शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बदलीप्रकरणी २२ शिक्षकांची उच्च न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 17:58 IST

अमरावती जिल्हा परिषदेविरूद्ध याचिका : पती-पत्नी एकत्रिकरणाचे निकष डावलले

अमरावती : अमरावती जिल्हा परिषदेने २२ पती-पत्नी शिक्षकांच्या बदल्या करताना एकत्रिकरणाच्या नियमांना फाटा दिला. ही बाब अन्यायकारक असल्याप्रकरणी अन्यायग्रस्त शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. सोमवारी याबाबत उच्च न्यायालयातून जिल्हा परिषद आणि शासनाला नोटीस बजावली जाणार आहे.

पती-पत्नी शिक्षक असलेल्या जोडप्यांना तीन वर्षांपर्यंत बदली करता येणार नाही, असा २८ मे २००५ चा शासन निर्णय आहे. तथापि, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पती-पत्नी एकत्रिकरणाची नियमवाली गुंडाळत ज्येष्ठतेच्या आधारे २२ शिक्षक जोडप्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात गतवर्षी बदली झालेल्या शिक्षक जोडप्यांचा समावेश आहे. अन्यायग्रस्त शिक्षकांच्यावतीने अ‍ॅड. घारे, अ‍ॅड. देशपांडे यांनी शनिवारी नागपूर खंडपीठात याचिकेवर सुनावणी दरम्यान शिक्षकांची बाजू मांडली. पती-पत्नी एकत्रिकरणात बदली झाल्यानंतर किमान तीन वर्षांपर्यंत बदली करता येत नाही. असे असताना अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २२ शिक्षक पती-पत्नी एकत्रिकरणाच्या नियमांना फाटा देत बदल्या केल्या आहेत. यात काही शिक्षकांच्या दुर्गम, अतिदुर्गम भागात बदल्या करण्याची किमया झाली आहे. दुसरीकडे १४ जून २०१९ रोजी राज्याच्या ग्राम विकास विभागाने सोलापूर, पुणे, सातारा जिल्हा परिषदेला पत्र पाठवून पती-पत्नी एकत्रिकरणानुसार ३० किमी. च्या आत शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया राबवावी, असे कळविले आहे. 

शासन निर्णयानुसार एकाचीही सलग सेवा अथवा सोप्या क्षेत्रात १० वर्षे झाली असल्यास दोघांना बदलीस पात्र धरण्यात येईल, असे स्पष्ट नमूद आहे. असे असताना अमरावती जिल्हा परिषदेने २२ शिक्षकांच्या बदल्या करताना नियमावलीतून डावलल्याचा आरोप करीत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

 

शिक्षकांसाठी पती-पत्नी एकत्रिकरणाची नियमावली आहे. तरीदेखील सेवा ज्येष्ठताचा आधार घेत २२ शिक्षक जोडप्यांवर अन्याय केला. जिल्हा परिषदेचा या निर्णयाविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शिक्षकांनी सार्वत्रिक याचिका दाखल केली आहे. सोमवारी याबाबत शासन अथवा जिल्हा परिषदेला नोटीस जारी करण्यात येईल.- राजेश सावरकर,राज्य प्रतिनिधी, प्राथमिक शिक्षक परिषद

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय