शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कालव्याच्या अस्तरीकरणाला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 22:13 IST

यंदा जिल्ह्याला कोरड पडली असून, अप्पर वर्धातच काही प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यातही शेतकरीहित लक्षात घेता, रबी हंगामासाठी अप्पर वर्धा धरणातून कालव्याला शुक्रवारी पाणी सोडण्यात आले. मात्र, तिवसा तालुक्यातून वाहणाऱ्या सातरगाव रोडवरील बदबदाजवळ कालव्याच्या अस्तरीकरणाला मोठा सुरुंग लागला असून, यातून लाखो लिटर पाणी जमिनीत मुरत आहे.

ठळक मुद्देपाण्याचा अपव्यय : कालवे विभागाला केव्हा येणार जाग?

सूरज दाहाट।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : यंदा जिल्ह्याला कोरड पडली असून, अप्पर वर्धातच काही प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यातही शेतकरीहित लक्षात घेता, रबी हंगामासाठी अप्पर वर्धा धरणातून कालव्याला शुक्रवारी पाणी सोडण्यात आले. मात्र, तिवसा तालुक्यातून वाहणाऱ्या सातरगाव रोडवरील बदबदाजवळ कालव्याच्या अस्तरीकरणाला मोठा सुरुंग लागला असून, यातून लाखो लिटर पाणी जमिनीत मुरत आहे. पाण्याच्या अपव्ययाकडे संबंधित प्रशासनाने सपेशल दुर्लक्ष केले आहे. आधीच अप्पर वर्धा धरणात पाणी नाही. त्यात वाया जाणाºया पाण्यासाठी जबाबदार म्हणून अधिकारी वर्गावर आता कारवाई होणार का, हा प्रश्न शेतकरी वर्ग विचारत आहे.तालुक्यातील शेतीला या पाण्यामुळे फायदा झाला. शेतकरी कपाशी, तूर, हरभरा आणि गहू या पिकांना पाणी देतात. कालव्याच्या पाण्यामुळेच शेतकऱ्यांना रबी पिके घेण्याची संधी मिळाली आणि आर्थिक उत्पन्नात भर पडू लागली. सध्या कापसाचे उत्पादन समाधानकारक नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. हरभरा आता शेतात असून, शेतकरी कालव्याचे पाणी देत आहेत. पाणी पिकांसाठी संजीवनी असल्याने त्याचा उपयोग महत्त्वाचा आहे; पण लघू पाटबंधारे विभाग कालवा, उपकालवा आणि पाटचऱ्यांबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. कालव्यातून पाणी सोडण्यात आले. उपकालवा व पाटचऱ्यांतून शेतात पाणी आले; पण उपकालवा व पाटचºयांची स्वच्छता, खोदकाम, दुरूस्तीकडे लक्ष नसल्याने पाणी अस्ताव्यस्त पसरत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत तिवसा सिंचन विभागाचे अभियंता लकडे यांनी पाहणी केल्यानंतर प्रतिक्रिया देऊन, असे ‘लोकमत’ला सांगितले.धरणात आधीच जलसाठा कमी आहे. त्यात कालव्याच्या दुरूस्तीकडे लक्ष न दिल्याने पाणी वाया जात आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. मात्र, इकडे कालव्याला भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे.- प्रणव गौरखेडेयुवा शेतकरी, तिवसा