शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

११४ उमेदवारांनी गमावली अनामत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:01 IST

नोटा हे वैध मत असले तरी अनामत रकमेसाठी ही मते वगळता फक्त वैध मतांचा हिशेब केला जातो. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत धामणगाव रेल्वे मतदारसंघात एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. अनामत रक्कम वाचविण्यासाठी ३३,०८६ मते मिळविणे आवश्यकता होती यामध्ये वीरेंद्र जगताप यांच्यासह भाजपाचे अरुण अडसड यांनाच अपेक्षित मतांचा कोटा पूर्ण करता आला.

ठळक मुद्देविधानसभा २०१४ ची स्थिती : आठ मतदारसंघांमध्ये १३५ उमेदवार

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आठ मतदारसंघांमध्ये १३५ उमेदवार रिंगणात होते. यापैकी फक्त २१ उमेदवारांचे डिपॉझिट वाचले. उर्वरित ११४ म्हणजेच ८५ टक्के उमेदवारांना अनामत रक्कम वाचविता आली नाही. यामध्ये राजकीय पक्षांच्या दिग्गज उमेदवारांचा समावेश आहे.नोटा हे वैध मत असले तरी अनामत रकमेसाठी ही मते वगळता फक्त वैध मतांचा हिशेब केला जातो. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत धामणगाव रेल्वे मतदारसंघात एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. अनामत रक्कम वाचविण्यासाठी ३३,०८६ मते मिळविणे आवश्यकता होती यामध्ये वीरेंद्र जगताप यांच्यासह भाजपाचे अरुण अडसड यांनाच अपेक्षित मतांचा कोटा पूर्ण करता आला. या ठिकाणी १७ उमेदवारांना अनामत रक्कम गमावावी लागली.बडनेरा मतदारसंघात १५ उमेदवार रिंगणात होते. अनामत रक्कम वाचविण्यासाठी आवश्यक २९,६४६ मतांचा कोटा फक्त रवि राणा, शिवसेनेचे संजय बंड, भाजपचे तुषार भारतीय, काँग्रेसच्या सुलभा खोडके यांनाच पूर्ण करता आला. या मतदारसंघात ११ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. अमरावती मतदारसंघात २० उमेदवार रिंगणात होते. यामध्ये अनामत रक्कम वाचविण्यासाठी २६,७११ मतांचा कोटा फक्त भाजपाचे सुनील देशमुख व काँग्रेसचे रावसाहेब शेखावत पूर्ण करू शकले. या ठिकाणी १८ उमेदवारांना अनामत रक्कम वाचविता आली नाही.मोर्शी मतदारसंघात १९ उमेदवार रिंगणात होते. या मतदारसंघात अनामत रक्कम वाचविण्यासाठी ३०,६४४ मतांची आवश्यकता होती. मात्र, भाजपचे अनिल बोंडे व राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार हर्षवर्धन देशमुख यांचे डिपॉझिट वाचले. उर्वरित १७ उमेदवारांना अनामत रक्कम गमवावी लागली. मेळघाट मतदारसंघात एकूण सहा उमेदवार रिंगणात होते. यापैकी भाजपचे प्रभुदास भिलावेकर, काँग्रेसचे केवलराम काळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकुमार पटेल हेच आवश्यक २८,६८८ मतांचा कोटा पूर्ण करू शकले. अन्य तीन उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.अचलपूर मतदारसंघात १९ उमेदवार रिंगणात होते. यापैकी बच्चू कडू व भाजपचे अशोक बनसोड आवश्यक २९,८१९ मतांचा कोटा पूर्ण करू शकले. उर्वरित १७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. तिवसा मतदारसंघात १८ उमेदवार रिंगणात होते. यापैकी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, भाजपच्या निवेदिता चौधरी (दिघडे) व शिवसेनेचे दिनेश वानखडे हे उमेदवार अनामत रक्कम वाचविण्यासाठी आवश्यक २८,१७४ मतांचा कोटा पूर्ण करु शकले. उर्वरित १५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. दर्यापूर मतदारसंघात १९ उमेदवार रिंगणात होते. यापैकी भाजपचे रमेश बुंदिले, शिवसेनेचे अभिजित अडसुळ व रिपाइंचे बळवंत वानखडे आवश्यक ३०,३२५ मतांचा कोटा पूर्ण करू शकले. उर्वरित उमेदवारांची अनामत शासनजमा झाली.अनामत रकमेसाठी असे आहे गुणोत्तरराजकारणात स्पर्धक किंवा विरोधकाचा उल्लेख करताना अनेकदा ‘डिपॉझिटही वाचले नाही’ असा उपहासाने उल्लेख केला जातो. अनामत रक्कम जप्त झाली म्हणजे नेमके काय झाले, असा प्रश्न कुतूहलाने विचारला जातो. एकूण वैध मतांच्या १/६ मते न मिळाल्यास त्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त केली जाते. यामध्ये नोटाला मिळालेली मते गृहीत धरले जात नाहीत.१०.४५ लाख रक्कम शासनाकडे जमाविधानसभेसाठी सर्वसाधारण मतदारसंघात १० हजार व राखीव मतदारसंघासाठी पाच हजार रुपये अनामत रक्कम असते. २०१४ च्या निवडणुकीत ११४ उमेदवारांना अनामत रक्कम वाचविता आली नाही. राखीव असलेल्या मेळघाट व दर्यापूरमध्ये १९ उमेदवारांचे ९५ हजार व अन्य सहा मतदारसंघांत ९५ उमेदवारांचे ९.५० लाख अशी एकूण १०.४५ लाख रुपयांची अनामत रक्कम शासनजमा झाली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019