शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ग्रा.पं.च्या प्रचारतोफा थंडावल्या; आता बंदद्वार बैठकी, तडजोडींवर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 14:48 IST

रविवारी मतदान, २५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी; उमेदवार, नेत्यांची होणार परीक्षा

अमरावती : गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात २५७ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत थेट राजकीय पक्षांची ‘एन्ट्री’ नसली तरी गावा-गावातील पॅनल हे कोणत्या तरी राजकीय पक्षाशी निगडित आहे. त्यामुळे शुक्रवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता प्रचार तोफा थंडावल्या आहेत. आता उमेदवारांच्या विजयासाठी नेत्यांची परीक्षा ठरणार आहे. परिणामी नेत्यांनी आता बंदद्वार बैठकी आणि तडजोडींवर भर देण्याची रणनीती आखली आहे. यात कोण यशस्वी होते, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यात २५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी आहे. १४ तालुक्यांत ही निवडणूक होत असून, ८३५ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. पाच ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे १८ डिसेंबर राेजी २५२ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात येणार आहे. ही निवडणूक ग्रामीण भागाशी निगडित असल्याने त्या-त्या विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी आपले वर्चस्व असलेल्या ग्रामपंचायतीवर विजय मिळविण्यासाठी शनिवारचा दिवस बंदद्वार बैठकी, तडजोडींवर भर देण्यासाठी नियोजन केले आहे. प्रचार तोफा थंडावल्यामुळे आता गुप्त बैठकी आणि मतदारांच्या भेटीगाठींवर लक्ष केंद्रित केले आहे.

ग्रामपंचायत निकालावर आमदारांची परीक्षा

जिल्ह्यात १४ तालुक्यात २५२ ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्यांसाठी रविवारी मतदान होणार आहे. विशेषत: आमदार यशोमती ठाकूर, बच्चू कडू, राजकुमार पटेल, बळवंत वानखडे, रवी राणा, देवेंद्र भुयार यांच्या विधानसभा क्षेत्रात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असल्याने जणू त्यांची परीक्षा ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार प्रवीण पोटे पाटील यांनीही या निवडणुकीत उडी घेतल्याने १४ तालुक्यांत चुरस वाढल्याचे चित्र आहे.

थेट सरपंचपदाच्या निवडणुकीने आली रंगत

यंदा पहिल्यांदाच थेट सरपंचपदाची निवडणूक होत आहे. २५२ ग्रामपंचायतींमधून मतदारांना थेट सरपंच निवडून द्यायचे आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी घरोघरी प्रचार करून मतदारांशी भेटीगाठींचा सिलसिला गत १५ दिवसांपासून सुरू आहे. तथापि, शुक्रवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावताच उमेदवारांसह नेत्यांच्या पायाला भिंगरी लागल्याचे दिसून आले. काही ग्रामपंचायत निवडणुकीत विजयासाठी काही उणिवा आहेत, हे लक्षात येताच त्या दूर करण्यासाठी नेत्यांनी प्लॅनिंग चालविले आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकAmravatiअमरावती