शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

टोकनच्या चार लाख क्विंटल तुरीची शासन खरेदी

By admin | Updated: July 7, 2017 00:27 IST

केंद्राने मुदतवाढ बाजार हस्तक्षेप योजनेची मूदत १० जून रोजी संपुष्टात आल्यानंतर अद्यापही मुदतवाढ

शेतकऱ्यांना दिलासा : १८ हजार शेतकऱ्यांना शासनादेशाची प्रतीक्षा लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : केंद्राने मुदतवाढ बाजार हस्तक्षेप योजनेची मूदत १० जून रोजी संपुष्टात आल्यानंतर अद्यापही मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे टोकन दिलेल्या किमान १८ हजार ६४५ शेतकऱ्यांची चार लाख १६ हजार क्विंटल तूर घरी पडून होती. मात्र शासनाद्वारा ही तूर खरेदी करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे यंदाच्या खरिपात आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात १० मे पासुन पीएसएस योजनेव्दारा तुरीची खरेदी करण्यात आली. मात्र केंद्र शानाने निर्धारीत केलेला कोट्याची तूर २६ मे रोजी पूर्ण झाल्याने जिल्ह्यासह राज्यातील सर्व तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आली.त्यामुळे विहीत कालावधीत राज्य शासनाव्दारा बाजार हस्तक्षेप योजना राबविण्यात आली. व बाजार समित्यांच्या आवारात उघड्यावर परंतू टोकन देण्यात आलेल्या तुरीची खरेदी करण्यात आली. मात्र ही मुदत देखील १० जून रोजी संपल्याने ज्या केंद्रावर तूर खरेदी व मोजणी बाकी होती.त्या तुरीची प्रथम खरेदी करण्यात आली.मात्र टोकन दिलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीच्या खरेदी विषयी कोणतेच आदेश नसल्याने खरीपाच्या पेरणीच्या काळात शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले होते.आता मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी बुधवारी १०जून पर्यत टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची तूर येत्या दोन दिवसात खरेदी करण्यात येईल असे अस्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. व्यापाऱ्यांद्वारा बेभाव खरेदी ४यंदाचा खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतकरी अडचणीत आहे, हे हेरून हमीभावापेक्षा दीड ते दोन हजार रूपये कमी भावाने व्यापाऱ्यांद्वारा तुरीची खरेदी करण्यात आली.काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर टोकन घेतल्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी तूर शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. अशी आहे तूर खरेदी बाकी ४जिल्ह्यात सद्यस्थितीत अचलपूर केंद्रावर १,७९५ शेतकऱ्यांची ३७,१५२ क्विंटल, अमरावती केंद्रावर ३,६५० शेतकऱ्यांची १,२,४६९, अंजनगाव केंद्रावर २,१४९ शेतकऱ्यांची ३५,६०७ चांदूरबाजार केंद्रावर १,२३३ शेतकऱ्यांची २३,५११, चांदूररेल्वे केंद्रावर १,७६९ शेतकऱ्यांची ३३,९७२ दर्यापूर केंद्रावर २,७३८ शेतकऱ्यांची ७४,०५६, धामणगाव केंद्रावर ३३३ शेतकऱ्यांची ११,५७३ मोर्शी केंद्रावर १,९१५ शेतकऱ्यांची ३८,९३१, नांदगाव खंडेश्वर केंद्रावर १७९२ शेतकऱ्यांची ३४,३४४, तिवसा केंद्रावर ९२३ शेतकऱ्यांची २१,१५३, व वरूड केंद्रावर २६४ शेतकऱ्यांची २,१४४ क्विंटल तुरीची खरेदी व मोजणी व्हायची आहे. ४७ हजार शेतकऱ्यांची ९.५७ लाख क्विंटल तूर खरेदी ४जिल्ह्यात १० जून पर्यत ४७ हजार ९७६ शेतकऱ्यांची नऊ लाख ५७ हजार २६५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.यामध्ये जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांद्वारा ३६ हजार ८१३ शेतकऱ्यांची सात लाख ३२ हजार २५५ क्विंटल, व्हीसीएमएफ द्वारा १० हजार ७६० शेतकऱ्यांची दोन लाख २० हजार ५४७ क्विंटल, आदिवासी विकास महामंडळाद्वारा ४०० शेतकऱ्यांची चार हजार ४६२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे.