शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्हीने टिपले संचालकांना नाही दिसले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 00:56 IST

स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये अडत्यांच्या मालामधून धान्यचोरीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. याबाबत बाजार समितीकडे शेतकऱ्यांनी तक्रार देऊनही संबंधित चोर एका संचालकाच्या जवळचा असल्याने प्रकरण दडपण्याचा खटाटोप केला जात आहे.

ठळक मुद्देबाजार समितीतील अफलातून कारभार : धान्यचोरी दडविण्याचा खटाटोप

सुमीत हरकुट ।लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये अडत्यांच्या मालामधून धान्यचोरीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. याबाबत बाजार समितीकडे शेतकऱ्यांनी तक्रार देऊनही संबंधित चोर एका संचालकाच्या जवळचा असल्याने प्रकरण दडपण्याचा खटाटोप केला जात आहे. सत्तेतील संचालक याबाबत बोलायला तयार नसले तरी विरोधकांच्या दबावापुढे झुकत याबाबत स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. धान्यचोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असताना त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई न करता ‘अळीमिळी गुपचिळी’चे धोरण स्वीकारल्याने समिती संचालकांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.तालुक्यातील शेतकरी मोठ्या विश्वासाने बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीस आणतो. मात्र, तो माल बाजार समितीत सुरक्षित नसेल, तर शेतकऱ्यांनी विश्वास कोणावर ठेवावा, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित झाला आहे. १२ आॅगस्ट रोजी बाजार समिती परिसरातून एका अडत्याच्या मालातून तुरीचे काही कट्टे चोरीस गेल्याची घटना घडली होती. याबाबत शेतकरी व संबंधित अडत्याने बाजार समिती प्रशासनाला लेखी तक्रार दिली होती. त्यानुसार संचालकांनी १३ आॅगस्ट रोजी परिसरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयांच्या फुटेजची तपासणी केली. त्यात एका अडत्याच्या मालातून खराळा येथील दोन इसम तुरीचे कट्टे नेत असल्याचे आढळून आले. मात्र, ते चोर हे एका सत्तारूढ संचालकाच्या जवळचे असल्याने या प्रकरणावर काही संचालकांनी मिळून पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेल्यास आपणही आरोपींच्या पिंजºयात उभे होऊ, असे सांगत आढळलेल्या चोरांकडून चोरीस गेलेल्या मालाची किंमत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. बाजार समितीत महिन्याभरात चोरी गेलेल्या मालाची पडताळणी करून नुकसान झालेल्या मालाची भरपाई रक्कम म्हणून ५० हजार रुपये घेण्यावर काही संचालकांचे एकमत झाले.चोरांकडून ५० हजार रुपये घेण्याच्या निर्णयावर काही संचालक व अडत्यांनी नाराजी दर्शविली. यापूर्वीही अनेकदा बाजार समितीत चोरी झाली आहे. हे प्रकरण दडपल्यास चोरांचे फावेल अन् सीसीटीव्हीत पकडले गेल्यास पैसे देऊन सोडून देण्याचा नवीन प्रघात पडेल, असे मत काही संचालकांनी व्यक्त केले. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाचे प्रमुख म्हणून सचिव मनीष भारंबे यांनी मोघम तक्रार दाखल करण्याचा मध्यम मार्ग निवडला. १९ आॅगस्ट रोजी स्थानिक पोलिसांमध्ये लेखी तक्रार देण्यात आली. तरीही धान्य चोरणारे चोर अद्यापही मोकाटच आहेत. यापूर्वीही अनेकदा शेतकरी व अडत्यांचा माल चोरी गेला होता. मात्र, बाजार समितीमधील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत, तर काही निकृष्ट दर्जाचे असल्याने चोरी गेलेल्या मालाचा सुगावा लागला नाही.शेतकºयांच्या बाजार समितीतून तूर, हरभरा, सोयाबीन चोरी जाणे नित्याचे झाले आहे. शिरजगाव बंड येथील उपसरपंच किशोर खवले तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरेश वानखडे यांचे याच बाजार समितीतून धान्य चोरीस गेले होते. त्यावेळी या दोन्ही शेतकऱ्यांनी लेखी तक्रारी दिल्या. मात्र, बाजार समितीचे पदाधिकारी वा प्रशासनाकडून त्या तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात आली. बाजार समितीच्या या कारभाराविरुद्ध शेतकरी वर्गात मोठी नाराजी व्यक्त होत आहे.संचालकांच्या सूचनेवरुन १९ आॅगस्ट रोजी बाजार समिती यार्डातील धान्यचोरीबाबत लेखी तक्रार नोंदविली. समिती स्तरावरूनही चौकशी करण्यात येत आहे.- मनीष भारंबेसचिव, बाजार समिती, चांदूरबाजार

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड