शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

वनविभागात बीएसएनएल 'नॉट रिचेबल'; शासकीय स्किम बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 19:07 IST

राज्यात वनकर्मचा-यांना मोबाईल आणि भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कंपनीचे सीमकार्ड देण्यात आले. मात्र, बीएसएनएलचे कव्हरेज मिळत नसल्याने वनविभागात ही स्किम अडगळीत पडली आहे.

- गणेश वासनिकअमरावती : राज्यात वनकर्मचा-यांना मोबाईल आणि भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कंपनीचे सीमकार्ड देण्यात आले. मात्र, बीएसएनएलचे कव्हरेज मिळत नसल्याने वनविभागात ही स्किम अडगळीत पडली आहे.राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती व तंत्रज्ञान) यांनी प्रादेशिक, सामाजिक वनीकरण, व्याघ्र प्रकल्पात वाटप करण्यात आलेल्या बीएसएनएल सीमकार्ड, मोबाईलबाबत विचारणा केली होती. त्यानंतर राज्यात ६०० वनक्षेत्रपाल, २२०० वनपाल आणि ९ हजार वनरक्षकांना बीएसएनएलचे मोबाईल, सीमकार्ड देण्यात आले. त्याकरिता वनविभागाने सुमारे २० कोटी रूपये खर्च केला. वनविभागाने कम्युनिकेशनसाठी ही स्किम सन २०१७ पासून सुरू केली होती, हे विशेष.

वनविभागाचे बीएसएनएलला प्राधान्यबीएसएनएल ही कंपनी शासकीय असल्यामुळे वनविभागाने कम्युनिकेशनसाठी त्याला प्राधान्य दिले. बीएसएनएलकडून वनकर्मचा-यांना हजारो सीमकार्ड वाटप करण्यात आले. ही स्किम सुरू ठेवण्यासाठी वनविभाग प्रत्येक कर्मचा-यांचे दरमहा १७० रूपये बिल देते. परंतु, वनकर्मचा-यांना हे सीमकार्ड २४ तास सुरू ठेवण्याची अट असल्याने त्यांची ‘प्रायव्हेसी’ संपुष्टात आली आहे. त्यामुळे काही वनकर्मचा-यांनी मोबाईलमधून सीमकार्ड बाहेर काढले. काहींनी फेकून दिल्याची माहिती आहे. असे असले तरी  बीएसएनएलच्या सीमकार्ड वापराचे भुर्दंड सुरूच आहे. दरम्यान, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती व तंत्रज्ञान) यांनी वनकर्मचा-यांकडून दरमहा १७० रुपये सीमकार्डचे वसूल करण्याचे आदेश दिले आहे. परिणामी बंद पडलेल्या सीमकार्डची माहिती आता देणे सुरू झाली आहे. 

जंगल क्षेत्रात कव्हरेज मिळेनावनकर्मचारी, अधिका-यांसाठी प्रशासकीय, शासकीय कामानिमित्त बीएसएनएल सेवा दिली असली तरी जंगल क्षेत्रात कव्हरेज मिळत नाही. बीएसएनएल सीमकार्ड कधी नॉटरिचेबल, कव्हरेज क्षेत्राबाहेर, असा संवाद ऐकू येतो. त्यामुळे वनकर्मचा-यांसाठी बीएसएनएल सेवा कुचकामी ठरू लागली आहे. सीमकार्ड वापराचे बिल सातत्याने दिले जात आहे.     ''तीन कर्मचा-यांनी बीएसएनएलचे सीमकार्ड बंद केल्याची माहिती पुढे आली. आणखी किती कर्मचा-यांनी सीमकार्ड बंद केले, याची शहानिशा केली जात आहे. विनाकारण बिल दिले जाऊ नये, हे यामागील उद्देश आहे.''- प्रवीण चव्हाण,मुख्य वनसंरक्षक, अमरावती (प्रादेशिक)

टॅग्स :BSNLबीएसएनएलforestजंगलforest departmentवनविभाग