शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

सीसीटीव्हीने टिपले संचालकांना नाही दिसले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 00:56 IST

स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये अडत्यांच्या मालामधून धान्यचोरीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. याबाबत बाजार समितीकडे शेतकऱ्यांनी तक्रार देऊनही संबंधित चोर एका संचालकाच्या जवळचा असल्याने प्रकरण दडपण्याचा खटाटोप केला जात आहे.

ठळक मुद्देबाजार समितीतील अफलातून कारभार : धान्यचोरी दडविण्याचा खटाटोप

सुमीत हरकुट ।लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये अडत्यांच्या मालामधून धान्यचोरीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. याबाबत बाजार समितीकडे शेतकऱ्यांनी तक्रार देऊनही संबंधित चोर एका संचालकाच्या जवळचा असल्याने प्रकरण दडपण्याचा खटाटोप केला जात आहे. सत्तेतील संचालक याबाबत बोलायला तयार नसले तरी विरोधकांच्या दबावापुढे झुकत याबाबत स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. धान्यचोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असताना त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई न करता ‘अळीमिळी गुपचिळी’चे धोरण स्वीकारल्याने समिती संचालकांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.तालुक्यातील शेतकरी मोठ्या विश्वासाने बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीस आणतो. मात्र, तो माल बाजार समितीत सुरक्षित नसेल, तर शेतकऱ्यांनी विश्वास कोणावर ठेवावा, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित झाला आहे. १२ आॅगस्ट रोजी बाजार समिती परिसरातून एका अडत्याच्या मालातून तुरीचे काही कट्टे चोरीस गेल्याची घटना घडली होती. याबाबत शेतकरी व संबंधित अडत्याने बाजार समिती प्रशासनाला लेखी तक्रार दिली होती. त्यानुसार संचालकांनी १३ आॅगस्ट रोजी परिसरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयांच्या फुटेजची तपासणी केली. त्यात एका अडत्याच्या मालातून खराळा येथील दोन इसम तुरीचे कट्टे नेत असल्याचे आढळून आले. मात्र, ते चोर हे एका सत्तारूढ संचालकाच्या जवळचे असल्याने या प्रकरणावर काही संचालकांनी मिळून पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेल्यास आपणही आरोपींच्या पिंजºयात उभे होऊ, असे सांगत आढळलेल्या चोरांकडून चोरीस गेलेल्या मालाची किंमत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. बाजार समितीत महिन्याभरात चोरी गेलेल्या मालाची पडताळणी करून नुकसान झालेल्या मालाची भरपाई रक्कम म्हणून ५० हजार रुपये घेण्यावर काही संचालकांचे एकमत झाले.चोरांकडून ५० हजार रुपये घेण्याच्या निर्णयावर काही संचालक व अडत्यांनी नाराजी दर्शविली. यापूर्वीही अनेकदा बाजार समितीत चोरी झाली आहे. हे प्रकरण दडपल्यास चोरांचे फावेल अन् सीसीटीव्हीत पकडले गेल्यास पैसे देऊन सोडून देण्याचा नवीन प्रघात पडेल, असे मत काही संचालकांनी व्यक्त केले. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाचे प्रमुख म्हणून सचिव मनीष भारंबे यांनी मोघम तक्रार दाखल करण्याचा मध्यम मार्ग निवडला. १९ आॅगस्ट रोजी स्थानिक पोलिसांमध्ये लेखी तक्रार देण्यात आली. तरीही धान्य चोरणारे चोर अद्यापही मोकाटच आहेत. यापूर्वीही अनेकदा शेतकरी व अडत्यांचा माल चोरी गेला होता. मात्र, बाजार समितीमधील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत, तर काही निकृष्ट दर्जाचे असल्याने चोरी गेलेल्या मालाचा सुगावा लागला नाही.शेतकºयांच्या बाजार समितीतून तूर, हरभरा, सोयाबीन चोरी जाणे नित्याचे झाले आहे. शिरजगाव बंड येथील उपसरपंच किशोर खवले तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरेश वानखडे यांचे याच बाजार समितीतून धान्य चोरीस गेले होते. त्यावेळी या दोन्ही शेतकऱ्यांनी लेखी तक्रारी दिल्या. मात्र, बाजार समितीचे पदाधिकारी वा प्रशासनाकडून त्या तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात आली. बाजार समितीच्या या कारभाराविरुद्ध शेतकरी वर्गात मोठी नाराजी व्यक्त होत आहे.संचालकांच्या सूचनेवरुन १९ आॅगस्ट रोजी बाजार समिती यार्डातील धान्यचोरीबाबत लेखी तक्रार नोंदविली. समिती स्तरावरूनही चौकशी करण्यात येत आहे.- मनीष भारंबेसचिव, बाजार समिती, चांदूरबाजार

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड