शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

राज्यात बॅटरी व्यवसायाने केंद्र सरकारचे नियम गुंडाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 17:00 IST

अ‍ॅसिड हल्ल्यांच्या घटना सातत्याने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बॅटरी उद्योग-व्यवसायात तसेच विक्री करताना केंद्र सरकारच्या नियमांची अंमलबजावणी केली जात नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे

गणेश वासनिक अमरावती : अ‍ॅसिड हल्ल्यांच्या घटना सातत्याने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बॅटरी उद्योग-व्यवसायात तसेच विक्री करताना केंद्र सरकारच्या नियमांची अंमलबजावणी केली जात नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) कडून पर्यावरण प्रमाणपत्र न मिळविता राज्यात हा व्यवसाय बिनदिक्कत सुरू असल्याचे चित्र आहे.

केंद्र सरकारने १५ मे २००१ रोजी ‘दी बॅटरीज मॅनेजमेंट अँड हॅँडलिंग’ नियमावली  तयार केली. यानुसार वाहनांमधील बॅटरीची निर्मिती, पुनर्वा$पर आणि विक्रीबाबत परवाना आवश्यक आहे. बॅटरी अ‍ॅसिडची केंद्र सरकारने धोकादायक म्हणून नोंद केली आहे. त्यामुळे प्रतिष्ठानांची एमपीसीबीकडून पर्यावरण तपासणीदेखील बंधनकारक आहे. परंतु, राज्यात बहुतांश बॅटरी व्यवसाय आणि उद्योगाशी निगडित ठिकाणे, विक्री करणारी प्रतिष्ठाने यांनी परवाना मिळविलेला नाही. केंद्र सरकारच्या अधिसूचनेला १६ वर्षे झाली आहेत. परंतु, राज्यात २६ महापालिका व २५६ नगरपालिकांमध्ये या विषयात कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने बॅटरी व्यवसायासंदर्भात कोणतेही आदेश निर्गमित केलेले नाहीत.

अ‍ॅसिडमुळे नागरी वस्त्यांना धोकाबॅटरी निर्मिती, पुनर्वापर आणि विक्री प्रतिष्ठाने ही बहुतांश नागरी वस्त्यांमध्ये आहेत. परवानगी देताना महापालिका, पोलीस अथवा शॉप अ‍ॅक्ट अधिकाºयांनी सदर प्रतिष्ठानच्या संचालकांनी पर्यावरण विभागाशी संबंधित ना-हरकत प्रमाणपत्र घेतले काय, याची खारतजमा करणे आवश्यक आहे. कें द्र सरकारची तशी अधिसूचना आहे.

उद्योग, व्यवसायास पर्यावरणासंदर्भात परवानगी देण्याचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आहेत. त्यामुळे महानगरात बॅटरी निर्मिती, विक्री अथवा हाताळणी होत असली तरी पर्यावरणविषयक बाबी तपासणीचे अधिकार एमपीसीबीकडे आहे.- महेश देशमुख, उपायुक्त तथा पर्यावरण अधिकारी, अमरावती महापालिका