शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

ग्रा.पं.च्या प्रचारतोफा थंडावल्या; आता बंदद्वार बैठकी, तडजोडींवर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 14:48 IST

रविवारी मतदान, २५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी; उमेदवार, नेत्यांची होणार परीक्षा

अमरावती : गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात २५७ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत थेट राजकीय पक्षांची ‘एन्ट्री’ नसली तरी गावा-गावातील पॅनल हे कोणत्या तरी राजकीय पक्षाशी निगडित आहे. त्यामुळे शुक्रवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता प्रचार तोफा थंडावल्या आहेत. आता उमेदवारांच्या विजयासाठी नेत्यांची परीक्षा ठरणार आहे. परिणामी नेत्यांनी आता बंदद्वार बैठकी आणि तडजोडींवर भर देण्याची रणनीती आखली आहे. यात कोण यशस्वी होते, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यात २५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी आहे. १४ तालुक्यांत ही निवडणूक होत असून, ८३५ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. पाच ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे १८ डिसेंबर राेजी २५२ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात येणार आहे. ही निवडणूक ग्रामीण भागाशी निगडित असल्याने त्या-त्या विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी आपले वर्चस्व असलेल्या ग्रामपंचायतीवर विजय मिळविण्यासाठी शनिवारचा दिवस बंदद्वार बैठकी, तडजोडींवर भर देण्यासाठी नियोजन केले आहे. प्रचार तोफा थंडावल्यामुळे आता गुप्त बैठकी आणि मतदारांच्या भेटीगाठींवर लक्ष केंद्रित केले आहे.

ग्रामपंचायत निकालावर आमदारांची परीक्षा

जिल्ह्यात १४ तालुक्यात २५२ ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्यांसाठी रविवारी मतदान होणार आहे. विशेषत: आमदार यशोमती ठाकूर, बच्चू कडू, राजकुमार पटेल, बळवंत वानखडे, रवी राणा, देवेंद्र भुयार यांच्या विधानसभा क्षेत्रात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असल्याने जणू त्यांची परीक्षा ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार प्रवीण पोटे पाटील यांनीही या निवडणुकीत उडी घेतल्याने १४ तालुक्यांत चुरस वाढल्याचे चित्र आहे.

थेट सरपंचपदाच्या निवडणुकीने आली रंगत

यंदा पहिल्यांदाच थेट सरपंचपदाची निवडणूक होत आहे. २५२ ग्रामपंचायतींमधून मतदारांना थेट सरपंच निवडून द्यायचे आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी घरोघरी प्रचार करून मतदारांशी भेटीगाठींचा सिलसिला गत १५ दिवसांपासून सुरू आहे. तथापि, शुक्रवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावताच उमेदवारांसह नेत्यांच्या पायाला भिंगरी लागल्याचे दिसून आले. काही ग्रामपंचायत निवडणुकीत विजयासाठी काही उणिवा आहेत, हे लक्षात येताच त्या दूर करण्यासाठी नेत्यांनी प्लॅनिंग चालविले आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकAmravatiअमरावती