शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

मागितली भाकरी, मिळाली गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 01:36 IST

पुनर्वसनाने आम्हाला दिले काय? दोन टाइमच्या जेवणाची सोय नाही, शेतीची मागणी केली, मुंबईला बैठका झाल्यात, त्या वांझोटा ठरल्या. देतो म्हणतात, पण प्रत्यक्ष काही देत नाही, अशी व्यथा आदिवासी महिलांनी बुधवारी मांडली.

नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : पुनर्वसनाने आम्हाला दिले काय? दोन टाइमच्या जेवणाची सोय नाही, शेतीची मागणी केली, मुंबईला बैठका झाल्यात, त्या वांझोटा ठरल्या. देतो म्हणतात, पण प्रत्यक्ष काही देत नाही, अशी व्यथा आदिवासी महिलांनी बुधवारी मांडली.'जंगलात गेलो तर गोड बोलून परत आणतात. पुन्हा विसरून जातात. आता तिसऱ्यांदा गेलो आश्वासने सोडून. प्रत्यक्षात शेतजमीन व दीड लक्ष रुपये मिळाल्याशिवाय उठायचे नाही, असा ठाम निर्धार केला ते तर मिळालेच नाही. मात्र, वनाधिकाऱ्यांनी आम्हाला बळजबरीने काढण्यासाठी लाठीचार्ज केला. अश्रूधुरांच्या नळकांड्या आमच्यावर फोडल्या. आमच्या दुचाकी जाळल्या. सामानाची तोडफोड केली. अन्नधान्यांची नासधूस केली. महिला पुरुषांना झोडपून काढले आणि यातूनच संघर्ष उडाला. यात आमचा दोष काय, हे आम्हाला सांगा आम्ही जगायचे कसे? गावातील दहा एकर जमीन असताना इथे इंचभर जमिनीचा तुकडा नाही, खायचे काय, जगायचे कसे, या विवंचनेत आम्ही आठ गावांतील पुनर्वसित आदिवासी कसेबसे दिवस काढत आहोत. त्यात तीनशेवर आदिवासी युवक, वृद्धांचा मृत्यू या सहा वर्षांत झाला. संपूर्ण पिढीच आमची नष्ट करण्याचा हा डाव शासनाने रचला आहे. किती सहायचे आम्ही? आता आमचा हक्क घेऊनच राहू, यासाठीच आम्ही उर्वरित जीवन कंठत असल्याचे चंपालाल लाभू बेठेकरसह गंगा कासदेकर फुलकली आदी महिलांनी बुधवारी अमोना कासोद या गावी आपल्या व्यथा 'लोकमत'जवळ मांडल्या. पुनर्वसन दरम्यान आमच्या बँकेतील खात्यात टाकलेल्या दहा लक्ष रुपयातून हातपंप नाल्या रस्ते आदी मूलभूत सुविधा करून देण्यात येणार असा कुठल्याच प्रकारचा निर्णय आम्हाला सांगण्यात आला नव्हता त्या पैशातूनच सर्व पुनर्वसनाच्या सोयीसुविधा देण्यात आल्या त्यामुळे आमच्या पोटाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला त्या दहा लक्ष रुपयातून शेती किंवा इतर काही घेण्याची आमची उमेद होती मात्र शासनाच्या निर्णयाचे बसत नसल्याने आम्ही मूलभूत सुविधा व शेतीचा प्रस्ताव शासनाकडे ठेवला मागील तीन वर्षांपासून आम्हाला केवळ भूलथापाच दिल्याचे त्या म्हणाल्या.हल्ल्याचा आयएफएस असोसिएशनकडून निषेधमेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात कर्तव्यावर असलेल्या वनाधिकारी-कर्मचारी, पोलीस अधिकाºयांवर केलेल्या हल्ल्याचा आयएफएस असोसिएशनकडून निषेध करण्यात आला. असामाजिक घटकांकडून झालेल्या या हल्ल्यात कर्तव्यावरील वनाधिकारी, वनकर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झालेत. या खुनी हल्ल्यात काही गंभीर झालेत. यावर त्यांनी खेद, दु:ख व्यक्त केले. हल्लेखोरांवर, असामाजिक घटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आयएफएस असोसिएशनकडून करण्यात आली आहे.लाठीमार केला अन् संघर्षाला सुरुवात झालीजंगलात मंगळवारी आदिवासींचा वनविभाग व पोलीस कर्मचाºयांशी संघर्ष झाल्यानंतर मिळेल त्या जंगलातील रस्त्याने महिला-पुरुष पळत सुटले. पुढे वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी होते. त्यांच्या मागे संरक्षणासाठी पोलीस, सीआरपीएफचे जवान होते. वनविभागाने आदिवासींची वाहने पेटविली. लाठीहल्ला केला. धान्याची नासधूस करून जंगलाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जंगलात आदिवासी सैरावैरा पळत होते. रात्री २ वाजता अमोना कासोद गावी आले. २० पेक्षा अधिक महिला, पुरुष जखमी झालेत. चंपालाल बेठेकर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने जंगलात तो पडून होता. त्याने जीव मुठीत घेऊन कसाबसा पळ काढला. सहकाऱ्यांनी अंगावर गवत टाकून त्याला लपविले. सर्व शांत झाल्यावर एक किमीपर्यंत त्याला फरफटत नेले. काही बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याची मागणी आदिवासींनी केली आहे.आदिवासींनीच केला हल्लाजंगलातून बाहेर पुनर्वसित गावी चला, अशा विनवण्या आदिवासींना वारंवार करण्यात आल्या. मंगळवारीसुद्धा तेच सुरू असताना अचानक वनकर्मचारी पोलिसांच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकून धारदार कुºहाड व शस्त्रांनी हल्ला चढविला. गोफणीने दगड भिरकावले. त्यात सीआरपीएफच्या जवानांकडे असलेल्या सुरक्षा जाळी तुटल्या. अधिकारी-कर्मचारी जीव मुठीत घेऊन जंगलातून पळत सुटले. समजावण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्याने हा संपूर्ण ताफा परत जात असताना हा हल्ला झाल्याचे चिखलदरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक आकाश शिंदे व तहसीलदार प्रदीप पवार यांनी सांगितले.