शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

केंद्र सरकारला शिष्यवृत्ती दरवाढीचा विसर; दर ५ वर्षांनी ६५ टक्के वाढ नियम गुंडाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 21:14 IST

खासदार बळवंत वानखडे यांचे शिष्यवृत्ती वाढीसाठी केंद्रीय मंत्र्याच्या सचिवांस पत्र, गत १२ वर्षांत शून्य टक्के वाढ

अमरावती : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या रकमेत वाढ करण्याचा विसर सरकारला पडला आहे. नियमानुसार दर ५ वर्षांनी ६५ टक्के शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ करणे अपेक्षित हाेते. मात्र, गेल्या १२ वर्षांत एकदाही शिष्यवृत्तीत वाढ झालेली नाही. या गंभीर विषयी खासदार बळवंत वानखडे यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या सचिवांस पत्र पाठविले आहे.मावळा संघटनेचे उपाध्यक्ष राहुलदेव मनवर यांनी गत काही दिवसांपूर्वी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या रकमेत वाढ करण्याच्या विषयांबाबत खासदार बळवंत वानखडे यांना निवेदन दिले होते. त्यानुसार खासदार वानखडे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांना ७ जुलै रोजी पत्र पाठविले आहे. मात्र, अद्यापही केंद्र सरकारकडून शिष्यवृत्तीविषयी सकारात्मकदृष्ट्या निर्णय झाला नाही. त्यामुळे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.यांना मिळते शिष्यवृत्तीभारत सरकार शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागास वर्ग (ओबीसी), विशेष मागास गट (एनटी, डीएनटी) विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते. त्यामध्ये वर्ग ११ वी ते विविध शाखांतील पदवी, पदविका, पदव्युतर पदवी अशा ४ ग्रुपद्वारे दर आकारले आहेत. यातील ग्रुप ३ च्या विद्यार्थ्यांना २००४ पर्यंत शिष्यवृत्तीची रक्कम दरमहा १८५० रुपये होती. त्यानंतर २०१० मध्ये सरकारने ती वाढवून ३ हजार रुपये केली. त्यानंतर गेल्या १५ वर्षांत शिष्यवृत्तीच्या रकमेत एक पैसाही वाढ करण्यात आलेली नाही.शिष्यवृत्तीत दोनशे टक्के वाढ करणे काळाची गरजशिष्यवृत्ती दरामध्ये दर ५ वर्षांनी ६० ते ६५ टक्के वाढ करण्याचा नियम आहे. केंद्र सरकारने १२ वर्षांत १ रुपयाचीसुद्धा वाढ केली नाही. मात्र, १२ वर्षांनंतर २०२२ ला केंद्र सरकारने ग्रुप १ ते ४ च्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रकमेत वाढ केली. मात्र, सदरची वाढ ६५ टक्के २ वेळेची दुप्पट अर्थात १४० टक्के इतकी वाढ करणे गरजेचे असताना ००, ५, १२ व २२ टक्के एवढीच वाढ करीत बदल हे मार्च २०२६ पर्यंत कायम ठेवले. त्यामुळे २०१० च्या शिष्यवृत्ती रकमेमध्ये २०० टक्के वाढ करणे गरजेचे आहे.

टॅग्स :balwant wankhedeबळवंत वानखेडेAmravatiअमरावतीcongressकाँग्रेस