शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, यशोमती ठाकूर कडाडल्या

By गणेश वासनिक | Updated: April 24, 2023 15:36 IST

खारघर येथील निष्पाप १४ श्रीसदस्यांचे मृत्युप्रकरण तापले

अमरावती : मुंबईच्या खारघर येथे १६ एप्रिल रोजी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे गौरविण्यात आले. मात्र, या सोहळ्यात राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे १४ श्रीसदस्यांचा मूत्यू झाला. ही घटना गंभीर आणि मनाला वेदनादायी असून, याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी रोखठोक भूमिका राज्याच्या माजी महिला व बाल कल्याण मंत्री तथा आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी पत्रपरिषदेतून केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार शहर, जिल्हा कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी खारघर येथील सदोष मनुष्यवध प्रकरणी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याबाबतची भूमिका मांडली. तर याबाबतचे निवेदन राज्यपाल रमेश बैस यांना देण्यात येणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलु देशमुख यांनी दिली. दरम्यान ॲड. यशेामती ठाकूर यांनी घारघर येथील शाही मेजवानीचे छायाचित्र दाखविताना ‘नेत्यांची एसीमध्ये शाही मेजवानी, तर श्रीसदस्यांनी भर उन्हात छावणी’ असे म्हणत राज्य सरकारवर ताशेरे ओढले. या घटनेत नेमके किती जणांचे मृत्यू झाले,याची अधिकृत आकडेवारी जाहीर करावी,अशी मागणी त्यांनी केली.

मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख नव्हे तर एक कोटी रूपयांची मदत करावी. कारण या साेहळ्याचा खर्च १३ कोटी करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे श्रीसदस्यांच्या कुटुंबीयांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे. श्रीसदस्यांसाठी ना पाणी, ना मंडप, ना औषधोपचाराचीसोय होती, अशी टीका त्यांनी केली.  

खारघर येथे झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. निष्पाप श्रीसदस्यांच्या मृत्युप्रकरणी शिंदे, फडणवीसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृतांच्या कुटुंबीयांना न्याय प्रदान करावी, अशी भूमिका आमदार ॲड. ठाकूर यांनी मांडली. पत्रपरिषदेला कॉंग्रेसचे जिल्हा बबलु देशमुख, आमदार बळवंत वानखडे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सुधाकर वानखडे, प्रदेश प्रवक्ते मिलिंद चिमोटे, माजी महापौर विलास ईंगोले, भय्या पवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणYashomati Thakurयशोमती ठाकूरEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस