शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

पुन्हा परतू शकतो नरभक्षी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 01:07 IST

सतत १२ दिवस जिल्ह्यात धुमाकूळ घालणारा वाघोबा मध्य प्रदेशच्या पलासपानी जंगलात स्थिरावला आहे. त्याची अमरावती जिल्ह्यात परतण्याची शक्यता कमी असली तरी सावधगिरी बाळगण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : सतत १२ दिवस जिल्ह्यात धुमाकूळ घालणारा वाघोबा मध्य प्रदेशच्या पलासपानी जंगलात स्थिरावला आहे. त्याची अमरावती जिल्ह्यात परतण्याची शक्यता कमी असली तरी सावधगिरी बाळगण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.अमरावती जिल्ह्यातून पुढे मध्य प्रदेशच्या आठनेर रेंजमधील सातपुडा पर्वतरांगांतील पलासपानी जंगलात नरभक्षक वाघ शिरल्यानंतर ३० आॅक्टोबर रोजी त्याने सकाळी ९ वाजता दोन गार्इंवर हल्ला केला. दोघींच्या मानेवर त्याच्याकडून गंभीर जखमा झाल्या. गुराख्याने आरडाओरड करताच त्याने जंगलात पळ काढला. रात्री ८ वाजता लाल रंगाच्या गाईवर हल्ला चढविताना ट्रॅप कॅमेऱ्याने त्याचे छायाचित्र टिपले. त्यामुळे तो तीन दिवसांपासून मध्य प्रदेशच्या जंगलातच असल्याचे स्पष्ट आहे. महाराष्ट्र सीमेपासून १८ किलोमीटर अंतरावर मध्यप्रदेशच्या जंगलात तो आहे. त्याची आतापर्यंत एकाच, उत्तर दिशेने वाटचाल पाहता, परतण्याची शक्यता फारच कमी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.दरम्यान, मेळघाटच्या जंगलात वाघ परतण्याची दाट शक्यता असल्याचा अंदाज व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक विशाल माळी यांनी वर्तविला. दुसरीकडे आठनेर रेंजमधील पलासपानी वनखंड ६४५ मध्ये दोन ते तीन वाघ असल्याने हा युवा वाघ आपला स्वतंत्र एरिया तयार करून तिथे स्थिरावण्याची शक्यता असल्याचे काही तज्ज्ञांनी सांगितले, तर अनुकूलता न लाभल्यास वाघाची दिशा बदलू शकते, असे आरएफओ शंकर बारखडे यांनी सांगितले. मध्यप्रदेश व महाराष्ट्राचे वनकर्मचारी वनअधिकारी दररोज त्याचे लोकेशन घेत आहेत.वाघ दोन ते अडीच वर्षाचाचंद्रपूरच्या थर्मल पॉवर स्टेशन परिसरातील जंगलात २०१६ मध्ये जन्मलेल्या वाघाचे वय सध्या दोन ते अडीच वर्षे आहे.वनाधिकाऱ्यांची बैठक, १० कॅमेरेअमरावती वनविभागाचे उपवनसंरक्षक हरिश्चंद्र वाघमोडे यांच्या दालनात गुरुवारी मेळघाट व्याघ्र प्रकल्प उपवनसंरक्षक विशाल माळी, एनटीसीचे जयंत वडतकर, स्वप्निल सोनवणे, सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे, अशोक कविटकर, आरएफओ आशिष कोकाटे, आनंद सुरत्ने आदी वनाधिकारी, वन्यजीव संरक्षकांची बैठक झाली. मध्य प्रदेशातील वनअधिकाऱ्यांशी माहितीचे आदान-प्रदान झाले. १० कॅमेरे वाघाच्या हालचाली टिपणार असून, मोर्शी, वरूड, परतवाडा वनपरिक्षेत्रातील मध्यप्रदेश सीमेवरील गावांवर अलर्ट ठेवण्यात आला आहे.वनाधिकाऱ्यांची बैठक, १० कॅमेरेअमरावती वनविभागाचे उपवनसंरक्षक हरिश्चंद्र वाघमोडे यांच्या दालनात गुरुवारी मेळघाट व्याघ्र प्रकल्प उपवनसंरक्षक विशाल माळी, एनटीसीचे जयंत वडतकर, स्वप्निल सोनवणे, सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे, अशोक कविटकर, आरएफओ आशिष कोकाटे, आनंद सुरत्ने आदी वनाधिकारी, वन्यजीव संरक्षकांची बैठक झाली. मध्य प्रदेशातील वनअधिकाºयांशी माहितीचे आदान-प्रदान झाले. १० कॅमेरे वाघाच्या हालचाली टिपणार असून, मोर्शी, वरूड, परतवाडा वनपरिक्षेत्रातील मध्यप्रदेश सीमेवरील गावांवर अलर्ट ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Tigerवाघ