शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

विमा कंपन्यांचा वाहनधारकांच्या खिशावर डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 16:44 IST

शासनाने दुचाकीला पाच वर्षे, तर चारचाकी वाहनांना तीन वर्षांचा विमा अनिवार्य केला आहे.

गणेश वासनिक  

अमरावती -  शासनाने दुचाकीला पाच वर्षे, तर चारचाकी वाहनांना तीन वर्षांचा विमा अनिवार्य केला आहे. एवढेच नव्हे तर विम्याचे वार्षिक प्रीमियम दुप्पट केले आहे. आता प्रादेशिक परिवहन अधिकारी नव्या निकषानुसार विम्याची खात्री केल्यानंतरच वाहनांची नोंदणी करीत आहेत. १ सप्टेंबर २०१८ पासून केंद्र सरकारच्या या नव्या आदेशाची अंमलबजावणी राज्यभरात सुरू झाली आहे. मात्र, मोठी रक्कम एकाच वेळी जात असल्याने वाहनधारकांच्या खिशाला ताण पडत आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाच्या जुन्या नियमानुसार यापूर्वी कोणत्याही प्रकारातील वाहनांसाठी एक वर्षांचा विमा काढला जात होता. काही वाहनधारक त्रयस्थ (थर्ड पार्टी) विमा  काढायचे. मात्र, केंद्र सरकारने वाहनांकरिता नवी विमा प्रणाली लागू केली आहे. या प्रणालीच्या अंमलबजवाणीस राज्यात प्रारंभ झाला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात १ सप्टेंबरपासून नव्याने नोंदणीसाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा विमा असल्याबाबतची पडताळणी केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. आरटीओत एकूण २१ प्रकारच्या वाहनांची नोंदणी केली जाते. केंद्र सरकारच्या निकषानुसार त्यांचा विमा नसल्यास त्या वाहनाची ऑनलाईन नोंदणी रद्द करण्यात येत आहे. दुसरीकडे विमा कंपन्यांचे या नव्या निर्णयामुळे ‘बल्ले बल्ले’ झाले आहे. देशभरात विमा क्षेत्रात सुमारे ६० कंपन्या कार्यरत असल्याची माहिती आहे. वाहनांचा विमा काढताना प्रीमियमची रक्कम आणि कालमर्यादेत वाढ झाली आहे. यापूर्वी प्रतिवाहन वर्षाकाठी ८०० ते ९०० रुपये विमा रक्कम भरावी लागत होती. मात्र, आता १७०० ते १८०० रुपये विम्याची रक्कम भरावी लागणार आहे. केंद्र सरकारने वाहनधारकांच्या भवितव्याचा विचार करून विमा कालावधीत वाढ केली असली तरी रक्कम दुप्पट केल्यामुळे वाहनधारकांचे कंबरडे मोडणारा हा निर्णय असल्याची प्रतिक्रिया सर्वच स्तरांतून उमटू लागल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश 

देशभरात बहुतांश अपघातात वाहनांचा विमा नसल्यामुळे यातील मृत तसेच जखमींना मोबदला मिळाला नाही. त्यामुळे एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने वाहनांचा विमा कालावधी निश्चित करून नागरिकांच्या जिवांचे रक्षण करण्याबाबत केंद्र सरकारला आदेशित केले. परिणामी केंद्र सरकारच्या दळणवळण मंत्रालयाने नव्या वाहनांसाठी विमा संरक्षण कवच म्हणून दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी विमा कालावधी निश्चित केला आहे. 

वाहनांच्या विम्याबाबत जुन्या पद्धतीला फाटा बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि केंद्र सरकारच्या सूचनेनुसार कोणत्याही प्रकारचे वाहन असल्यास आता नव्या निकषानुसार विमा भरल्यानंतरच ऑनलाईन नोंदणी होईल. १ सप्टेंबरपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. - आर.टी. गित्ते, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावतीcarकार