परतवाडा : शहरातून वाहणाऱ्या बिच्छन नदीपात्रावर उंच पुलाची निर्मिती करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. पालिकेच्यावतीने टाकला जाणाऱ्या सिमेंट रपट्याचे काम बंद करून उंच पूल करण्याचे निवेदन देण्यात आले आहे.
बिच्छन नदीचे अरुंद पात्र व कुटीया मंदिराजवळील लहान पुलावर थबकणारे पाणी नागरी वस्तीत शिरकाव करते. त्यामुळे कुटीया मंदिराजवळ मोठ्या उंच पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी गुलाबबाबा मंदिर, श्याम टॉकीज, पांढरा पुल परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. कुटीया मंदिराजवळील रपटा टाकून बनविल्या जाणाऱ्या पुलाचे काम थांबविण्याची मागणी कैलाश कलाने, दशरथ खंडारे, महेंद्र गौर, रवि गौर, महेश पानबुडे, योगेश इंगोले, शुभम झोंबाडे, वरुण काळे, विशाल राऊत, तेजस सलामे, सुभाष खंडारे, किरण राजपाल, देवकाबाई गौर, नंदा वाटके, रेखा गौर, मालती गौर, चंदा अंबोरे, प्रभा अढाऊ यांनी केली आहे.