लोकमत दिन विशेषवैभव बाबरेकर अमरावतीतंबाखूच्या सेवनातून कर्करोग होत असून जिल्ह्यात तंबाखू सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे शासकिय आकडेवारीवरून लक्षात येत आहे. जिल्ह्यात ९०३ नागरिकांना कर्करोग झाल्याची पुष्टी शासकिय आकडेवावरून होत आहे. त्यातच खाजगी रुग्णालयातही कर्करुग्ण अधिक आढळून येत आहे. दरवर्षी कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे जागतीक आरोग्य संघटनेच्या सर्व्हेत लक्षात आले आहे. आज नो स्मोकिंग डे दिनानिमीत्त जिल्ह्यातील आढावा. भारतात तंबाखू सेवनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. दरवर्षी ८ ते ९ लाख नागरिक मृत्यूमुखी पडत आहेत. पुढील २० वर्षांत ही संख्या अनेक पटीने वाढण्याची शक्यता आहे. तंबाखूच्या धुरामध्ये ४ हजार हानीकारक आणि विषारी रसायन आहे. त्यात निकोटिन, टार व कार्बन मोनॉक्साईड सारख्या घातक रसायनांचा समावेश आहे. अमरावती जिल्हात कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय अससर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये २०१२ ते १३ दरम्यान २९ नागरिकांना कर्करोग असल्याची पुष्टी झाली असून २०१३-१०१४ मध्य ७९३ वर पोहचली आहे. तसेच डिसेंबर २०१४ पर्यंत पुन्हा ८१ कर्करोगी आढळून आले आहेत. आतापर्यंत ९०३ कर्करोगीची तपासणी करण्यात आली असून ७७८ रुग्णांचा उपचार करण्यात आला आहे. हा एक समाजासाठी चिंतेचा विषय आहे.
जिल्ह्यात कर्करोगाचा चढता आलेख
By admin | Updated: March 11, 2015 00:24 IST