शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

कालव्याच्या अस्तरीकरणाला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 22:13 IST

यंदा जिल्ह्याला कोरड पडली असून, अप्पर वर्धातच काही प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यातही शेतकरीहित लक्षात घेता, रबी हंगामासाठी अप्पर वर्धा धरणातून कालव्याला शुक्रवारी पाणी सोडण्यात आले. मात्र, तिवसा तालुक्यातून वाहणाऱ्या सातरगाव रोडवरील बदबदाजवळ कालव्याच्या अस्तरीकरणाला मोठा सुरुंग लागला असून, यातून लाखो लिटर पाणी जमिनीत मुरत आहे.

ठळक मुद्देपाण्याचा अपव्यय : कालवे विभागाला केव्हा येणार जाग?

सूरज दाहाट।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : यंदा जिल्ह्याला कोरड पडली असून, अप्पर वर्धातच काही प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यातही शेतकरीहित लक्षात घेता, रबी हंगामासाठी अप्पर वर्धा धरणातून कालव्याला शुक्रवारी पाणी सोडण्यात आले. मात्र, तिवसा तालुक्यातून वाहणाऱ्या सातरगाव रोडवरील बदबदाजवळ कालव्याच्या अस्तरीकरणाला मोठा सुरुंग लागला असून, यातून लाखो लिटर पाणी जमिनीत मुरत आहे. पाण्याच्या अपव्ययाकडे संबंधित प्रशासनाने सपेशल दुर्लक्ष केले आहे. आधीच अप्पर वर्धा धरणात पाणी नाही. त्यात वाया जाणाºया पाण्यासाठी जबाबदार म्हणून अधिकारी वर्गावर आता कारवाई होणार का, हा प्रश्न शेतकरी वर्ग विचारत आहे.तालुक्यातील शेतीला या पाण्यामुळे फायदा झाला. शेतकरी कपाशी, तूर, हरभरा आणि गहू या पिकांना पाणी देतात. कालव्याच्या पाण्यामुळेच शेतकऱ्यांना रबी पिके घेण्याची संधी मिळाली आणि आर्थिक उत्पन्नात भर पडू लागली. सध्या कापसाचे उत्पादन समाधानकारक नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. हरभरा आता शेतात असून, शेतकरी कालव्याचे पाणी देत आहेत. पाणी पिकांसाठी संजीवनी असल्याने त्याचा उपयोग महत्त्वाचा आहे; पण लघू पाटबंधारे विभाग कालवा, उपकालवा आणि पाटचऱ्यांबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. कालव्यातून पाणी सोडण्यात आले. उपकालवा व पाटचऱ्यांतून शेतात पाणी आले; पण उपकालवा व पाटचºयांची स्वच्छता, खोदकाम, दुरूस्तीकडे लक्ष नसल्याने पाणी अस्ताव्यस्त पसरत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत तिवसा सिंचन विभागाचे अभियंता लकडे यांनी पाहणी केल्यानंतर प्रतिक्रिया देऊन, असे ‘लोकमत’ला सांगितले.धरणात आधीच जलसाठा कमी आहे. त्यात कालव्याच्या दुरूस्तीकडे लक्ष न दिल्याने पाणी वाया जात आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. मात्र, इकडे कालव्याला भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे.- प्रणव गौरखेडेयुवा शेतकरी, तिवसा