शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

धनगर समाजाची राजकीय, शैक्षणिक, आर्थिक सक्षमीकरणाची साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 05:01 IST

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शुक्रवारी आयोजित विभागीय धनगर कार्यकर्ता परिषदेत हाच धागा पकडून पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, रेटून खोटे बोलणाऱ्यांनी आश्वासनधर्म पाळला नाही. त्यामुळे आता अशा प्रवृत्तींना थांबविले पाहिजे. खरे तर धनगर समाज हा प्रेमाची भावना जोपासणारा समाज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी निवडणुकीत मतांसाठी भाजपने केवळ आश्वासन दिले. प्रत्यक्ष काहीही केले नाही. त्यामुळे धनगर समाजाला राजकीय, शैक्षणिक, आर्थिक सक्षमीकरणाची अपेक्षा आहे, हा सूर अमरावती येथे आयोजित विभागीय धनगर कार्यकर्ता परिषदेत उमटला. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शुक्रवारी आयोजित विभागीय धनगर कार्यकर्ता परिषदेत हाच धागा पकडून पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, रेटून खोटे बोलणाऱ्यांनी आश्वासनधर्म पाळला नाही. त्यामुळे आता अशा प्रवृत्तींना थांबविले पाहिजे. खरे तर धनगर समाज हा प्रेमाची भावना जोपासणारा समाज आहे. त्यामुळे समाजाला राजकीय, शैक्षणिक, आर्थिक सक्षमीकरणासाठी न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व जण तुमच्यासोबत असल्याचे सांगत या समाजाला सामाजिक, शैक्षणिक, राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध आहोत.परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले होते. प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री यशोमती ठाकूर, काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजीभाई देसाई, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, आ. बळवंत वानखडे, दिव्यांग विभागाचे प्रदेशाध्यक्ष किशोर बोरकर, प्रवक्ते तथा आयोजक दिलीप एडतकर, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, प्रदेश उपाध्यक्ष भैया पवार उपस्थित होते.धनगर समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी, समाजाचे सर्वसमावेशक सक्षमीकरण करण्यासाठी काँग्रेस पक्ष व आम्ही सर्व मंडळी सोबत असल्याची ग्वाही मान्यवरांनी यावेळी दिली. कार्यकर्ता परिषदेला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धनगर समाजाच्या आरक्षणाची सबुरी संपत आहेपरिषदेला संबोधित करताना माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख म्हणाले, शिर्डी येथे काँग्रेसचे नवसंकल्प शिबिर पार पडले. यावेळी या ठिकाणी श्रद्धा, सबुरी असे शब्द सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी २०१४ मध्ये भाजपने आश्वासन दिले होते. परंतु, पाच वर्षात काहीच मिळाले नाही. त्यामुळे आता धनगर समाजाची सबुरी संपत आली आहे. गत निवडणुकीत भाजपने दिलेला ‘सबका साथ सबका विकास’चा नारा मतदारांच्या पचनी पडला. मात्र, देशात आता लोकांचे महत्त्वाचे प्रश्न सोडून काय चालले आहे, हे पाहतच आहात. त्यामुळे आता धनगर समाजाने जागरूक राहावे, असे आवाहन सुनील देशमुख यांनी यावेळी केले.  

चुकीच्या व्यवस्थेमुळे न्याय मागण्याची वेळ : पटाेलेधनगर समाज हा मागणारा नाही, देणारा समाज होता. मात्र, सध्या देशात चुकीच्या व्यवस्थेमुळे या समाजाला आरक्षणाची मागणी करावी लागत आहे. भाजपने आश्वासन न पाळता केवळ मते घेतली. आम्ही लोकशाही मार्गाने व संविधानावर विश्वास ठेवणारे आहोत. याच मार्गाने धनगर समाजाला न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी  दिले.

राजस्थानमध्ये सबसिडी, मग येथेही द्यावी : देसाईधनगर समाजाचा मुख्य व्यवसाय मेंढ्या, गाई, म्हशी पाळणे हा आहे. शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या या समाजाला आरक्षण तर मिळायला हवेच, याशिवाय राजस्थान सरकारकडून दुग्धजन्य पदार्थ निर्मितीवर पाच टक्के सबसिडी दिली जाते. ती महाराष्ट्र सरकारनेही देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजीभाई देसाई यांनी केली.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरDhangar Reservationधनगर आरक्षण