शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

म्हशीची शिकार, वाघ परिसरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 01:04 IST

मोहन राऊत। लोकमत न्यूज नेटवर्क धामणगाव रेल्वे : ८१ वेळा दात व पंजाने मारा करून शेतकरी राजेंद्र देवीदास निमकर ...

ठळक मुद्देकॅमेऱ्यात कैद : दोन दिवसांपासून मुक्काम; मंगरूळ दस्तगीरसह २२ गावे दहशतीखाली

मोहन राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : ८१ वेळा दात व पंजाने मारा करून शेतकरी राजेंद्र देवीदास निमकर (४५) यांना ठार करणाऱ्या नरभक्षक वाघाने दुसऱ्या दिवशी म्हशीची शिकार केली़ वनविभागाने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा वाघ कैद झाला आहे़ दरम्यान, दोन दिवसांपासून परिसरात या वाघाचा मुक्काम असून, अंजनसिंगी, कौंडण्यपूर भागातील २२ गावे अलर्ट करण्यात आली आहेत.अनेक गावे रात्रीला या नरभक्षक वाघाच्या दहशतीत आहे़ शनिवारच्या रात्रीला गावाच्या परिसरात शिरला असल्याची अफवा पसरल्याने ग्रामस्थ टेंभे घेऊन घराबाहेर पडले. झाडा, आष्टा, गिरोली, चिंचोली, येरली, सोनोरा काकडे, गोकुळसरा या गावातील लोकांनी रात्र जागूून काढली असली तरी एकाच ठिकाणी या वाघाचा मुक्काम असल्याचे स्पष्ट झाले आहे़मृत राजेंद्र निमकर यांना या ठिकाणी वाघाने ठार केले, त्या भागात वनविभागाच्यावतीने म्हैस खरेदी करून बांधण्यात आली होती़ रात्री १२ ते ३ च्या दरम्यान या नरभक्षक वाघाने म्हशीवर हल्ला चढविला. मानेवर हल्ला चढवून ही म्हैस त्याने फस्त केली. त्याच्या हालचाली वनविभागाने लावलेल्या तीन सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या आहेत. मोर्शी, वरूड, परतवाडा, अमरावती येथील ३१ बंदूकधारी कर्मचारी मागावर असली तरी प्रथमच मिळालेली माणसाची शिकार करीत दिघी खानापूर व नाकाडाच्या घनदाट जंगलात या वाघाने दोन दिवसांपासून मुक्काम ठोकला असल्याचे स्पष्ट झाले आहे़शेतात ओलीत करण्यासाठी विहिरीजवळील लाइट लावताना पाठीमागून या नरभक्षक वाघाने हल्ला चढविला. तब्बल १० मिनिटे राजेंद्र निमकर यांनी जीव वाचविण्यासाठी धडपड केल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. घटनास्थळावर कपाशीची झाडे उखडली तसेच जमीन उकरण्याच्या अनेक खुणा वनविभागाने केलेल्या पंचनामा अहवालात नमूद आहेत.एखादा शेतकरी, शेतमजूर वाघाच्या हल्यात ठार झाल्यास पूर्वी आठ लाखांची नगदी मदत मिळत असे़ सन २०१५ च्या शासकीय अध्यादेशाप्रमाणे दहा लाखांची मदत वनविभागाने जाहीर केली. केवळ दोन लाख रुपये रोख, तर आठ लाखांचा दहा वर्षांसाठी बॉण्ड केला जातो. किमान घरातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घेणे महत्त्वाचे आहे़ दोन दिवसांपासून निमकर कुटुंबाला वनविभागाने मदत न दिल्याने असंतोष व्यक्त होत आहे़मंगरुळ दस्तगीर शिवारातील नरभक्षक वाघ ट्रॅप कॅमेºयात कैद झाला आहे. त्याचे परिसरातील जंगलातच वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग तातडीने उपाययोजना करीत आहे.- हरिश्चंद्र वाघमोडे, उपवनसंरक्षक, अमरावतीचिरोडी जंगलाकडे होणार प्रस्थान :२२ गावे अलर्टवरोरा जंगलातून देवळी, पुलगाव व थेट अमरावती जिल्ह्यात प्रवेश करणारा हा नरभक्षक वाघ दररोज रात्रीच्या सुमारास १८ ते २० किलोमीटर प्रवास करीत असल्याची माहिती वनविभागाजवळ आहे़ मंगरूळ दस्तगीर येथे मानवाची शिकार मिळाल्याने या वाघाने मुक्काम ठोकला. आगामी दिवसांत नायगाव, वरूड बगाजी, अंजनसिंगी, कौंडण्यपूर, कुºहा, भिवापूर मार्गे चिरोडी, पोहरा जंगलात या वाघाचे प्रस्थान होण्याचे संकेत मिळाल्याने वनविभागाने २२ गावे अलर्र्ट केली असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर व वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी दिली़पिंजऱ्याची परवानगी मिळणार कधी?नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी तथा पिंजऱ्यात अडकविण्याकरिता नागपूरच्या प्रधान मुख्य वाघ्र प्रकल्पाची परवानगी गरजेची असते़ अमरावतीचे उपवनसरंक्षक हरिचंद्र वाघमोडे यांनी शनिवारी यासंदर्भात पत्र प्रधान मुख्य वनसंरक्षक एक़े. मिश्रा यांंना पाठविण्यात आले. सदर नरभक्षक वाघ एकाच ठिकाणी दोन दिवस मुक्कामी असताना अद्यापही पिंजºयाची परवानगी मिळाली नाही़

टॅग्स :Tigerवाघ