शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

संभाव्य पाणीटंचाई आराखड्यासाठी सीईओंनी दिला टाइमटेबल

By जितेंद्र दखने | Updated: September 18, 2023 20:01 IST

जिल्हा परिषद : १८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबरपर्यंत ठरणार नियोजन

अमरावती : संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा सन २०२३-२४ करिता मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत अधिनस्त यंत्रणेला १८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या कालावधी करावयाच्या नियोजनाकरिता कालबद्ध कार्यक्रम आखून दिलेला आहे.

यानुसारच संबंधित यंत्रणेने कारवाई करावी, अशा सूचना देखील सीईओंच्या आदेशात दिल्या आहेत. जिल्ह्यामध्ये सन २०२३-२४ या वर्षातील पर्जन्यमानाची स्थिती पाहता येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्याचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जाणार आहे. पाणीटंचाई आराखडा तयार करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन व त्याप्रमाणेच पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करताना अंमबजावणी करावी, अशा सूचना या आदेशात सीईओंनी दिलेल्या आहेत.

असा आहे सीईओंनी दिलेला कालबद्ध कार्यक्रमवरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने संभाव्य निर्माण होण्याची शक्यता असणाऱ्या गावे, वाड्या-वस्त्या घोषित करणे १८ सप्टेंबर, टंचाईसदृश गावांची यादी तहसील कार्यालयाकडे सादर करणे, तहसीलदार यांनी २२ सप्टेंबर, टंचाईसदृश गावे घोषित करणे ३० सप्टेंबर, पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा डीव्हीबीटीटी फास्ट एक्सलंट सीटमध्ये तयार करणे ६ ऑक़्टोबर, संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा सॉफ्ट व हार्ड कॉपीसह ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर करणे १२ ऑक्टोबर आणि जिल्ह्याचा एकत्रित पाणीटंचाई आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यासाठी झेडपी पाणीपुरवठा विभागाला १६ ऑक़्टोेबरपर्यंत डेडलाइन देण्यात आली आहे.

सन २०२३-२४ या वर्षातील संभाव्य पाणीटंचाई आराखडा हा विहित मुदतीत पूर्ण करावा, याकरिता शासनाचे मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कारवाई करावी, यासाठी १८ सप्टेंबर ते १६ आक्टोेबरपर्यंत कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून संबंधित यंत्रणेला दिलेला आहे. त्यानुसार संबंधित यंत्रणांनी यानुसार कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.अविश्यांत पंडा,मुख्य कार्यकारी अधिकारी