शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

धनगर समाजाची राजकीय, शैक्षणिक, आर्थिक सक्षमीकरणाची साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 05:01 IST

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शुक्रवारी आयोजित विभागीय धनगर कार्यकर्ता परिषदेत हाच धागा पकडून पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, रेटून खोटे बोलणाऱ्यांनी आश्वासनधर्म पाळला नाही. त्यामुळे आता अशा प्रवृत्तींना थांबविले पाहिजे. खरे तर धनगर समाज हा प्रेमाची भावना जोपासणारा समाज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी निवडणुकीत मतांसाठी भाजपने केवळ आश्वासन दिले. प्रत्यक्ष काहीही केले नाही. त्यामुळे धनगर समाजाला राजकीय, शैक्षणिक, आर्थिक सक्षमीकरणाची अपेक्षा आहे, हा सूर अमरावती येथे आयोजित विभागीय धनगर कार्यकर्ता परिषदेत उमटला. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शुक्रवारी आयोजित विभागीय धनगर कार्यकर्ता परिषदेत हाच धागा पकडून पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, रेटून खोटे बोलणाऱ्यांनी आश्वासनधर्म पाळला नाही. त्यामुळे आता अशा प्रवृत्तींना थांबविले पाहिजे. खरे तर धनगर समाज हा प्रेमाची भावना जोपासणारा समाज आहे. त्यामुळे समाजाला राजकीय, शैक्षणिक, आर्थिक सक्षमीकरणासाठी न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व जण तुमच्यासोबत असल्याचे सांगत या समाजाला सामाजिक, शैक्षणिक, राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध आहोत.परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले होते. प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री यशोमती ठाकूर, काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजीभाई देसाई, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, आ. बळवंत वानखडे, दिव्यांग विभागाचे प्रदेशाध्यक्ष किशोर बोरकर, प्रवक्ते तथा आयोजक दिलीप एडतकर, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, प्रदेश उपाध्यक्ष भैया पवार उपस्थित होते.धनगर समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी, समाजाचे सर्वसमावेशक सक्षमीकरण करण्यासाठी काँग्रेस पक्ष व आम्ही सर्व मंडळी सोबत असल्याची ग्वाही मान्यवरांनी यावेळी दिली. कार्यकर्ता परिषदेला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धनगर समाजाच्या आरक्षणाची सबुरी संपत आहेपरिषदेला संबोधित करताना माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख म्हणाले, शिर्डी येथे काँग्रेसचे नवसंकल्प शिबिर पार पडले. यावेळी या ठिकाणी श्रद्धा, सबुरी असे शब्द सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी २०१४ मध्ये भाजपने आश्वासन दिले होते. परंतु, पाच वर्षात काहीच मिळाले नाही. त्यामुळे आता धनगर समाजाची सबुरी संपत आली आहे. गत निवडणुकीत भाजपने दिलेला ‘सबका साथ सबका विकास’चा नारा मतदारांच्या पचनी पडला. मात्र, देशात आता लोकांचे महत्त्वाचे प्रश्न सोडून काय चालले आहे, हे पाहतच आहात. त्यामुळे आता धनगर समाजाने जागरूक राहावे, असे आवाहन सुनील देशमुख यांनी यावेळी केले.  

चुकीच्या व्यवस्थेमुळे न्याय मागण्याची वेळ : पटाेलेधनगर समाज हा मागणारा नाही, देणारा समाज होता. मात्र, सध्या देशात चुकीच्या व्यवस्थेमुळे या समाजाला आरक्षणाची मागणी करावी लागत आहे. भाजपने आश्वासन न पाळता केवळ मते घेतली. आम्ही लोकशाही मार्गाने व संविधानावर विश्वास ठेवणारे आहोत. याच मार्गाने धनगर समाजाला न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी  दिले.

राजस्थानमध्ये सबसिडी, मग येथेही द्यावी : देसाईधनगर समाजाचा मुख्य व्यवसाय मेंढ्या, गाई, म्हशी पाळणे हा आहे. शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या या समाजाला आरक्षण तर मिळायला हवेच, याशिवाय राजस्थान सरकारकडून दुग्धजन्य पदार्थ निर्मितीवर पाच टक्के सबसिडी दिली जाते. ती महाराष्ट्र सरकारनेही देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजीभाई देसाई यांनी केली.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरDhangar Reservationधनगर आरक्षण