शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

१५ मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:20 IST

शहरातील वाढती गुन्हेगारी आणि बेशिस्त वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी शहरातील १५ मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील, अशी माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देरणजित पाटील : क्षुल्लक तक्रारही गांभीर्याने घ्या

आॅनलाईन लोकमतअमरावती : शहरातील वाढती गुन्हेगारी आणि बेशिस्त वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी शहरातील १५ मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील, अशी माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी खा. आनंदराव अडसूळ आणि सीपी दत्तात्रय मंडलिक उपस्थित होते.पोलीस आयुक्तालयात ना. पाटील यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. वाढत्या गुन्हेगारीचा आढावा घेतला. पोलीस कार्यशैलीतील कमकुवत दुवा हेरून क्षुल्लकशी वाटणारी एखादी तक्रार संबंधित व्यक्तीच्या जीवन-मरणाशी निगडित असू शकते. त्यामुळे तक्रार कुठलीही असो, ती गांभीर्याने घ्या, असे आदेश त्यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना दिलेत. छोटी घटना मोठे स्वरूप घेऊ नये, यासाठी प्रत्येक प्रकरणाच्या मुळाशी जाऊन नेमके कारण शोधून काढा. वेळीच आरोपीवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करून तक्रारकर्त्याला दिलासा द्या. लोकाभिमुख पोलिसिंग करा, असे निर्देश त्यांनी दिले.अमरावतीत भरदिवसा घडलेले प्रतीक्षा मेहेत्रे हत्याप्रकरण आणि अल्पवयीन तरुणीच्या चेहºयावर उकळते तेल फेकण्याच्या प्रकरणाने पोलीस प्रशासनाची प्रतिमा जनमानसात मलीन झाल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.विस्कळीत वाहतूक व्यवस्थेला वळण लावण्यासाठी ई-चलान तसेच वाहतूक नियमावलीचे काटेकोर पालन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी पोलीस कारवाईचा लेखाजोखा तपासाताना ना. पाटील यांनी घरफोडीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने पोलिसांच्या कामकाजावर नापंसती दर्शविली.वाढत्या लोकसंख्येला आवश्यक सुरक्षा पुरविण्याच्या दृष्टीने नव्या पोलीस ठाण्याची निर्मिती लवकरच केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. पोलीस वसाहत, पोलिसांच्या कुटुंबीयांशी निगडित प्रश्न या समस्यादेखील लवकरच सोडविल्या जातील, असे ना. पाटील म्हणाले.तेल की अ‍ॅसिड ? प्रयोगशाळेचा अहवाल मिळवाशिवटेकडीनजीक एका मुलीच्या अंगावर फेकलेला तरल पदार्थ नेमका कोणता होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यासाठी रासायनिक विश्लेषण करण्याचे निर्देश ना. पाटील यांनी पोलिसांना दिले.वाहतूक पोलिसांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजीना. रणजित पाटील यांनी आढावा बैठकीत वाहतूक पोलिसांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरात वाहतूक व्यवस्थेसाठी दीडशेपेक्षा अधिक वाहतूक पोलीस कर्तव्य बजावत असल्याची दप्तरी नोंद आहे. मात्र फिल्डवर वाहतूक पोलीस दिसत नसल्याच्या लोकतक्रारी त्यांनी पोलीस आयुक्तांच्या लक्षात आणून दिल्या.