शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

ग्रा.पं.च्या प्रचारतोफा थंडावल्या; आता बंदद्वार बैठकी, तडजोडींवर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 14:48 IST

रविवारी मतदान, २५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी; उमेदवार, नेत्यांची होणार परीक्षा

अमरावती : गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात २५७ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत थेट राजकीय पक्षांची ‘एन्ट्री’ नसली तरी गावा-गावातील पॅनल हे कोणत्या तरी राजकीय पक्षाशी निगडित आहे. त्यामुळे शुक्रवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता प्रचार तोफा थंडावल्या आहेत. आता उमेदवारांच्या विजयासाठी नेत्यांची परीक्षा ठरणार आहे. परिणामी नेत्यांनी आता बंदद्वार बैठकी आणि तडजोडींवर भर देण्याची रणनीती आखली आहे. यात कोण यशस्वी होते, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यात २५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी आहे. १४ तालुक्यांत ही निवडणूक होत असून, ८३५ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. पाच ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे १८ डिसेंबर राेजी २५२ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात येणार आहे. ही निवडणूक ग्रामीण भागाशी निगडित असल्याने त्या-त्या विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी आपले वर्चस्व असलेल्या ग्रामपंचायतीवर विजय मिळविण्यासाठी शनिवारचा दिवस बंदद्वार बैठकी, तडजोडींवर भर देण्यासाठी नियोजन केले आहे. प्रचार तोफा थंडावल्यामुळे आता गुप्त बैठकी आणि मतदारांच्या भेटीगाठींवर लक्ष केंद्रित केले आहे.

ग्रामपंचायत निकालावर आमदारांची परीक्षा

जिल्ह्यात १४ तालुक्यात २५२ ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्यांसाठी रविवारी मतदान होणार आहे. विशेषत: आमदार यशोमती ठाकूर, बच्चू कडू, राजकुमार पटेल, बळवंत वानखडे, रवी राणा, देवेंद्र भुयार यांच्या विधानसभा क्षेत्रात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असल्याने जणू त्यांची परीक्षा ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार प्रवीण पोटे पाटील यांनीही या निवडणुकीत उडी घेतल्याने १४ तालुक्यांत चुरस वाढल्याचे चित्र आहे.

थेट सरपंचपदाच्या निवडणुकीने आली रंगत

यंदा पहिल्यांदाच थेट सरपंचपदाची निवडणूक होत आहे. २५२ ग्रामपंचायतींमधून मतदारांना थेट सरपंच निवडून द्यायचे आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी घरोघरी प्रचार करून मतदारांशी भेटीगाठींचा सिलसिला गत १५ दिवसांपासून सुरू आहे. तथापि, शुक्रवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावताच उमेदवारांसह नेत्यांच्या पायाला भिंगरी लागल्याचे दिसून आले. काही ग्रामपंचायत निवडणुकीत विजयासाठी काही उणिवा आहेत, हे लक्षात येताच त्या दूर करण्यासाठी नेत्यांनी प्लॅनिंग चालविले आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकAmravatiअमरावती