शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

कालव्याच्या अस्तरीकरणाला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 22:13 IST

यंदा जिल्ह्याला कोरड पडली असून, अप्पर वर्धातच काही प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यातही शेतकरीहित लक्षात घेता, रबी हंगामासाठी अप्पर वर्धा धरणातून कालव्याला शुक्रवारी पाणी सोडण्यात आले. मात्र, तिवसा तालुक्यातून वाहणाऱ्या सातरगाव रोडवरील बदबदाजवळ कालव्याच्या अस्तरीकरणाला मोठा सुरुंग लागला असून, यातून लाखो लिटर पाणी जमिनीत मुरत आहे.

ठळक मुद्देपाण्याचा अपव्यय : कालवे विभागाला केव्हा येणार जाग?

सूरज दाहाट।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : यंदा जिल्ह्याला कोरड पडली असून, अप्पर वर्धातच काही प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यातही शेतकरीहित लक्षात घेता, रबी हंगामासाठी अप्पर वर्धा धरणातून कालव्याला शुक्रवारी पाणी सोडण्यात आले. मात्र, तिवसा तालुक्यातून वाहणाऱ्या सातरगाव रोडवरील बदबदाजवळ कालव्याच्या अस्तरीकरणाला मोठा सुरुंग लागला असून, यातून लाखो लिटर पाणी जमिनीत मुरत आहे. पाण्याच्या अपव्ययाकडे संबंधित प्रशासनाने सपेशल दुर्लक्ष केले आहे. आधीच अप्पर वर्धा धरणात पाणी नाही. त्यात वाया जाणाºया पाण्यासाठी जबाबदार म्हणून अधिकारी वर्गावर आता कारवाई होणार का, हा प्रश्न शेतकरी वर्ग विचारत आहे.तालुक्यातील शेतीला या पाण्यामुळे फायदा झाला. शेतकरी कपाशी, तूर, हरभरा आणि गहू या पिकांना पाणी देतात. कालव्याच्या पाण्यामुळेच शेतकऱ्यांना रबी पिके घेण्याची संधी मिळाली आणि आर्थिक उत्पन्नात भर पडू लागली. सध्या कापसाचे उत्पादन समाधानकारक नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. हरभरा आता शेतात असून, शेतकरी कालव्याचे पाणी देत आहेत. पाणी पिकांसाठी संजीवनी असल्याने त्याचा उपयोग महत्त्वाचा आहे; पण लघू पाटबंधारे विभाग कालवा, उपकालवा आणि पाटचऱ्यांबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. कालव्यातून पाणी सोडण्यात आले. उपकालवा व पाटचऱ्यांतून शेतात पाणी आले; पण उपकालवा व पाटचºयांची स्वच्छता, खोदकाम, दुरूस्तीकडे लक्ष नसल्याने पाणी अस्ताव्यस्त पसरत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत तिवसा सिंचन विभागाचे अभियंता लकडे यांनी पाहणी केल्यानंतर प्रतिक्रिया देऊन, असे ‘लोकमत’ला सांगितले.धरणात आधीच जलसाठा कमी आहे. त्यात कालव्याच्या दुरूस्तीकडे लक्ष न दिल्याने पाणी वाया जात आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. मात्र, इकडे कालव्याला भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे.- प्रणव गौरखेडेयुवा शेतकरी, तिवसा