शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

जळालेले रेकॉर्ड अन्य कार्यालयांमध्ये सेफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 23:13 IST

ऊर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या वसाहतीत असलेल्या जलसंपदा विभागांंतर्गत येणारे कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) कार्यालयाला मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत कार्यालयातील महत्त्वाच्या दस्तावेजासह कम्प्यूटर व इतर साहित्य जळून खाक झाले होते.

ठळक मुद्देकार्यालय नवीन जागी : सीईकडून घटनास्थळाची पाहणी

आॅनलाईन लोकमतअमरावती: ऊर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या वसाहतीत असलेल्या जलसंपदा विभागांंतर्गत येणारे कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) कार्यालयाला मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत कार्यालयातील महत्त्वाच्या दस्तावेजासह कम्प्यूटर व इतर साहित्य जळून खाक झाले होते. ६० ते ७० टक्के दस्तावेज जळाले असून, ३० टक्के महत्त्वाचे दस्तावेज वाचविण्यात यंत्रणेला यश आले आहे. कनिष्ठ व वरिष्ठ पातळीवर सदर दस्तावेज सेफ असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजनेकर यांनी दिली आहे.सदर आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली की इतर कारणामुळे लागली, याची चौकशी सुरू आहे. मात्र, या आगातून सावरून एका दिवसाच्या आतच जलसंपदा विभागाने एक निवासस्थान या कार्यालयासाठी दिले असून, बुधवारपासून या कार्यालयात तात्पुरते आॅफीस सुरू करण्यात आले आहे. कार्यकारी अभियंत्यासह २२ कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत.यांत्रिकी विभागाचे नाशिक येथील मुख्य अभियंता अशोक बोडखे हे रात्री उशिरा अमरावतीत आले. त्यांनी बुधवारी सकाळी जळालेल्या साहित्याची व विभागाची पाहणी केली आणि कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा केली. नागपूरचे अधीक्षक अभियंता सी.बी. मडामे व कार्यकारी अभियंता अनिल राजनेकर यांनीसुद्धा पाहणी केली होती. यांत्रिकी विभागाच्या उपविभागीय कार्यालयाकडून जे रेकॉर्ड व पत्रव्यवहार कार्यकारी अभियंता कार्यालयाला पाठविण्यात आला, तो पुन्हा मागविण्यात येणार आहे तसेच अधीक्षक अभियंता कार्यालय, नागपुर या ठिकाणी पाठविलेले रेकॉर्डसुद्धा रिकव्हर करण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाच्या दोन्ही मुख्य अभियंता कार्यालयाचे रेकॉर्ड सेफ असल्याचे अधीक्षक अभियंता रमेश ढवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सव्वाचार लाखांचे नुकसानआगीत जळून खाक झालेल्या साहित्याची प्राथमिक किंमत ही सव्वाचार लाख एवढी काढण्यात आली आहे. यामध्ये पाच कम्प्यूटर, दोन प्रिंटर, २० टेबल व २० खुर्च्यांचा समावेश आहे. २२ आलमाऱ्यासुद्धा जळून खाक झाल्या आहेत. असे एकूण सव्वाचार लाखांची नुकसान झाले आहे. सदर इमारत ही ३५ वर्षांपूर्वीची आहे. बाजूला कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. आगीवर त्वरित नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला.आस्थापना विभाग व इतर विभागांचे रेकॉर्ड जळाले आहे. ते कनिष्ठ व वरिष्ठ कार्यालयाकडून मागविण्यात येणार आहेत. जे काही दस्तावेज आगीतून वाचले, त्यांची पडताळणी सुरू आहे. सव्वाचार लाखांचे नुकसान झाले आहे.- अनिल राजनेकरकार्यकारी अभियंता (यांत्रिकी) जलसंपदा, अमरावती.