शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
3
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
4
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
5
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
6
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
7
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
8
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
9
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
10
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
14
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
15
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
16
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
17
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
18
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
19
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
20
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र

बैलबाजाराचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 01:22 IST

ब्रिटिशकाळापासून सुरू असलेला चांदूर बाजारातील बैल बाजार विदर्भातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध होता. या बाजारात दररोज लाखो रुपयांचा बैलजोड्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होत होते. त्यासाठी राजस्थान, गुजरात तसेच राज्यातील मराठवाडा व विदर्भातील सुप्रसिद्ध व्यापारी येत होते.

ठळक मुद्देचांदूर बाजारात लाखोंचा सेस : बाजार समितीच्या चुकीच्या धोरणाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीच्या चुकीच्या धोरणामुळे ऐतिहासिक बैलबाजाराचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे लाखो रुपये किमतीच्या बैलजोड्या विक्री दरम्यान रस्त्यावर उभे ठेवण्याची वेळ परप्रांतीय व्यापाऱ्यांवर येऊन ठेपली आहे.ब्रिटिशकाळापासून सुरू असलेला चांदूर बाजारातील बैल बाजार विदर्भातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध होता. या बाजारात दररोज लाखो रुपयांचा बैलजोड्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होत होते. त्यासाठी राजस्थान, गुजरात तसेच राज्यातील मराठवाडा व विदर्भातील सुप्रसिद्ध व्यापारी येत होते. मुख्य बैलबाजार रविवारी भरत असला तरीही आठवडाभर बैलजोडीची खरेदी-विक्री होत असे. यामधून दरवर्षी सेसच्या रूपाने लाखो रुपयांचे उत्पन्न स्थानिक बाजार समितीला प्राप्त व्हायचे. यामुळे या बाजारात चांगल्या सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे.बैलबाजारात खरीदी-विक्रीत गैरव्यवहार होत असल्याचे पोलिसांनी उघड केले होते. यात बाजार समितीच्या सर्व संचालकांना आरोपी करण्यात आले होते. त्यामुळे केवळ बाजाराच्या दिवशीच बैल बाजारात आणावे, असा ठराव घेत संचालकांनी परप्रांतीय बैलजोड्यांना आवाराबाहेर काढले. यामुळे जनावरांची तस्करी वाढली; त्यामुळे विके्रत्यांना व बाजार समितीला मोठा फटका बसला. बाजार समितीच्या चुकीच्या धोरणामुळे उत्पन्नातसुद्धा मोठी घट झाली आहे.बैलजोड्या रस्त्यावरबाजार समितीच्या तुघलकी धोरणामुळे या ऐतिहासिक बैलबाजाराचे अस्तित्व धोक्यात आले आहे. परप्रांतातून विक्रीसाठी आणल्या जाणाºया बैलजोड्या आज मुख्य रस्त्यावर बांधण्याची वेळ या विक्रेत्यांवर आली आहे. यामुळे अनेक परप्रांतीय व्यापाऱ्यांनी या ऐतिहासिक बैलबाजाराकडे पाठ फिरवली आहे.अपघाताची शक्यताबाजार समितीपुढून जाणारा मार्ग हा मध्य प्रदेशात वाहतुकीसाठी अतिशय कमी अंतराचा असल्याने दिवस-रात्र वाहतूक सुरूच असते. रस्त्यावर लावण्यात येणाºया बैलजोड्यांमुळे या मार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.लाखोंची जोडी मिळण्याचे एकमेव स्थानराज्यातील मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातून सुदृढ, देखण्या बैलजोड्या खरेदी-विक्रीसाठी चांदूर बाजार येथील बैलबाजारात आणले जात असत. राजस्थानातील नागोर, खिमसरा या भागातील सुप्रसिद्ध बैलजोड्यासुद्धा व्यापारी आणत होते. या जोडीची किंमत लाखोंच्या घरात असते. हे वैभव आता लयाला गेले असून, त्याकडे बाजार समितीने दुर्लक्ष केले आहे.

टॅग्स :Marketबाजार