शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

‘बीएसएनल’ची महाकृषी सेवा महागली

By admin | Updated: November 4, 2015 00:20 IST

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या महाकृषी एक...

शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री : १ नोव्हेंबरपासून लागू, १४१ रुपये मोजावे लागणार अमरावती : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या महाकृषी एक आणि दोन यांच्या सीयूजी कॉलिंग सुविधेत आता महाकृषी तीन या सुविधेचा समावेश करून एकत्र सीयूजी प्लॅन तयार करण्यात आला आहे. ही सुविधा १ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आली. यामध्ये समाविष्ट ग्राहक ‘अनलिमिटेड’ बोलू शकणार आहे. मात्र यासाठी आता १०८, १०९ व १२८ रुपयांऐवजी १४१ रुपये मोजावे लागणार असल्याने शेतकऱ्यांत मात्र नाराजी आहे. राज्यात बिएसएनएलचे कृषी प्लॅन अंतर्गत १२ लाख ग्राहक आहेत. जिल्ह्यात बीएसएनएलचे दीड लाख ग्राहक आहेत. यापैकी किसान प्लॅन अंतर्गत ३५ हजार ग्राहक आहेत. कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, आणि शेतकऱ्यांमधील संवाद वाढावा, कमी खर्चात समन्वय साधला जावा, या हेतूने बीएसएनएलने सुरू केलेल्या ‘मोबाईल टू मोबाईल फ्री’ या महाकृषी संचार सुविधेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. याबाबतच्या तीनही योजनांचे समायोजन करून नव्या स्वरुपात ही योजना कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे राज्यातील १२ लाख शेतकरी आता एकमेकांशी मोफत संवाद साधू शकणार आहेत. शेतकऱ्यांना हवामानविषयक सल्ला, खते बी-बियाण्यांची उपलब्धता, गुणवत्तेबाबत येणाऱ्या अडचणी, कृषी विभागांच्या विविध योजनांची माहिती त्वरित कमी खर्चात मिळावी, यासाठी सर्वात महत्त्वाची ‘क्लोज युजर ग्रुप’ (सीयुजी) भ्रमणध्वनी सेवा सुरू करण्यासाठी ‘भारत संचार निगम या कंपनीची निवड करण्यात येऊन २०११ पासून ही सेवा सुरू आहे. मात्र या तिन्ही सेवा एकत्रित करून शुल्कात वाढ करण्यात आली व डेटादेखील कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांची नाराजी आहे. (प्रतिनिधी)