जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभारे यांना याबाबत फोनवर संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तथापि, सहायक उपनिबंधक राजेश यादव यांनी सांगितले, चौकशी पूर्ण झाली असून, त्याचा अहवाल आम्ही जिल्हा उपनिबंधकांना पाठविला. त्याबाबत ते समितीला कोणते निर्देश देतात, हे लवकरच कळेल.

बिल बुके घेऊन व्यापाऱ्यांचे पलायन

बिल बुकातील घोळ लक्षात आल्यानंतर काही महिन्यांपूर्वी व्यापारी ती बिले बुके घेऊन पळून गेले होते. यानंतर ती एकाच अर्जावर गहाळ झाल्याचा अर्ज सचिव गजानन नवघरे यांच्याकडे आला. ती बिल बुके अद्याप मिळालेली नाहीत. त्यावर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही.

मिरची बाजारातील सेसमध्ये कुठलाही घोळ झालेला नाही. एकूण १७ हजार रुपये सेसपैकी १५ हजार ४१८ रुपये धनादेशाद्वारे व उर्वरित रक्कम रोख वसूल केली.

- गजानन नवघरे, सचिव, बाजार समिती

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रAmravatiअमरावती