शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

१८ कोटींचा अर्थसंकल्प

By admin | Updated: April 1, 2017 00:19 IST

सन २०१७-१८ आर्थिक वर्षाचा जिल्हा परिषदेचा १८ कोटी ४ लाख ४८ हजार १९ रूपयांच्या अंदाजपत्रकाला सीईओंंनी मंजुरी दिली आहे.

जिल्हा परिषद : सीईओंनी दिली मंजुरी, सर्वसाधारण सभेत होणार चर्चा अमरावती : सन २०१७-१८ आर्थिक वर्षाचा जिल्हा परिषदेचा १८ कोटी ४ लाख ४८ हजार १९ रूपयांच्या अंदाजपत्रकाला सीईओंंनी मंजुरी दिली आहे. या बजेटमध्ये विविध विभागासाठी भरीव तरतूद केल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.झेडपीच्या विषय समिती सभापतींची निवडणूक अद्याप झालेली नाही. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प पदाधिकाऱ्यांविना मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी सादर करावा, असे निर्देश राज्य शासनाने दिले होते. तसे परिपत्रकही काढले होते. राज्य शासनाच्या निर्देशानुसार तत्कालीन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी आभाळे यांनी अर्थसंकल्प सादर केला. हे बजेट १८ कोटी ४ लाख ४८ हजार १९ रूपयांचे असून २ लाख ४२ हजार २१४ रूपये शिलकीच्या य्अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. बजेटमध्ये विविध विकासकामांसाठी १८ कोटी ४ लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे. शेतकरी, महिला, अपंग, मागास संवर्गाच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. सन २०१६-१७ च्या सुधारित अंदाजपत्रकानुसार जि.प.चे एकूण महसुली उत्पन्न १५ कोटी ३५ लक्ष ७० हजार रूपये आहे. अंदाजपत्रकात कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. शिक्षण, महिला बालकल्याण, कृषी, समाजकल्याण आणि अपंगांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. प्रथमच माहिती व तंत्रज्ञान कक्षासाठी २० लाख, सुरक्षेसाठी १२ लाख ५० हजार, सायन्स्कोर मैदानाच्या सुरक्षेसाठी ६ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर स्वच्छतागृह आणि पार्किंग व्यवस्थेसाठी ३० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पासाठी सीईओ किरण कुलकर्णी, डेप्युटी सीईओ जे.एन. आभाळे, प्रकाश तट्टे, चंद्रशेखर खंडारे, सहायक राजेंद्र खैरनार, राजेश नाकिल, सहायक लेखा अधिकारी मनीष गिरी आदींची उपस्थिती होती. ५३ टक्के निधी राखीव जिल्हा परिषदेच्या बजेटमध्ये ५३ टक्के निधी शासन निर्णयानुसार राखीव ठेवावा लागतो. यामध्ये अपंग ३ टक्के, महिला बालकल्याण १० टक्के, समाज कल्याणसाठी २० टक्के, पाणीपुरवठा २० टक्के हा राखीव निधी असतो. तो वगळता विविध योजना व विकासकामांसाठी तरतूद करण्यात आली तर १३ वने अंतर्गत प्राप्त होणारे ७ टक्के अनुदान वनक्षेत्रातील कामांसाठीच खर्च करावे लागते.अपंगांना न्यायजिल्हा परिषदेने अपंगांसाठी तीन टक्के राखीव निधीची तरतूद केली आहे. मागील बजेटपेक्षा यंदा अपंगासाठी ४४ लाखांची तरतूद करण्यात आली होती यामध्ये सन २०१७-१८ मध्ये १ कोटी ५५ लाखांची तरतूद केली आहे.त्यामुळे अपंगांना न्याय मिळणार आहे.