शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

राज्यात बॅटरी व्यवसायाने केंद्र सरकारचे नियम गुंडाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 17:00 IST

अ‍ॅसिड हल्ल्यांच्या घटना सातत्याने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बॅटरी उद्योग-व्यवसायात तसेच विक्री करताना केंद्र सरकारच्या नियमांची अंमलबजावणी केली जात नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे

गणेश वासनिक अमरावती : अ‍ॅसिड हल्ल्यांच्या घटना सातत्याने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बॅटरी उद्योग-व्यवसायात तसेच विक्री करताना केंद्र सरकारच्या नियमांची अंमलबजावणी केली जात नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) कडून पर्यावरण प्रमाणपत्र न मिळविता राज्यात हा व्यवसाय बिनदिक्कत सुरू असल्याचे चित्र आहे.

केंद्र सरकारने १५ मे २००१ रोजी ‘दी बॅटरीज मॅनेजमेंट अँड हॅँडलिंग’ नियमावली  तयार केली. यानुसार वाहनांमधील बॅटरीची निर्मिती, पुनर्वा$पर आणि विक्रीबाबत परवाना आवश्यक आहे. बॅटरी अ‍ॅसिडची केंद्र सरकारने धोकादायक म्हणून नोंद केली आहे. त्यामुळे प्रतिष्ठानांची एमपीसीबीकडून पर्यावरण तपासणीदेखील बंधनकारक आहे. परंतु, राज्यात बहुतांश बॅटरी व्यवसाय आणि उद्योगाशी निगडित ठिकाणे, विक्री करणारी प्रतिष्ठाने यांनी परवाना मिळविलेला नाही. केंद्र सरकारच्या अधिसूचनेला १६ वर्षे झाली आहेत. परंतु, राज्यात २६ महापालिका व २५६ नगरपालिकांमध्ये या विषयात कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने बॅटरी व्यवसायासंदर्भात कोणतेही आदेश निर्गमित केलेले नाहीत.

अ‍ॅसिडमुळे नागरी वस्त्यांना धोकाबॅटरी निर्मिती, पुनर्वापर आणि विक्री प्रतिष्ठाने ही बहुतांश नागरी वस्त्यांमध्ये आहेत. परवानगी देताना महापालिका, पोलीस अथवा शॉप अ‍ॅक्ट अधिकाºयांनी सदर प्रतिष्ठानच्या संचालकांनी पर्यावरण विभागाशी संबंधित ना-हरकत प्रमाणपत्र घेतले काय, याची खारतजमा करणे आवश्यक आहे. कें द्र सरकारची तशी अधिसूचना आहे.

उद्योग, व्यवसायास पर्यावरणासंदर्भात परवानगी देण्याचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आहेत. त्यामुळे महानगरात बॅटरी निर्मिती, विक्री अथवा हाताळणी होत असली तरी पर्यावरणविषयक बाबी तपासणीचे अधिकार एमपीसीबीकडे आहे.- महेश देशमुख, उपायुक्त तथा पर्यावरण अधिकारी, अमरावती महापालिका